शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान झाल्यानंतर मोदींच्या संपत्तीत 42 टक्के वाढ, सहकारीही झाले श्रीमंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 11:20 IST

चार वर्षांच्या कार्यकाळात मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचेही अच्छे दिन आले आहेत.

नवी दिल्ली- नरेंद्र मोदी सरकारचा 26 मे 2018 रोजी स्वतःच्या चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सरकारमध्ये झालेल्या 2जी, कोळसा घोटाळ्यांसारख्या मुद्द्यांवरून रान उठवत मोदी सरकार अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेवर आले. जनतेनं मोदींना भारताचे पंतप्रधान बनण्याचीही संधी दिली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःचा चार वर्षांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. या चार वर्षांच्या कार्यकाळात मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचेही अच्छे दिन आले आहेत. मोदी सरकार हे सामान्यांचं सरकार असल्याचंही मोदींच्या मंत्रिमंडळातील नेते नेहमीच दावा करत असतात. परंतु खरंच मोदी सरकार हे सामान्यांचं सरकार राहिलं आहे का, मोदींच्या मंत्रिमंडळातील कोट्यधीश मंत्र्यांच्या संपत्तीची माहिती पाहून तुमचे डोळे विस्फारतील. लोकसभा निवडणूक 2014नंतर मोदी सरकारमधल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं उघडकीस आलं आहे. 

नॅशनल इलेक्शन वॉच(एनईडब्लू) आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म 2016च्या एका रिपोर्टनुसार, मोदी मंत्रिमंडळातील 78 पैकी 72 मंत्री कोट्यधीश आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीत 2014 पासून 2017पर्यंत जवळपास 41.8 टक्के(1.41 कोटी ते 2 कोटी रुपये) वाढ झाली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री सदानंद गौडा यांच्या संपत्तीत 42.3 टक्के(4.65 कोटी रुपयांहून 6.62 कोटी रुपये) वाढ नोंदवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या संपत्तीत 2015-17 या कार्यकाळात अधिक वृद्धी झाल्याचं समोर आलं आहे. 2015-17दरम्यान तोमर यांच्या संपत्तीत 67.5 टक्के(2014-15मध्ये 53 लाखांहून अधिक संपत्ती वाढून 2016-17मध्ये 89 लाख )वाढ झाली. तर मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची संपत्ती कमी झाल्याचं उघड झालंय. जावडेकर यांची संपत्ती 50 टक्क्यां(1.11कोटी रुपयांवरून 56 लाख रुपयां)वर आली आहे. 

केंद्रीय मंत्री बीरेंद्र सिंह यांच्या संपत्तीत 23.5 टक्के(7.97 कोटी रुपयांवरून 9.85 कोटी रुपये) वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. तसेच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या उत्पन्नातही 17.4 टक्के(4.55 कोटी रुपयांवरून 5.34 कोटी रुपये) वाढ झाली. केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंय यांच्या उत्पन्नात 12.5 टक्के(69 लाखांहून 78 लाख रुपये) नोंदवण्यात आली आहे. मोदी सरकारमधल्या 5 मंत्र्यांजवळ स्वतःच्या पती/पत्नीच्या तुलनेत फारच कमी संपत्ती आहे. या मंत्र्यांमध्ये सुषमा स्वराज, प्रकाश जावडेकर, रामविलास पासवान, मुख्यात अब्बास नक्वी आणि बीरेंद्र सिंह चौधरी यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPrakash Javadekarप्रकाश जावडेकरSushma Swarajसुषमा स्वराज