शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

दलित अत्याचारांची ४५ हजार प्रकरणे; केंद्र सरकार चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 03:48 IST

शिक्षांचे प्रमाण मात्र केवळ १0 टक्के

- संतोष ठाकुरनवी दिल्ली : मोदी सरकार आल्यापासून दलित-आदिवासींवरील अत्याचारांच्या प्रकरणांत वाढ झाल्याचे काँग्रेस व मायावती यांचे आरोप खरे दिसत आहेत. दरवर्षी देशात दलित व आदिवासींवरील ४५ हजार घटना घडतात, ही वस्तुस्थिती आहेत. त्यामुळेच रालोआ व केंद्रात मंत्री असलेले रामविलास पासवान यांनी या प्रश्नावर दलित खासदारांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केल्याने केंद्र सरकार अडचणीत आले आहे.त्यामुळेच दलित अत्याचार कायद्याख़ाली लगेचच विशेष न्यायालये स्थापन करण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिल्या आहेत. आतापर्यंत १४ राज्यांमध्ये अशी न्यायालये स्थापन झाली आहेत. तीन न्यायालये महाराष्ट्रात आहेत. मध्य प्रदेशात ४३, उत्तर प्रदेशात ४0 विशेष न्यायालये आहेत. छत्तीसगडमध्ये १७, गुजरातमध्ये १६ तर आंध्र प्रदेशात १४ न्यायालयने आहेत. पासवान यांना या प्रश्नाचे राजकारण करता येऊ नयेत, यासाठी केंद्र सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, केवळ किती प्रकरणांत शिक्षा झाली हे महत्त्वाचे नसून, किती प्रकरणांत आरोपपत्रे दाखल झाली आहेत, हेही तपासायला हवे. किती जणांना अटक झाली, हे पाहायला हवे. अशा प्रकरणांत लोक साक्षीसाठी पुढे येत नाहीत, ही सर्वात चिंतेची बाब आहे. अर्थात समाजात बदल होत नाही, तोपर्यंत अशी प्रकरणे थांबतील, असे समजणे चुकीचे ठरेल.बदलाने मिळेल वरचा नंबरमहाराष्ट्रात २0१४ ते १६ या काळात आदिवासी अत्याचारांची ४४३, ४८२ व ४0३ प्रकरणे नोंदवली गेली. पहिल्या वर्षी १२, दुसºया वर्षी २५ व तिसºया वर्षी २५ प्रकरणांत आरोपींना शिक्षा झाली. दलित अत्याचारांची याच काळात १७६८, १८0४ व १७५0 प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी या तीन वर्षांत अनुक्रमे ५९, ६४ व १0६ प्रकरणांत संबंधितांना शिक्षा झाली.केंद्र सरकारने संसदेमध्ये सांगितले की २0१४ ते २0१६ या काळात देशात दरवर्षी सुमारे ४0 हजार दलित अत्याचाराची प्रकरणे पुढे आली आहेत. अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी अत्याचारांची प्रकरणे दरवर्षी ६ हजारांच्या आसपास आहेत. मात्र शिक्षेचे प्रमाण केवळ १0 टक्केच आहे.

टॅग्स :Dalit assaultदलितांना मारहाणNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार