शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

"३९ लाख मतदार सगळीकडे फिरणार; महाराष्ट्र पॅटर्न आता दिल्ली, बिहारमध्ये राबवणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:15 IST

३९ लाख मतदार बिहारला जाणार, त्यानंतर उत्तर प्रदेशात जाणार. हा एक नवीन पॅटर्न बनला आहे असं राऊतांनी सांगितले.

नवी दिल्ली - निवडणूक आयोग सरकारची गुलामी करतंय. आम्ही वारंवार राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आमचं डोकं फोडलं. ३९ लाख मतदार कुठून आले आणि कुठे जाणार, आता हे ३९ लाख मतदार बिहारला जाणार. नावे तीच राहणार, आधार कार्ड तीच राहणार, फक्त ते मतदार फिरत राहणार. काही दिल्लीत आले, काही बिहारला जातील. महाराष्ट्र पॅटर्न दिल्ली, बिहार मग उत्तर प्रदेशातही राबवणार अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. दिल्लीत राहुल गांधी, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, ३९ लाख मतदार बिहारला जाणार, त्यानंतर उत्तर प्रदेशात जाणार. हा एक नवीन पॅटर्न बनला आहे. याच पॅटर्नने निवडणूक लढवली जाते आणि जिंकली जाते. राहुल गांधींच्या नेतृत्वात आम्ही प्रश्न उभे केलेत. देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर या प्रश्नांची उत्तरे माध्यमांनी विचारली पाहिजे. लोकांमध्ये जागरुकता आली पाहिजे. आम्ही लढत राहू. आम्हाला महाराष्ट्रात हरवलं गेले, हा मुद्दा देशासमोर राहुल गांधींनी आणला. लोकांनी उठाव करून या प्रश्नांची उत्तरे विचारली पाहिजे असं त्यांनी सांगितले.

आमची मते कमी नाही, भाजपाची मते वाढली - काँग्रेस

तर महाराष्ट्राच्या निवडणुकीत मतदार याद्यांवर प्रश्न उभे राहतात. दरवर्षी जितके मतदार यादीत नोंदवले जातात त्याहून अधिक फक्त ५ महिन्यात नोंदणी केली. अतिरिक्त मतदार वाढवले हे कोण आहे, ते कुठून आले. महाराष्ट्राची वयस्क लोकसंख्या सरकारच्या आकडेवारीनुसार ९.५४ कोटी आहे. महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा अधिक मतदार कसे वाढले, कामठी विधानसभेत १.६३ लाख मते लोकसभेला काँग्रेसला मिळाली, विधानसभेलाही तितकेच मतदान झाले. मात्र या मतदारसंघात ३५ हजार मते वाढली आणि ती सगळी भाजपाच्या खात्यात गेली आणि भाजपा निवडणूक जिंकली. अशी अनेक उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात आमची मते कमी झाली नाहीत, भाजपाची मते वाढली आहेत. जिथं भाजपाचा स्ट्राईक रेट ९० टक्क्याहून अधिक आहे तिथे मतदार वाढले आहेत असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी केला.

दरम्यान, बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, मशीन बंद करावे. आमचा पक्ष फोडले, आमदार, खासदार फोडले, आमची लढाई आजही सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आम्हाला जे चिन्ह दिले, त्यातही साधर्म्य असलेले दिले. लोकसभेला सातारा मतदारसंघात आमचा विजय झाला असता परंतु तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस यात मतांमध्ये तफावत झाली. मतदार याद्यांचा गोंधळ आहे. सशक्त लोकशाही ठेवायची असेल पारदर्शक निवडणूक घ्यायला हवी. निवडणूक आयोग पारदर्शी असायला हवा. आम्हाला मतदार यादी, मतदारांचे फोटो, नावे द्यावीत ही आमची मागणी आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSanjay Rautसंजय राऊतSupriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग