शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

३६ जवानांना तीन वर्षांत वीरमरण; राजाैरी, पुंछ भागाला बनले नवा तळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 05:50 IST

स्थानिक नागरिक दहशतवादाकडे वळू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे.

- सुरेश एस. डुग्गरलोकमत न्यूज नेटवर्कजम्मू : कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी राजौरी आणि पूंछ जिल्ह्याला आपला नवा तळ बनवला आहे. सीमेला लागून असलेले हे दोन जिल्हे दहशतवादमुक्त झाले असून तिथे शांतता प्रस्थापित झाल्याचे अधिकाऱ्यांना वाटत होते, पण ते फोल ठरले आहे. गुरुवारी दहशतवाद्यांनी आणखी पाच जवानांची हत्या केली. या भागांमध्ये गेल्या ३६ महिन्यांत म्हणजेच तीन वर्षांत शहीद झालेल्या जवानांची संख्या ३६च्या वर पोहोचली आहे. याच काळात दहशतवाद्यांनी १२ नागरिकांचीही हत्या केली. 

स्थानिक नागरिक दहशतवादाकडे वळू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. या वर्षी २२ नोव्हेंबर आणि आता २१ डिसेंबरला अवघ्या महिनाभरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १० जवान शहीद झाले. या वर्षी ६ मे रोजी तब्बल १० महिन्यांनी दहशतवाद्यांनी दरहालमध्ये जवानांवर हल्ला केला हाेता.  त्यात पाच जवान शहीद झाले होते. मात्र, या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना लष्कराने अद्याप पकडलेले नाही. 

दहशतवाद्यांच्या शोधासाठी ड्रोनची मदतnलष्करी जवानांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलाने लष्करी हेलिकॉप्टर, ड्रोन तसेच लष्करातील श्वान पथकांची मदत घेण्यात आली आहे. nया मोहिमेसाठी लष्कराच्या जवानांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राजौरी, पुंछ भागात घातपाती कारवाया करणारे दहशतवादी हे पाकिस्तानी लष्करातील माजी सैनिक असल्याची माहिती मिळाली आहे.nत्यांची संख्या ७ ते १० आहे. गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता दोन लष्करी वाहनांवर ढेरा की गली आणि बुल्फियाझ मार्गावर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद व दोन जण जखमी झाले होते.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्ला