शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

पंजाबमध्ये ४२४ व्हीआयपींची सुरक्षा काढली; भगवंत मान यांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 10:51 IST

मान सरकारने जेव्हा त्यांच्या सुरक्षेतील अर्धे कर्मचारी परत बोलावले होते.

चंडीगड : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील आणखी ४२४ व्हीआयपींच्या सुरक्षेत कपात केली आहे. यात श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांचा समावेश आहे. सुरक्षेतून काढून घेतलेले सर्व गनमॅन पंजाब सशस्त्र पोलिसचे कमांडो आहेत. त्यांना जालंधर छावणीतील सशस्त्र पोलीस दलात समाविष्ट करण्यात येणार आहे. 

श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांच्या सुरक्षेची जबाबदारी आता शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी (एसजीपीसी) पाहणार आहे. मान सरकारने जेव्हा त्यांच्या सुरक्षेतील अर्धे कर्मचारी परत बोलावले होते, तेव्हा त्यांनी उर्वरित अर्धे कर्मचारीही परत केले होते. एसजीपीसीने त्यांच्या तलवंडी साबो येथील निवासस्थानाबाहेर चार सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. एसजीपीसीचे सचिव तेजिंदर सिंह यांनी सांगितले की, जत्थेदार सुरक्षेसाठी कोणत्याही सरकारवर अवलंबून नाहीत. 

मान सरकारने यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष शमशेर सिंह दूलो, पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा व माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंह ढिंडसा यांच्या सुरक्षेत कपात केली आहे.

दरबार साहिबचे मुख्य ग्रंथी ज्ञानी जगतार सिंह, डेरा मुखी बाबा सुखदेव सिंह, डेरा सचखंड बल्लांचे मुखी निरंजन दस, भैणी साहिबचे मुखी सतगुरू उदय सिंह व पंजाबचे शाही इमाम मौलाना मुहम्मद उस्मान लुधियानवी यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. याबरोबरच पंजाब पोलिसांतील अनेक एडीजीपी, आयजी, डीआयजी व डीसीपी यांच्याही सुरक्षेत कपात केली आहे.

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाबAam Admi partyआम आदमी पार्टी