शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

४ काँग्रेस आमदार भाजपात जाणार?, अन्य दोघांबद्दल सबुरीचे धोरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 06:16 IST

कर्नाटकमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीस अनुपस्थित राहिलेले त्या पक्षाचे चार आमदार भाजपामध्ये नक्की प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बंगळुरू : कर्नाटकमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीस अनुपस्थित राहिलेले त्या पक्षाचे चार आमदार भाजपामध्ये नक्की प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापैकी दोन आमदारांना काँग्रेस पक्षांतरबंदी कायद्याच्या आधारे कारणे दाखवा नोटीस बजावणार असून, अन्य दोन आमदारांबद्दल पक्षाने सबुरीचे धोरण स्वीकारले आहे.काँग्रेसचे आमदार रमेश जर्किहोली व महेश कुमतल्ली विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस मुद्दामहून अनुपस्थित राहिले याचे पुरावे उपलब्ध असून, त्यांचे सदस्यत्व रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस पक्षाकडून बजावली जाईल. उमेश जाधव, बी. नागेंद्र या अन्य दोन आमदारांवर काय कारवाई करायची याचा निर्णय काही दिवसांनी घेतला जाईल. उमेश जाधव हे भाजपामध्ये जाणार हे जवळजवळ निश्चित आहे. कलबुर्गी लोकसभा मतदारसंघात मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात जाधव यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस येऊ शकत नसल्याचे जाधव यांनी दिलेले पत्र ही केवळ तांत्रिक बाबींची पूर्तता आहे.कर्नाटकमध्ये जनता दल (एस) व काँग्रेस आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याचे आरोप झाले होते. घोडेबाजार टाळण्यासाठी राज्यातील भाजपाच्या १०४ आमदारांना गुरगाव येथील एका रिसॉर्टमध्ये काही दिवसांपासून ठेवण्यात आले आहे.कर्नाटकमध्ये काही ठिकाणी दुष्काळी स्थिती असून, त्याची पाहणी व उपाययोजनांसाठी आमदारांनी आपापल्या मतदारसंघात परत जावे, असे त्यांना कर्नाटक भाजपा प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडीयुरप्पा यांनी सांगितले आहे.>असंतुष्ट आमदारांसाठी मंत्रीपद सोडण्याची तयारीकर्नाटक काँग्रेसमधील असंतुष्ट आमदारांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी पक्षाचे सर्व विद्यमान मंत्री आपल्या पदाचा राजीनामा देण्यास तयार आहेत, असे त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री डी.के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. राज्यात निर्माण झालेल्या प्रत्येक राजकीय पेचप्रसंगातून काँग्रेसला ते सहीसलामत बाहेर काढतात, अशी ख्याती आहे. ते म्हणाले की, आम्ही पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत. धरमसिंग सरकार असताना काही कारणाने मला मंत्रिमंडळात घेण्यात आले नव्हते. सिद्धरामय्या यांच्या कारकीर्दीतही मला मंत्रिपद मिळाले नव्हते. आमच्यासाठी पद नव्हे, तर पक्ष महत्त्वाचा आहे.

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाKarnatak Politicsकर्नाटक राजकारण