शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानची पळापळ; बंद केले पीओकेतील 4 दहशतवादी तळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 13:27 IST

भारताच्या आक्रमक बाण्याची पाकिस्तानला धास्ती

श्रीनगर: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक पवित्रा घेतल्यानं पाकिस्तान चांगलाच धास्तावला आहे. भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राइक केल्याचा परिणाम पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसू लागला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील चार दहशतवादी तळ बंद करण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला उत्तर देत असताना भारतीय लष्कराकडून दहशतवादी तळांवर हल्ले केले जाण्याची भीती पाकिस्तानला वाटते. त्यामुळेच पाकिस्ताननं हे पाऊल उचललं आहे. गुप्ततर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 मार्चला पाकव्याप्त काश्मीरमधील निकियालमध्ये एक बैठक झाली. या बैठकीला पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचे अधिकारी आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अशफार बडवाल उपस्थित होते. निकियाल भाग काश्मीरमधील राजौरी सेक्टरजवळ येतो. निकियालमध्ये असणारे चार दहशतवादी तळ बंद करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. हे तळ बडवालकडून चालवले जातात. त्यामुळेच तळ बंद करण्याच्या सूचना आयएसआयकडून थेट त्यालाच देण्यात आल्या.पाकिस्तानकडून करण्यात येत असलेल्या गोळीबाराला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. भारताकडून दहशतवादी तळांवर हल्ला केला जाऊ शकतो, या भितीनं पाकिस्ताननं दहशतवादी तळ बंद करण्याचा निर्णय घेतला. पाकव्याप्त काश्मीरमधील निकियाल आणि कोटलीमधील प्रत्येकी एक-एक दहशतवादी तळ बंद करण्याचा घेण्यात आला. हा परिसर काश्मीरच्या सुंदरबनी आणि राजौरी सेक्टरपासून अतिशय जवळ आहे. निकियाल, कोटली सोबतच पाला आणि बाघामधील दहशतवादी तळदेखील बंद करण्याच्या सूचना आयएसआयकडून करण्यात आल्या आहेत. हे तळ जैश-ए-मोहम्मदकडून चालवले जात होते.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानterroristदहशतवादीJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबा