शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; ४ माजी CJI प्रभू श्रीरामचरणी लीन, अयोध्येतील सोहळ्यात झाले सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 12:32 IST

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: राम मंदिराचा ऐतिहासिक निकाल देणारे न्यायाधीश सोहळ्याला उपस्थित होते.

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: रामभक्तांचे पाचशे वर्षांचे स्वप्न साकार झाले. या सुवर्णक्षणाची भारतासह अवघे जग उत्सुकतेने वाट पाहत होते. रामललांच्या मूर्तीची अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली आणि संपूर्ण देशभरात जय श्रीरामचा जयघोष गुंजला. या सोहळ्याला जवळपास ७ हजार मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. उद्योगपती, क्रीडा, संत-महंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राम मंदिराचा ऐतिहासिक निकाल प्रक्रियेचा भाग असलेले चार माजी सरन्यायाधीश या सोहळ्यात सहभागी झाले होते. 

अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे चार माजी सरन्यायाधीशही सहभागी झाले होते. तथापि, विद्यमान सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि सर्वोच्च न्यायालयाचे इतर ३२ न्यायाधीश न्यायालयाच्या सुनावणीत व्यस्त असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. माजी सरन्यायाधीश व्हीएन खरे, जीएस खेहर, एनव्ही रमणा आणि यूयू लळीत यांनी राम मंदिर सोहळ्याला हजेरी लावली. सुब्रमण्यम स्वामी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या ३० सप्टेंबर २०१० च्या निर्णयाला आव्हान दिले होते, तेव्हा माजी मुख्य न्यायाधीश खेहर यांनी २१ मार्च २०१७ रोजी रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद आपापसात सोडवण्याचा सल्ला दिला होता. २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त जमीन रामलला, सुन्नी वक्फ बोर्ड आणि निर्मोही आखाडा यांना समान वाट्याने देण्याचा निर्णय दिला होता.

तत्कालीन सरन्यायाधीश खेहर म्हणाले होते की, दोन्ही पक्ष सहमत असतील तर ते परस्पर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात. मात्र, न्यायमूर्ती खेहर यांचा सल्ला कोणी मान्य केला नाही. यानंतर माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एसए बोबडे, न्या. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एसए नजीर यांच्या खंडपीठाने श्रीरामजन्मभूमी वादावर अंतिम सुनावणी सुरू केली. न्या. गोगोई यांनी या प्रकरणावर अंतिम तोडगा काढण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती एफएमआय कैफुल्ला, श्रीराम पंचू आणि श्री श्री रविशंकर यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना केली होती. 

परस्पर सामंजस्यासाठी समितीने सर्वतोपरी प्रयत्न केले असले तरी, यात यश आले नाही. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी अंतिम निकाल दिला. या निर्णयात वादग्रस्त जमीन आणि त्याच्या आजूबाजूची २.७७ एकर जमीन राम मंदिराच्या उभारणीसाठी देण्याचे आदेश दिले होते. तर, मशिदीच्या बांधकामासाठी ५ एकर जमीन देण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, राम मंदिराचा निकाल देणारे केवळ एक माजी न्यायाधीश अशोक भूषण हे राम मंदिर सोहळ्याला उपस्थित होते. याशिवाय ६ माजी न्यायाधीशही या सोहळ्याचा भाग झाले. माजी न्या. ए. आर. दवे, केएस राधाकृष्णन, विनीत शरण, अरुण मिश्रा आणि व्ही रामसुब्रमण्यम आणि एके गोयल यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय