शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

पोलीस शिपायाच्या नोकरीसाठी ३,७०० पीएचडीधारक अर्जदार! ६२ जागांसाठी ९३ हजार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 07:37 IST

उत्तर प्रदेश पोलिसांच्या दळणवळण विभागातील निरोप्या शिपायांच्या ६२ रिक्त जागा भरण्यासाठी तब्बल ९३,५०० अर्ज आले असून त्यापैकी ५० हजारांहून अधिक अर्जदार पदवीधर, २८ हजार पदव्युत्तर पदवीधर तर ३,७०० चक्क पीएचडीधारक आहेत.

लखनऊ : उत्तर प्रदेश पोलिसांच्या दळणवळण विभागातील निरोप्या शिपायांच्या ६२ रिक्त जागा भरण्यासाठी तब्बल ९३,५०० अर्ज आले असून त्यापैकी ५० हजारांहून अधिक अर्जदार पदवीधर, २८ हजार पदव्युत्तर पदवीधर तर ३,७०० चक्क पीएचडीधारक आहेत.या रिक्त जागा भरण्यासाठी १२ वर्षांनंतर प्रथमच जाहिरात देऊन अर्ज मागविण्यात आले. अर्ज करण्याची मुदत १६ आॅगस्ट रोजी संपली. या पदावर नेमल्या जाणाऱ्या व्यक्तीचे काम खात्याचे टपाल आणि निरोप एका कार्यालयातून दुसºया कार्यालयात पोहोचविणे असे आहे. भरती नियमांनुसार या पदासाठी शैक्षणिक अर्हता इयत्ता पाचवी उत्तीर्ण अशी आहे.बेसुमार बेरोजगारीमुळे बाहेर रोजगाराच्या संधी नसल्याने हजारो उच्चशिक्षित उमेदवारांनीही शिपायांच्या या पदासाठी अर्ज केले आहेत. पूर्णवेळ सरकारी नोकरी व महिना २किमान २० हजार रुपये पगार एवढयासाठी हे उच्चशिक्षित तरुण चतुर्थश्रेणीची नोकरी करण्यास तयार आहेत. एकूण ९३,५०० अर्जदारांमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षण झालेले फक्त ७,४०० अर्जदार आहेत. बाकी सर्व किमान शैक्षणिक अर्हतेहून कितीतरी जास्त शिकलेले आहेत. त्यापैकी अनेकांनी एमबीए केलेले आहे तर काही बीटेकही झालेले आहेत.पोलिसांच्या संबंधित विभागातील एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, पूर्वी या पदासाठी अर्ज करणाºयाने सायकल चालविता येते, असे स्वसाक्ष्यांकित हमीपत्र देणे पुरेसे होते. परंतु आता एवढ्या मोठ्या संक्येने उच्चशिक्षितांचे अर्ज आल्याने त्यांना चाळणी लावण्यासाठी कोणती आणि कशी चाचणी घ्यायची हे ठरविण्यात येत आहे.अतिरिक्त पोलीस महासंचालक (टेलिकॉम) पी. के. तिवारी यांनी सांगितले की, किमान शैक्षणिक अर्हतेहून जास्त शिकलेले आहेत म्हणून आम्ही कोणाचाही अर्ज प्राथमिक फेरीत फेटाळणार नाही. उलट एवढे शिकलेले कर्मचारी खात्याला मिळणे चांगले आहे. त्यांच्याकडून इतर कामेही करून घेतली जाऊ शकतील. ज्यांच्याकडे तांत्रिक कौशल्य आहे त्यांना शिपाई पदावरून लवकर वरची जागा मिळू शकेल.बहुसंख्य उमेदवार चांगले शिकलेलेबहुसंख्य उमेदवार चांगले शिकलेले असल्याने या वेळी प्रथमच या पदासाठी लेखी परीक्षा घेण्याचा आमचा विचार आहे, असे सांगून तिवारी म्हणाले की, परीक्षा पारदर्शी पद्धतीने व्हावी यासाठी हे काम बाहेरच्या संस्थेस देण्याचा विचार आहे.

टॅग्स :Policeपोलिस