शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

एकाच वेळी ३६ उपग्रह सोडले...; पंतप्रधान मोदींनी मन की बातमध्ये तरुणांचे केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 12:31 IST

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम छठ सणाच्या शुभ मुहूर्तावर देशवासियांना शुभेच्छा दिल्या आणि सर्वांच्या कल्याणासाठी षष्ठी मातेकडून आशीर्वाद मागितले.

नवी दिल्ली: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम छठ सणाच्या शुभ मुहूर्तावर देशवासियांना शुभेच्छा दिल्या आणि सर्वांच्या कल्याणासाठी षष्ठी मातेकडून आशीर्वाद मागितले. सौरऊर्जेमुळे जनतेला काय फायदा होत आहे, यावर त्यांनी चर्चा केली. तेथील लाभार्थ्यांशीही चर्चा केली. 

यापूर्वी २५ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संबोधित केले होते. यावेळी त्यांनी मोठी घोषणा करत चंदीगड विमानतळाचे नाव भगतसिंग यांचे नाव देण्याची घोषणा केली. २०१४ पासून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान मोदी मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संबोधित करतात.

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी शाळकरी मुलांसोबत धावले; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा उडाला गोंधळ

उद्या म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी भारताचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. सरदार पटेल यांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, उद्या, ३१ ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस आहे, जो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचा एक पुण्यपूर्ण प्रसंग आहे. या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यात RunForUnity चे आयोजन केले जाते. ही शर्यत देशातील एकतेचा धागा मजबूत करते, तरुणांना प्रेरणा देते, असंही मोदी म्हणाले. 

"अनेकवेळा आपण पाहतो की जेव्हा विद्यार्थी शक्तीचा विचार केला जातो तेव्हा त्याची व्याप्ती विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांशी जोडून कमी केली जाते. पण विद्यार्थी शक्तीची व्याप्ती खूप मोठी आहे, विद्यार्थी शक्ती हा भारताला सशक्त बनवण्याचा आधार आहे. असंही मोदी म्हणाले. 

पंतप्रधान मोदींनी इस्रोच्या शक्तिशाली रॉकेटवरही चर्चा केली. "भारताने एकाच वेळी ३६ उपग्रह सोडले आहेत. दिवाळीच्या एक दिवस आधी मिळालेले हे यश म्हणजे एक प्रकारे आपल्या तरुणांकडून देशाला दिवाळीची खास भेट होती. पूर्वी भारतातील अंतराळ क्षेत्र सरकारी यंत्रणेच्या कक्षेत मर्यादित होते. जेव्हा हे अंतराळ क्षेत्र भारतातील तरुणांसाठी, भारताच्या खासगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आले, तेव्हा त्यात क्रांतिकारी बदल होऊ लागले आहेत, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

सौरऊर्जेवर बोलताना मोदींनी गुजरातमधील सूर्या गाव मोढेराविषयी चर्चा केली. मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी तुम्ही गुजरातमधील देशातील पहिल्या सूर्य ग्राम - मोढेराबद्दल बरीच चर्चा ऐकली असेल. मोढेरा सूर्या गावातील बहुतांश घरांमध्ये सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. आता अनेक घरांना महिनाअखेर वीज बिल येत नाही, उलट विजेच्या कमाईचे पैसे मिळत आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMan ki Baatमन की बात