शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

मद्यपींमुळे तीन वर्षांत ४१ हजार अपघात - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 06:21 IST

२०१६-१८ या वर्षांत ४० हजार ९८३ अपघात झाले आहेत. गिरीधारी यादव आणि रमा देवी यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला गडकरी यांनी उत्तर दिले.

नवी दिल्ली : २०१६ ते २०१८ या कालावधीत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांमुळे ४१ हजार अपघात झाल्याची माहिती रस्ते, परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिली. २०१६-१८ या वर्षांत ४० हजार ९८३ अपघात झाले आहेत. गिरीधारी यादव आणि रमा देवी यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला गडकरी यांनी उत्तर दिले.२०१६ मध्ये १४ हजार ८९४, २०१७ मध्ये १४ हाजर ७१ आणि २०१८ मध्ये १२ हजार १८ अपघात झाल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. मोटर वाहन कायद्यानुसार मद्यपान करून वाहन चालवल्यास तुरुंगवास आणि दंड अशा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. मंत्रालयाकडून सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.गोंदिया-डोंगरगड रेल्वे सुरू करा!छत्तीसगडमध्ये डोंगरगड येथे बम्लेश्वरी हे प्रमुक धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नाही तर मध्य प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधूनही मोठ्या प्रमाणात भाविक येतात. मात्र, गोंदिया ते डोंगरगड दरम्यान सकाळी १० ते दुपारी ४ या कालावधीत रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागतो. अनेक वर्षांपासूनया मार्गावर रेल्वे सुविधा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने या मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी नुकतीच लोकसभेत केली.नगरमध्ये स्वदेश,प्रसाद योजना सुरू करा!अहमदनगरला सांस्कृतिक वारसा असून शिर्डीतील साईबाबा मंदिर, नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर, शनी शिंगणापूर, दत्त मंदिर, भगवानगड अशा धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्य संग्रामातही अहमदर नगर जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अहमदनगरमध्ये स्वदेश आणि प्रसाद योजना सुरू करावी, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.लडाखमधील गुंतवणूक वाढीसाठी काय करणार?बाहेरील लोकांना लडाखमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. मात्र, स्थानिक नागरिक जमीन विकण्यास तयार नाहीत. जमीन खरेदी केल्याशिवाय लडाखमध्ये गुंतवणूक करणे अशक्य आहे. त्यामुळे येथील गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने कोणत्या उपाययोजना केल्याची माहिती द्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकNitin Gadkariनितीन गडकरी