शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

देशात पाच वर्षांत प्राप्तिकर विभागाच्या ३७८७ धाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 05:28 IST

२९ प्रकरणांत दोषसिद्धी : देशभरात ५८९० कोटींची संपत्ती केली जप्त

हरीश गुप्तानवी दिल्ली : अजब वाटत असले, तरी खरे आहे. गेल्या पाच वर्षांत प्राप्तिकर विभागाने देशभरात ३७८७ समूहांवर धाडी टाकून जप्तीची मोहीम राबविली. यापैकी ५० टक्के प्रकरणांत खटले भरण्यात आले. प्राप्तिकर विभागाला १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२२ दरम्यान फक्त २९ प्रकरणांत दोषसिद्धी करता आली. याच अवधीत १८ प्रकरणांत कोर्टाने निर्दोष मुक्ततेचे आदेश दिले.

केंंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षांतील एकूण निष्पत्तीवर नजर टाकल्यास कार्पोरेट आणि समूहांनी दडविलेले उत्पन्न आणि भ्रष्टाचाराविरुद्ध प्राप्तिकर विभागाने लढा देण्याचा जोरदार प्रयत्न केल्याचे दिसते. 

११५ खटले    उदाहरणार्थ, २०१७-१८ दरम्यान प्राप्तिकर विभागाने ५६० प्रकरणांत खटले भरून २३ प्रकरणांत दोषसिद्धी केली; परंतु, पुढच्या वर्षांत ७७१ संस्थाविरुद्ध खटले भरूनही दोषसिद्धतेच्या दृष्टीने हाती काहीही पडले नाही. तथापि,  ५ संस्थांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.  त्यानंतर खटल्यांची संख्या सातत्याने कमी होत गेली.     २०१९-२० मध्ये  ३६५ कंपन्यांविरुद्व खटले दाखल करण्यात आल्यानंतर पुढच्याच वर्षी ही संख्या १४५ आणि २०२१-२२ मध्ये ११५ वर आली.

६८९९ प्रकरणे प्रलंबित३१ मार्च २०२२ पर्यंत ६८९९ प्रकरणे प्रलंबित आहेत. अर्थात, प्राप्तिकर विभागाने गेल्या पाच वर्षांत  ५८९० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. दिग्विजय सिंह यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला देण्यात आलेल्या उत्तरात सरकारने ही माहिती दिली.

प्राप्तिकर विभागाच्या वर्षनिहाय धाडी २०१७ -१८        ५८२२०१८-१९        ९६६ २०१९-२०        ९८४ २०२०-२१        ५६९२०२१-२२        ६८६ (संसदेत सरकारने दिलेली माहिती)

n    २०१९-२० मध्ये  ३६५ कंपन्यांविरुद्व खटले दाखल n    ७७१ संस्थाविरुद्ध खटले भरूनही दोषसिद्धतेच्या दृष्टीने मोठे यश नाहीn    १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२२ दरम्यान फक्त २९ प्रकरणांत दोषसिद्धी 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयCrime Newsगुन्हेगारी