शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

सीमेवरील ४०,००० नागरिकांना सोडावे लागले गाव; कुरापतखोर पाकिस्तानचा तोफमारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 1:23 AM

दोन दिवसांपासून जम्मूला लागून असलेल्या सीमेवर कुरापतखोर पाकिस्तानने सातत्याने तोफमारा सुरू ठेवला असून, आतापर्यंत अनेक गावांतील ४० हजार नागरिकांना आपले गाव-घर सोडून जावे लागले आहे.

दोन दिवसांपासून जम्मूला लागून असलेल्या सीमेवर कुरापतखोर पाकिस्तानने सातत्याने तोफमारा सुरू ठेवला असून, आतापर्यंत अनेक गावांतील ४० हजार नागरिकांना आपले गाव-घर सोडून जावे लागले आहे. अनेक घरांचे नुकसान झाले असून, गावे भयाण आणि ओस पडली आहेत. शाळा बंद पडल्या आहेत. शेतीची कामेही तशीच सोडावी लागली आहेत आणि गुरांनाही सोबत घेऊन सुरक्षित ठिकाणी लोकांना स्थलांतरीत व्हावे लागले आहे.१९७१ नंतर प्रथमच एवढा तोफमारा -एवढ्या मोठ्या प्रमाणात उखळी तोफांचा मारा होण्याची ही गेल्या दोन-तीन दशकांमधील पहिली वेळ आहे. पाकिस्तानकडून अशा प्रकारचा हल्ला १९६५ आणि १९७१ मध्ये आम्ही अनुभवला होता, असे सीमेवरील गावात राहणारे ८० वर्षीय यशपाल यांनी सांगितले.आणखी एक जवान शहीद-श्रीनगर : पाकिस्तानच्या गोळीबारात आणखी एक जवान शहीद झाला असून, या आठवड्यात ११ जण प्राणास मुकले आहेत. एका पोलीस अधिकाºयाने सांगितले की, पूंछ जिल्ह्यात मानकोट सेक्टरमध्ये एका चौकीवर तैनात असलेले जवान सी.के. रॉय शनिवारी पाकिस्तानच्या गोळीबारात जखमी झाले. त्यांना रात्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या आठवड्यात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत केलेल्या हल्ल्यात जम्मू, कठुआ, सांबा, पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ११ झाली आहे. यात सैन्याचे तीन जवान शहीद झाले असून, बीएसएफच्या दोन जवानांसह सहा नागरिकांचा समावेश आहे.काश्मीरला ‘मैत्रीचा पूल’ बनवा-काश्मीरला ‘युद्धाचा आखाडा’ नव्हे, तर ‘मैत्रीचा पूल’ बनवा, असे आवाहन, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पंतप्रधान मोदी व पाकिस्तानला केले आहे. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे विकासाच्या गोष्टी करीत आहेत; पण दुसरीकडे काश्मिरात विपरीत घडत आहे. शाळा बंद असून, मुले घरात फसली आहेत. जम्मू-काश्मीरच्या पोलिसांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.भारतीय उपउच्चायुक्तांना केले पाचारण; भारतानेच शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा केला कांगावा-इस्लामाबाद : भारताने पाकिस्तानच्या सीमा भागातील गावांत गोळीबार केल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. तथापि, पाकिस्तानने भारताचे उपउच्चायुक्त जे.पी. सिंह यांना पाचारण केले.विदेश मंत्रालयाच्या कार्यालयाने सांगितले की, दक्षिण आशिया विभागाचे महासंचालक मोहम्मद फैसल यांनी सिंह यांना पाचारण केले आणि भारताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याबाबत निषेध नोंदविला.त्यांनी म्हटले आहे की, २० आणि २१ जानेवारी रोजी भारतीय सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार केला. यात ३३ वर्षीय एक पुरुष आणि २५ वर्षीय एक महिला यांचा मृत्यू झाला, तर एक महिला आणि एक मुलगी जखमी झाली.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानIndiaभारत