शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; जेवण करण्यासाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, चहाची किंमत तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 10:57 IST

तिकीट सिस्टिममध्ये हे नवीन दर १५ दिवसांत अपडेट होतील. पुढील ४ महिन्यांनंतर हे नवे दर लागू होणार आहे.

मुंबई - रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण रेल्वेत चहा, नाश्ता आणि जेवण करण्यासाठी प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. रेल्वे बोर्डाने याबाबत एक परिपत्रक काढलं आहे ज्यात राजधानी शताब्दी आणि दुरांतो एक्सप्रेसमधील चहा, नाश्ता आणि जेवणाचे दर वाढविण्यात आले आहेत. या ट्रेनमध्ये तिकीट घेताना चहा, नाश्ता आणि जेवणाचे पैसेही द्यावे लागतात. 

राजधानी, दुरांतो आणि शताब्दी ट्रेनमध्ये लागू करण्यात आलेले नवीन दर सेकंड क्लासमधील प्रवाशांसाठी चहा १० रुपयांऐवजी २० रुपये, स्लीपर क्लास १५ रुपये, दुरांतो एक्सप्रेस स्लीपर क्लासमध्ये पूर्वी नाश्ता आणि जेवण ८० रुपयांना मिळत होतं. ते आता १२० रुपये झालं आहे. तर संध्याकाळचा चहा २० रुपयांऐवजी ५० रुपये होणार आहे. 

तिकीट सिस्टिममध्ये हे नवीन दर १५ दिवसांत अपडेट होतील. पुढील ४ महिन्यांनंतर हे नवे दर लागू होणार आहे. राजधानी एक्सप्रेस फर्स्ट क्लासमध्ये पूर्वी जेवण १४५ रुपयांना होतं त्याचे नवीन दर २४५ रुपये असणार आहेत. त्यामुळे या नवीन दराचा फटका सर्वसामान्यांना होणार आहे. तसेच याव्यतिरिक्त असणाऱ्या एक्सप्रेस, मेलमध्ये शाकाहारी जेवण पूर्वी ५० रुपयांना मिळत होतं त्यासाठी आता ८० रुपये मोजावे लागणार आहेत. इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनने एग्ज बिरयानी ९० रुपये, चिकन बिरयानी ११० रुपये मोजावे लागणार आहेत. 

सकाळच्या चहापेक्षा संध्याकाळचा चहा जास्त महाग का? यावर एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, संध्याकाळच्या चहासोबत रोस्टेड नट्स, स्नॅक्स आणि मिठाई हेदेखील दिलं जातं. आमची रेल्वे कॅटरिंग सेवा आणखी सुधारणार आहे. त्यासाठी हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. २०१४ मध्ये हे दर बदलण्यात आले होते. आयआरसीटीसीचा आग्रह आणि बोर्डाच्या शिफारशीनंतर या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रवास करताना जास्तीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. याबाबत प्रवाशांमध्ये नाराजी असल्याचंही दिसून येत आहे.  

टॅग्स :railwayरेल्वेMONEYपैसाIRCTCआयआरसीटीसी