शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
4
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
5
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचे मृतदेह सापडले, परिसरात खळबळ!
6
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
7
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
8
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
9
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
10
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
11
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
12
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
13
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
14
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
15
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
16
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
17
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
18
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
19
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
20
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी

"३९ लाख मतदार सगळीकडे फिरणार; महाराष्ट्र पॅटर्न आता दिल्ली, बिहारमध्ये राबवणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:15 IST

३९ लाख मतदार बिहारला जाणार, त्यानंतर उत्तर प्रदेशात जाणार. हा एक नवीन पॅटर्न बनला आहे असं राऊतांनी सांगितले.

नवी दिल्ली - निवडणूक आयोग सरकारची गुलामी करतंय. आम्ही वारंवार राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आमचं डोकं फोडलं. ३९ लाख मतदार कुठून आले आणि कुठे जाणार, आता हे ३९ लाख मतदार बिहारला जाणार. नावे तीच राहणार, आधार कार्ड तीच राहणार, फक्त ते मतदार फिरत राहणार. काही दिल्लीत आले, काही बिहारला जातील. महाराष्ट्र पॅटर्न दिल्ली, बिहार मग उत्तर प्रदेशातही राबवणार अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. दिल्लीत राहुल गांधी, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, ३९ लाख मतदार बिहारला जाणार, त्यानंतर उत्तर प्रदेशात जाणार. हा एक नवीन पॅटर्न बनला आहे. याच पॅटर्नने निवडणूक लढवली जाते आणि जिंकली जाते. राहुल गांधींच्या नेतृत्वात आम्ही प्रश्न उभे केलेत. देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर या प्रश्नांची उत्तरे माध्यमांनी विचारली पाहिजे. लोकांमध्ये जागरुकता आली पाहिजे. आम्ही लढत राहू. आम्हाला महाराष्ट्रात हरवलं गेले, हा मुद्दा देशासमोर राहुल गांधींनी आणला. लोकांनी उठाव करून या प्रश्नांची उत्तरे विचारली पाहिजे असं त्यांनी सांगितले.

आमची मते कमी नाही, भाजपाची मते वाढली - काँग्रेस

तर महाराष्ट्राच्या निवडणुकीत मतदार याद्यांवर प्रश्न उभे राहतात. दरवर्षी जितके मतदार यादीत नोंदवले जातात त्याहून अधिक फक्त ५ महिन्यात नोंदणी केली. अतिरिक्त मतदार वाढवले हे कोण आहे, ते कुठून आले. महाराष्ट्राची वयस्क लोकसंख्या सरकारच्या आकडेवारीनुसार ९.५४ कोटी आहे. महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा अधिक मतदार कसे वाढले, कामठी विधानसभेत १.६३ लाख मते लोकसभेला काँग्रेसला मिळाली, विधानसभेलाही तितकेच मतदान झाले. मात्र या मतदारसंघात ३५ हजार मते वाढली आणि ती सगळी भाजपाच्या खात्यात गेली आणि भाजपा निवडणूक जिंकली. अशी अनेक उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात आमची मते कमी झाली नाहीत, भाजपाची मते वाढली आहेत. जिथं भाजपाचा स्ट्राईक रेट ९० टक्क्याहून अधिक आहे तिथे मतदार वाढले आहेत असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी केला.

दरम्यान, बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, मशीन बंद करावे. आमचा पक्ष फोडले, आमदार, खासदार फोडले, आमची लढाई आजही सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आम्हाला जे चिन्ह दिले, त्यातही साधर्म्य असलेले दिले. लोकसभेला सातारा मतदारसंघात आमचा विजय झाला असता परंतु तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस यात मतांमध्ये तफावत झाली. मतदार याद्यांचा गोंधळ आहे. सशक्त लोकशाही ठेवायची असेल पारदर्शक निवडणूक घ्यायला हवी. निवडणूक आयोग पारदर्शी असायला हवा. आम्हाला मतदार यादी, मतदारांचे फोटो, नावे द्यावीत ही आमची मागणी आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSanjay Rautसंजय राऊतSupriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग