शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

४० वर्षांपूर्वी झाले होते ४०० पार, आता इतिहास बदलणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 13:12 IST

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात राजीव गांधी आणि काँग्रेसबद्दल सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट उसळली होती.

नवी दिल्ली : लोकसभानिवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना सगळीकडे केवळ ४०० पारचा नारा दिसत आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाला ३७० पेक्षा जास्त, तर एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. कोणाला किती जागा मिळतील, हे येणाऱ्या काही महिन्यांत कळेलच, पण भूतकाळाबद्दल बोलायचे झाले तर यापूर्वी ४०० जागा जिंकून इतिहास रचण्यात आला आहे. १९८४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला तब्बल ४०४ जागा मिळाल्या होत्या. एवढा मोठा आकडा गाठणे हे देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच आणि ऐतिहासिक ठरले होते.

नेमके काय झाले? - तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात राजीव गांधी आणि काँग्रेसबद्दल सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट उसळली होती.- त्याचा परिणाम म्हणून १९८४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ५१४ पैकी ४०४ जागा जिंकून इतिहास रचला. - या सार्वत्रिक निवडणुकीत सुमारे ५,३१२ उमेदवार उभे होते. त्यापैक १,२४४ राष्ट्रीय पक्षांचे आणि १५१ प्रादेशिक पक्षांचे होते. - निवडणुकीत ३,७९१ अपक्ष उमेदवार उभे होते, त्यातील केवळ ५ लोकसभेत पोहोचले.

पंतप्रधान कोण झाले? इंदिरा गांधी यांची हत्या २१ ऑक्टोबर १९८४ रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या लॉनमध्ये त्यांच्याच दोन अंगरक्षकांनी केली होती. डिसेंबर १९८४ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. लोकसभेच्या ५१४ जागांसाठी २४-२८ डिसेंबर रोजी मतदान झाले. यानंतर राजीव गांधी यांची देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली.

विरोधी पक्ष कोण? ३० जागा जिंकून टीडीपी विरोधी पक्ष म्हणून संसदेत आला. प्रथमच एक प्रादेशिक पक्ष विरोधी पक्ष झाला होता.

भाजपची ही पहिलीच निवडणूक होती१९८० मध्ये जनसंघापासून वेगळे होऊन भाजपची स्थापना झाली आणि पक्षाने कमळ हे निवडणूक चिन्ह म्हणून घोषित केले. १९८४ मध्ये भाजपने पहिली लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, या सार्वत्रिक निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या पक्षाला कोणतीही छाप पाडता आली नाही. पक्षाने २२४ जागांवर लोकसभा निवडणूक लढवली होती, पण फक्त २ जागांवरच समाधान मानावे लागले होते.

भाजपची ही पहिलीच निवडणूक होती१९८० मध्ये जनसंघापासून वेगळे होऊन भाजपची स्थापना झाली आणि पक्षाने कमळ हे निवडणूक चिन्ह म्हणून घोषित केले. १९८४ मध्ये भाजपने पहिली लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, या सार्वत्रिक निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या पक्षाला कोणतीही छाप पाडता आली नाही. पक्षाने २२४ जागांवर लोकसभा निवडणूक लढवली होती, पण फक्त २ जागांवरच समाधान मानावे लागले होते.

ती एकमेव लोकसभा निवडणूक१९८४ च्या निवडणुकीत २५.६२ कोटींपेक्षा अधिक मतदान झाले होते. ही २०१४ पर्यंतची शेवटची निवडणूक होती ज्यामध्ये एकाच पक्षाला बहुमत मिळाले होते. याशिवाय आजपर्यंतची ही एकमेव लोकसभा निवडणूक होती, जेव्हा एका पक्षाने ४०० हून अधिक जागा जिंकल्या होत्या.

ती एकमेव लोकसभा निवडणूक१९८४ च्या निवडणुकीत २५.६२ कोटींपेक्षा अधिक मतदान झाले होते. ही २०१४ पर्यंतची शेवटची निवडणूक होती ज्यामध्ये एकाच पक्षाला बहुमत मिळाले होते. याशिवाय आजपर्यंतची ही एकमेव लोकसभा निवडणूक होती, जेव्हा एका पक्षाने ४०० हून अधिक जागा जिंकल्या होत्या.

टॅग्स :congressकाँग्रेसRajiv Gandhiराजीव गांधीBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक