शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

देशात पाच वर्षांत प्राप्तिकर विभागाच्या ३७८७ धाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 05:28 IST

२९ प्रकरणांत दोषसिद्धी : देशभरात ५८९० कोटींची संपत्ती केली जप्त

हरीश गुप्तानवी दिल्ली : अजब वाटत असले, तरी खरे आहे. गेल्या पाच वर्षांत प्राप्तिकर विभागाने देशभरात ३७८७ समूहांवर धाडी टाकून जप्तीची मोहीम राबविली. यापैकी ५० टक्के प्रकरणांत खटले भरण्यात आले. प्राप्तिकर विभागाला १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२२ दरम्यान फक्त २९ प्रकरणांत दोषसिद्धी करता आली. याच अवधीत १८ प्रकरणांत कोर्टाने निर्दोष मुक्ततेचे आदेश दिले.

केंंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षांतील एकूण निष्पत्तीवर नजर टाकल्यास कार्पोरेट आणि समूहांनी दडविलेले उत्पन्न आणि भ्रष्टाचाराविरुद्ध प्राप्तिकर विभागाने लढा देण्याचा जोरदार प्रयत्न केल्याचे दिसते. 

११५ खटले    उदाहरणार्थ, २०१७-१८ दरम्यान प्राप्तिकर विभागाने ५६० प्रकरणांत खटले भरून २३ प्रकरणांत दोषसिद्धी केली; परंतु, पुढच्या वर्षांत ७७१ संस्थाविरुद्ध खटले भरूनही दोषसिद्धतेच्या दृष्टीने हाती काहीही पडले नाही. तथापि,  ५ संस्थांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.  त्यानंतर खटल्यांची संख्या सातत्याने कमी होत गेली.     २०१९-२० मध्ये  ३६५ कंपन्यांविरुद्व खटले दाखल करण्यात आल्यानंतर पुढच्याच वर्षी ही संख्या १४५ आणि २०२१-२२ मध्ये ११५ वर आली.

६८९९ प्रकरणे प्रलंबित३१ मार्च २०२२ पर्यंत ६८९९ प्रकरणे प्रलंबित आहेत. अर्थात, प्राप्तिकर विभागाने गेल्या पाच वर्षांत  ५८९० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. दिग्विजय सिंह यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला देण्यात आलेल्या उत्तरात सरकारने ही माहिती दिली.

प्राप्तिकर विभागाच्या वर्षनिहाय धाडी २०१७ -१८        ५८२२०१८-१९        ९६६ २०१९-२०        ९८४ २०२०-२१        ५६९२०२१-२२        ६८६ (संसदेत सरकारने दिलेली माहिती)

n    २०१९-२० मध्ये  ३६५ कंपन्यांविरुद्व खटले दाखल n    ७७१ संस्थाविरुद्ध खटले भरूनही दोषसिद्धतेच्या दृष्टीने मोठे यश नाहीn    १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२२ दरम्यान फक्त २९ प्रकरणांत दोषसिद्धी 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयCrime Newsगुन्हेगारी