शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

३६ जवानांना तीन वर्षांत वीरमरण; राजाैरी, पुंछ भागाला बनले नवा तळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 05:50 IST

स्थानिक नागरिक दहशतवादाकडे वळू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे.

- सुरेश एस. डुग्गरलोकमत न्यूज नेटवर्कजम्मू : कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी राजौरी आणि पूंछ जिल्ह्याला आपला नवा तळ बनवला आहे. सीमेला लागून असलेले हे दोन जिल्हे दहशतवादमुक्त झाले असून तिथे शांतता प्रस्थापित झाल्याचे अधिकाऱ्यांना वाटत होते, पण ते फोल ठरले आहे. गुरुवारी दहशतवाद्यांनी आणखी पाच जवानांची हत्या केली. या भागांमध्ये गेल्या ३६ महिन्यांत म्हणजेच तीन वर्षांत शहीद झालेल्या जवानांची संख्या ३६च्या वर पोहोचली आहे. याच काळात दहशतवाद्यांनी १२ नागरिकांचीही हत्या केली. 

स्थानिक नागरिक दहशतवादाकडे वळू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. या वर्षी २२ नोव्हेंबर आणि आता २१ डिसेंबरला अवघ्या महिनाभरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १० जवान शहीद झाले. या वर्षी ६ मे रोजी तब्बल १० महिन्यांनी दहशतवाद्यांनी दरहालमध्ये जवानांवर हल्ला केला हाेता.  त्यात पाच जवान शहीद झाले होते. मात्र, या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना लष्कराने अद्याप पकडलेले नाही. 

दहशतवाद्यांच्या शोधासाठी ड्रोनची मदतnलष्करी जवानांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलाने लष्करी हेलिकॉप्टर, ड्रोन तसेच लष्करातील श्वान पथकांची मदत घेण्यात आली आहे. nया मोहिमेसाठी लष्कराच्या जवानांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राजौरी, पुंछ भागात घातपाती कारवाया करणारे दहशतवादी हे पाकिस्तानी लष्करातील माजी सैनिक असल्याची माहिती मिळाली आहे.nत्यांची संख्या ७ ते १० आहे. गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता दोन लष्करी वाहनांवर ढेरा की गली आणि बुल्फियाझ मार्गावर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद व दोन जण जखमी झाले होते.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्ला