शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Coronavirus: ‘या’ तारखेनंतर देशात दिवसाला साडेचार लाख कोरोना रुग्ण आढळतील; IIT चा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 19:02 IST

देशात कोरोना महामारीमुळे २ हजार ८१२ लोकांचा जीव गेला आहे. सध्या देशात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २८ लाख १३ हजार ६५८ पर्यंत पोहचली आहे.

ठळक मुद्देमे च्या पंधरवड्यात सक्रीय रुग्णांच्या संख्येत १० लाखांनी वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे.मागील आठवड्यात ११ ते १५ मे मध्ये कोरोना कहर वाढू शकतो असं सांगितलं जात होतंसंक्रीय रुग्णांची संख्या १४-१८ मे मध्ये शिखर गाठणार आहे. दिवसांला साडेतीन लाखापासून साडेचार लाखापर्यंत नवीन रुग्ण आढळतील.

नवी दिल्ली – भारतीय औद्योगिक संस्था(IIT)च्या वैज्ञानिकांनी गणितीय मॉडेलच्या आधारे भारतात कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेत सक्रीय रुग्णांची संख्या १४ ते १८ मे दरम्यान ३८-४८ लाखांपर्यंत पोहचू शकते. ४ ते ८ मेमध्ये कोरोना संक्रमणाचे रुग्ण दिवसाला साडेचार लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. भारतात सोमवारी कोरोना संक्रमित ३ लाख ५२ हजार ९९१ रुग्ण आढळून आले आहेत.

देशात कोरोना महामारीमुळे २ हजार ८१२ लोकांचा जीव गेला आहे. सध्या देशात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २८ लाख १३ हजार ६५८ पर्यंत पोहचली आहे. आयआयटी कानपूर आणि हैदराबादच्या वैज्ञानिकांनी सूत्र नावाचं मॉडेलचा वापर करत मे च्या पंधरवड्यात सक्रीय रुग्णांच्या संख्येत १० लाखांनी वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे. नव्या अंदाजानुसार या आकडेवारीत सुधारणा झाली आहे. मागील आठवड्यात ११ ते १५ मे मध्ये कोरोना कहर वाढू शकतो असं सांगितलं जात होतं. मे च्या अखेरपर्यंत कोरोना रुग्ण संख्येत घट होईल असंही सांगण्यात आलं आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला वैज्ञानिकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार देशात १५ एप्रिलच्या दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या टॉपवर असेल सांगितलं होतं. परंतु हे खरं झालं नाही. आयआयटी कानपूरमध्ये कॉम्प्युटर आणि विज्ञान अभियांत्रिकीचे प्राध्यापक मनिंदर अग्रवाल यांनी सांगितले की, नव्या अंदाजानुसार मे महिन्यात रुग्णसंख्या वाढू शकते. संक्रीय रुग्णांची संख्या १४-१८ मे मध्ये शिखर गाठणार आहे. दिवसांला साडेतीन लाखापासून साडेचार लाखापर्यंत नवीन रुग्ण आढळतील.

आता घरातही मास्क घालण्याची वेळ

देशात सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या नीती आयोगातील आरोग्य विभागातील सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोनाच्या या गंभीर काळात विनाकारण घराबाहेर पडू नका. एवढेच नव्हे, तर घरातील सदस्यांनी कुटुंबांसोबत घरबसल्या मास्क घाला. मास्क घालणे अतिशय महत्त्वाचे आहे. याशिवाय कोणालाही घरी बोलावू नका, असे पॉल यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Indiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या