शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

४० वर्षांपूर्वी झाले होते ४०० पार, आता इतिहास बदलणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 13:12 IST

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात राजीव गांधी आणि काँग्रेसबद्दल सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट उसळली होती.

नवी दिल्ली : लोकसभानिवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना सगळीकडे केवळ ४०० पारचा नारा दिसत आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाला ३७० पेक्षा जास्त, तर एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. कोणाला किती जागा मिळतील, हे येणाऱ्या काही महिन्यांत कळेलच, पण भूतकाळाबद्दल बोलायचे झाले तर यापूर्वी ४०० जागा जिंकून इतिहास रचण्यात आला आहे. १९८४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला तब्बल ४०४ जागा मिळाल्या होत्या. एवढा मोठा आकडा गाठणे हे देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच आणि ऐतिहासिक ठरले होते.

नेमके काय झाले? - तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात राजीव गांधी आणि काँग्रेसबद्दल सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट उसळली होती.- त्याचा परिणाम म्हणून १९८४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ५१४ पैकी ४०४ जागा जिंकून इतिहास रचला. - या सार्वत्रिक निवडणुकीत सुमारे ५,३१२ उमेदवार उभे होते. त्यापैक १,२४४ राष्ट्रीय पक्षांचे आणि १५१ प्रादेशिक पक्षांचे होते. - निवडणुकीत ३,७९१ अपक्ष उमेदवार उभे होते, त्यातील केवळ ५ लोकसभेत पोहोचले.

पंतप्रधान कोण झाले? इंदिरा गांधी यांची हत्या २१ ऑक्टोबर १९८४ रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या लॉनमध्ये त्यांच्याच दोन अंगरक्षकांनी केली होती. डिसेंबर १९८४ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. लोकसभेच्या ५१४ जागांसाठी २४-२८ डिसेंबर रोजी मतदान झाले. यानंतर राजीव गांधी यांची देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली.

विरोधी पक्ष कोण? ३० जागा जिंकून टीडीपी विरोधी पक्ष म्हणून संसदेत आला. प्रथमच एक प्रादेशिक पक्ष विरोधी पक्ष झाला होता.

भाजपची ही पहिलीच निवडणूक होती१९८० मध्ये जनसंघापासून वेगळे होऊन भाजपची स्थापना झाली आणि पक्षाने कमळ हे निवडणूक चिन्ह म्हणून घोषित केले. १९८४ मध्ये भाजपने पहिली लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, या सार्वत्रिक निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या पक्षाला कोणतीही छाप पाडता आली नाही. पक्षाने २२४ जागांवर लोकसभा निवडणूक लढवली होती, पण फक्त २ जागांवरच समाधान मानावे लागले होते.

भाजपची ही पहिलीच निवडणूक होती१९८० मध्ये जनसंघापासून वेगळे होऊन भाजपची स्थापना झाली आणि पक्षाने कमळ हे निवडणूक चिन्ह म्हणून घोषित केले. १९८४ मध्ये भाजपने पहिली लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, या सार्वत्रिक निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या पक्षाला कोणतीही छाप पाडता आली नाही. पक्षाने २२४ जागांवर लोकसभा निवडणूक लढवली होती, पण फक्त २ जागांवरच समाधान मानावे लागले होते.

ती एकमेव लोकसभा निवडणूक१९८४ च्या निवडणुकीत २५.६२ कोटींपेक्षा अधिक मतदान झाले होते. ही २०१४ पर्यंतची शेवटची निवडणूक होती ज्यामध्ये एकाच पक्षाला बहुमत मिळाले होते. याशिवाय आजपर्यंतची ही एकमेव लोकसभा निवडणूक होती, जेव्हा एका पक्षाने ४०० हून अधिक जागा जिंकल्या होत्या.

ती एकमेव लोकसभा निवडणूक१९८४ च्या निवडणुकीत २५.६२ कोटींपेक्षा अधिक मतदान झाले होते. ही २०१४ पर्यंतची शेवटची निवडणूक होती ज्यामध्ये एकाच पक्षाला बहुमत मिळाले होते. याशिवाय आजपर्यंतची ही एकमेव लोकसभा निवडणूक होती, जेव्हा एका पक्षाने ४०० हून अधिक जागा जिंकल्या होत्या.

टॅग्स :congressकाँग्रेसRajiv Gandhiराजीव गांधीBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक