शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेश : श्रीरामाची ४०० वर्ष जुनी मूर्ती अज्ञातांनी तोडली; भाजपा म्हणतं, "हे १६ व्या शतकातल्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 14:21 IST

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील विजयनगरम परिसरात प्रभू श्रीरामाची ४०० वर्ष जुनी मूर्ती अज्ञातांनी तोडल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर विरोधकांनी जगनमोहन रेड्डी सरकारवर जोरदार टीका केली.

ठळक मुद्देविरोधकांकडून जगनमोहन रेड्डी सरकारवर जोरदार टीकाअशा घटना सोळाव्या शतकातील घटनांची आठवण करून देत असल्याचं भाजपाचे सुनिल देवधर यांचं वक्तव्य

आंध्र प्रदेशातील विजयनगरम परिसरात प्रभू श्रीरामाची ४०० वर्ष जुनी मूर्ती अज्ञातांनी तोडल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर विरोधकांनी जगनमोहन रेड्डी सरकारवर जोरदार टीका केली. तसंच भाजपा नेते सुनील देवधर यांनी आंध्र प्रदेशात हिंदू मंदिरांवर होत असलेले हल्ले हे १६ व्या शतकातील गोव्यातील क्रूर सेंट झेविअरच्या हल्ल्यांची आठवण करून देत असल्याचं म्हटलं."आंध्र प्रदेशात हिंदू मंदिरांवर सतत होत असलेल्या हल्ल्यांवरून तालिबानकडून बामियान येथे तोडण्यात आलेल्या बुद्धाच्या प्रतीमेती आठवण झाली. ही घटना अतिशय भयावह आहे. मंदिरांवरील हल्ल्यांवर जगनमोहन रेड्डी सरकारचं मौन हे त्यांचं समर्थन दाखवत आहे," असा आरोपही सुनील देवधर यांनी केला. "एकीकडे अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यात येत आहे आणि तर दुसरीकडे या ठिकाणी रामाची मूर्ती तोडण्यात आली," असं मत जनसेना प्रमुख आणि चित्रपटसृष्टीतून राजकारणात प्रवेश केलेल्या पवन कल्याण यांनी व्यक्त केलं. या घटनेनंतर विरोधकांनी जगनमोहन रेड्डी यांच्यावर निशाणा साधला आहे.  "त्यांनी ऐतिहासिक मंदिरात चुकीचं कृत्य केलं आहे. राज्य सरकारनं पीथमपूर, कोंडा बिटरगुन्टा आणि अंटहेरवेदी या ठिकाणी घडलेल्या घटनांवर गंभीररित्या कोणतीही कारवाई केली नाही. अंतरावेदीमध्ये श्री लक्ष्मी नरसिम्हा स्वामी मंदिराचा रत जाळणाऱ्या आरोपींचा अजून शोध घेता आलेला नाही. ना या प्रकरणी कोणाला अटक करण्यात आली आहे. हिंदूंचे देवीदेवता आणि मंदिरातील मूर्तींवर होणाऱ्या या हल्ल्यांना काय म्हटलं पाहिजे?, हो कोणीही वेडेपणानं केलेलं कृत्य नाही तर धार्मिक संतुलन गमावलेल्या लोकांनी केलेलं आहे," असंही पवन कल्याण म्हणाले.दरम्यान, पवन कल्याण यांनी अशा घटनांवर गृहमंत्रालयानंही लक्ष द्यावं, अशी विनंती केली आहे. "दीड वर्षांपासून मंदिरं आणि मूर्त्यांवर अशाप्रकारचे हल्ले होत आहेचय मंदिरांवर होणाऱ्या या हल्ल्यांची सीबीआयद्वारे चौकशीही करण्यात यावी," अशी मागणीही त्यांनी केली. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीदेखील या घटनेचा निषेध केला. तसंच या घटनेसाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोपही केला.

टॅग्स :BJPभाजपाAndhra Pradeshआंध्र प्रदेश