शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
4
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
5
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
6
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
7
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
8
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
9
चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
10
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
11
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
12
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
13
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
14
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
15
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
16
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
17
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
18
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
19
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
20
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

आंध्र प्रदेशात रेल्वे अपघातात ३९ ठार

By admin | Updated: January 23, 2017 04:23 IST

जगदलपूर - भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने, ३९ जण ठार तर ६९ प्रवासी जखमी झाल्याची दुर्घटना आंध्र प्रदेशात

कुनेरु (आंध्र प्रदेश) : जगदलपूर - भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने, ३९ जण ठार तर ६९ प्रवासी जखमी झाल्याची दुर्घटना आंध्र प्रदेशात विजयनगर जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा घडली. गत तीन महिन्यांतील हा तिसरा मोठा अपघात आहे. जखमींपैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मृतात बहुतांश ओडिशातील नागरिक आहेत. या अपघातातील मृतांची संख्या वाढू शकते. कारण अपघातग्रस्त डब्यात आणखी काही प्रवासी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. ही रेल्वे जगदलपूरहून भुवनेश्वरला जात असताना, शनिवारी रात्री ११च्या सुमारास हा अपघात झाला. कुनेरु स्टेशनजवळ रेल्वेचे इंजिन आणि नऊ डब्बे रुळावरून घसरले. यात दोन वातानुकूलित कोच, चार स्लिपर कोच, दोन सामान्य श्रेणीतील कोचचा यात समावेश आहे. अपघातानंतर यातील चार डबे उलटले. नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या कुनेरु भागात रेल्वेला अपघात झाल्याने संशय व्यक्त होत असला, तरी याचा माओवाद्यांशी संबंध असल्याची शक्यता ओडिशा पोलिसांनी फेटाळली आहे, तर रेल्वे रुळाला तडे गेल्यानेच हा अपघात झाला असावा, अशी शक्यता रेल्वे विभागाने व्यक्त केली जात आहे. (वृत्तसंस्था)