शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेश : श्रीरामाची ४०० वर्ष जुनी मूर्ती अज्ञातांनी तोडली; भाजपा म्हणतं, "हे १६ व्या शतकातल्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 14:21 IST

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील विजयनगरम परिसरात प्रभू श्रीरामाची ४०० वर्ष जुनी मूर्ती अज्ञातांनी तोडल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर विरोधकांनी जगनमोहन रेड्डी सरकारवर जोरदार टीका केली.

ठळक मुद्देविरोधकांकडून जगनमोहन रेड्डी सरकारवर जोरदार टीकाअशा घटना सोळाव्या शतकातील घटनांची आठवण करून देत असल्याचं भाजपाचे सुनिल देवधर यांचं वक्तव्य

आंध्र प्रदेशातील विजयनगरम परिसरात प्रभू श्रीरामाची ४०० वर्ष जुनी मूर्ती अज्ञातांनी तोडल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर विरोधकांनी जगनमोहन रेड्डी सरकारवर जोरदार टीका केली. तसंच भाजपा नेते सुनील देवधर यांनी आंध्र प्रदेशात हिंदू मंदिरांवर होत असलेले हल्ले हे १६ व्या शतकातील गोव्यातील क्रूर सेंट झेविअरच्या हल्ल्यांची आठवण करून देत असल्याचं म्हटलं."आंध्र प्रदेशात हिंदू मंदिरांवर सतत होत असलेल्या हल्ल्यांवरून तालिबानकडून बामियान येथे तोडण्यात आलेल्या बुद्धाच्या प्रतीमेती आठवण झाली. ही घटना अतिशय भयावह आहे. मंदिरांवरील हल्ल्यांवर जगनमोहन रेड्डी सरकारचं मौन हे त्यांचं समर्थन दाखवत आहे," असा आरोपही सुनील देवधर यांनी केला. "एकीकडे अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यात येत आहे आणि तर दुसरीकडे या ठिकाणी रामाची मूर्ती तोडण्यात आली," असं मत जनसेना प्रमुख आणि चित्रपटसृष्टीतून राजकारणात प्रवेश केलेल्या पवन कल्याण यांनी व्यक्त केलं. या घटनेनंतर विरोधकांनी जगनमोहन रेड्डी यांच्यावर निशाणा साधला आहे.  "त्यांनी ऐतिहासिक मंदिरात चुकीचं कृत्य केलं आहे. राज्य सरकारनं पीथमपूर, कोंडा बिटरगुन्टा आणि अंटहेरवेदी या ठिकाणी घडलेल्या घटनांवर गंभीररित्या कोणतीही कारवाई केली नाही. अंतरावेदीमध्ये श्री लक्ष्मी नरसिम्हा स्वामी मंदिराचा रत जाळणाऱ्या आरोपींचा अजून शोध घेता आलेला नाही. ना या प्रकरणी कोणाला अटक करण्यात आली आहे. हिंदूंचे देवीदेवता आणि मंदिरातील मूर्तींवर होणाऱ्या या हल्ल्यांना काय म्हटलं पाहिजे?, हो कोणीही वेडेपणानं केलेलं कृत्य नाही तर धार्मिक संतुलन गमावलेल्या लोकांनी केलेलं आहे," असंही पवन कल्याण म्हणाले.दरम्यान, पवन कल्याण यांनी अशा घटनांवर गृहमंत्रालयानंही लक्ष द्यावं, अशी विनंती केली आहे. "दीड वर्षांपासून मंदिरं आणि मूर्त्यांवर अशाप्रकारचे हल्ले होत आहेचय मंदिरांवर होणाऱ्या या हल्ल्यांची सीबीआयद्वारे चौकशीही करण्यात यावी," अशी मागणीही त्यांनी केली. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीदेखील या घटनेचा निषेध केला. तसंच या घटनेसाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोपही केला.

टॅग्स :BJPभाजपाAndhra Pradeshआंध्र प्रदेश