शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

पंजाबमध्ये ४२४ व्हीआयपींची सुरक्षा काढली; भगवंत मान यांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 10:51 IST

मान सरकारने जेव्हा त्यांच्या सुरक्षेतील अर्धे कर्मचारी परत बोलावले होते.

चंडीगड : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील आणखी ४२४ व्हीआयपींच्या सुरक्षेत कपात केली आहे. यात श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांचा समावेश आहे. सुरक्षेतून काढून घेतलेले सर्व गनमॅन पंजाब सशस्त्र पोलिसचे कमांडो आहेत. त्यांना जालंधर छावणीतील सशस्त्र पोलीस दलात समाविष्ट करण्यात येणार आहे. 

श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांच्या सुरक्षेची जबाबदारी आता शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी (एसजीपीसी) पाहणार आहे. मान सरकारने जेव्हा त्यांच्या सुरक्षेतील अर्धे कर्मचारी परत बोलावले होते, तेव्हा त्यांनी उर्वरित अर्धे कर्मचारीही परत केले होते. एसजीपीसीने त्यांच्या तलवंडी साबो येथील निवासस्थानाबाहेर चार सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. एसजीपीसीचे सचिव तेजिंदर सिंह यांनी सांगितले की, जत्थेदार सुरक्षेसाठी कोणत्याही सरकारवर अवलंबून नाहीत. 

मान सरकारने यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष शमशेर सिंह दूलो, पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा व माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंह ढिंडसा यांच्या सुरक्षेत कपात केली आहे.

दरबार साहिबचे मुख्य ग्रंथी ज्ञानी जगतार सिंह, डेरा मुखी बाबा सुखदेव सिंह, डेरा सचखंड बल्लांचे मुखी निरंजन दस, भैणी साहिबचे मुखी सतगुरू उदय सिंह व पंजाबचे शाही इमाम मौलाना मुहम्मद उस्मान लुधियानवी यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. याबरोबरच पंजाब पोलिसांतील अनेक एडीजीपी, आयजी, डीआयजी व डीसीपी यांच्याही सुरक्षेत कपात केली आहे.

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाबAam Admi partyआम आदमी पार्टी