शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

४ काँग्रेस आमदार भाजपात जाणार?, अन्य दोघांबद्दल सबुरीचे धोरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 06:16 IST

कर्नाटकमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीस अनुपस्थित राहिलेले त्या पक्षाचे चार आमदार भाजपामध्ये नक्की प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बंगळुरू : कर्नाटकमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीस अनुपस्थित राहिलेले त्या पक्षाचे चार आमदार भाजपामध्ये नक्की प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापैकी दोन आमदारांना काँग्रेस पक्षांतरबंदी कायद्याच्या आधारे कारणे दाखवा नोटीस बजावणार असून, अन्य दोन आमदारांबद्दल पक्षाने सबुरीचे धोरण स्वीकारले आहे.काँग्रेसचे आमदार रमेश जर्किहोली व महेश कुमतल्ली विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस मुद्दामहून अनुपस्थित राहिले याचे पुरावे उपलब्ध असून, त्यांचे सदस्यत्व रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस पक्षाकडून बजावली जाईल. उमेश जाधव, बी. नागेंद्र या अन्य दोन आमदारांवर काय कारवाई करायची याचा निर्णय काही दिवसांनी घेतला जाईल. उमेश जाधव हे भाजपामध्ये जाणार हे जवळजवळ निश्चित आहे. कलबुर्गी लोकसभा मतदारसंघात मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात जाधव यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस येऊ शकत नसल्याचे जाधव यांनी दिलेले पत्र ही केवळ तांत्रिक बाबींची पूर्तता आहे.कर्नाटकमध्ये जनता दल (एस) व काँग्रेस आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याचे आरोप झाले होते. घोडेबाजार टाळण्यासाठी राज्यातील भाजपाच्या १०४ आमदारांना गुरगाव येथील एका रिसॉर्टमध्ये काही दिवसांपासून ठेवण्यात आले आहे.कर्नाटकमध्ये काही ठिकाणी दुष्काळी स्थिती असून, त्याची पाहणी व उपाययोजनांसाठी आमदारांनी आपापल्या मतदारसंघात परत जावे, असे त्यांना कर्नाटक भाजपा प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडीयुरप्पा यांनी सांगितले आहे.>असंतुष्ट आमदारांसाठी मंत्रीपद सोडण्याची तयारीकर्नाटक काँग्रेसमधील असंतुष्ट आमदारांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी पक्षाचे सर्व विद्यमान मंत्री आपल्या पदाचा राजीनामा देण्यास तयार आहेत, असे त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री डी.के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. राज्यात निर्माण झालेल्या प्रत्येक राजकीय पेचप्रसंगातून काँग्रेसला ते सहीसलामत बाहेर काढतात, अशी ख्याती आहे. ते म्हणाले की, आम्ही पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत. धरमसिंग सरकार असताना काही कारणाने मला मंत्रिमंडळात घेण्यात आले नव्हते. सिद्धरामय्या यांच्या कारकीर्दीतही मला मंत्रिपद मिळाले नव्हते. आमच्यासाठी पद नव्हे, तर पक्ष महत्त्वाचा आहे.

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाKarnatak Politicsकर्नाटक राजकारण