शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिल्लीमधील भीषण आगीत ४३ जणांचा मृत्यू, १४ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 02:56 IST

दिल्लीतील झंडेवालान भागातील अनाज मंडीतील चार मजली इमारतीला पहाटे लागलेल्या भीषण आगीत ४३ जणांना प्राण गमवावे लागले तर १४ जण जखमी झाले.

- टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : दिल्लीतील झंडेवालान भागातील अनाज मंडीतील चार मजली इमारतीला पहाटे लागलेल्या भीषण आगीत ४३ जणांना प्राण गमवावे लागले तर १४ जण जखमी झाले. या इमारतीचा मालक रेहानला पोलिसांना सायंकाळी अटक केली. घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

पहाटे ५ वाजून २२ मिनिटांनी आगीची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी धावले. ६० बंबांनी चहुबाजुंनी हा परिसर घेरला होता, मात्र अरूंग गल्लीमुळे मदतकार्यात खूप अडथळे आले. सलग चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. बचावकार्य करताना अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. एका मजल्यावरील कारखान्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इमारतीत ६० पेक्षा अधिक लोक होते. त्यापैकी ४३ जण मरण पावल्याचे पोलिस व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीचे लोळ चहुबाजूने येत असल्याने कामगारांना इमारतीतून बाहेर पडणे मुश्किल झाले. या आगीच्या धुराने अनेक जण बेशुद्ध झाले.

या इमारतीत प्लास्टिकच्या वस्तू तयार करण्याचा कारखाना होता. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला कारखाना चौथ्या मजल्यावर होता. कारखान्यातील कामगार काम केल्यानंतर तेथेच झोपत असत. गाढ झोपलेल्या या कामगारांना रविवारचा सूर्य पाहता येणार नाही, याची पुसटशी कल्पनाही नव्हती.

आगीत जखमी झालेल्यांना राममनोहर लोहिया व लोकनायक जयप्रकाश रुग्णालय व हिंदूराव रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाच्या नातेवाईकांना या तिन्ही रुग्णालयाच्या चकरा माराव्या लागल्याने चांगलाच मनस्ताप झाला. ३४ जणांना ३४ मृृतावस्थेत रुग्णालयात आणले होते. जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

टॅग्स :delhiदिल्लीfireआग