शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

राज्यात ३६ टक्के घरे नळपाणी योजनेच्या प्रतीक्षेत; बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंडची स्थिती खराब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 16:30 IST

८,९७० गावांत काम पूर्ण : बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंडची स्थिती खराब

-नितीन अग्रवालनवी दिल्ली : २०२४ पर्यंत घरोघरी नळाने पाणी पुरवठा केला जाईल, असा दावा केंद्र सरकार करीत आहे; परंतु, महाराष्ट्रातील २२ टक्के गावांत हे शक्य झाले आहे. राज्यातील ३१,६२६ गावे नळपाणी योजनेपासून दूर आहेत. यापैकी २९,१४२ गावांत अजूनही नळपाणी योजनेचे काम सुरू झालेले नाही.

महाराष्ट्रातील ३६ टक्के घरांत नळाने पाणी पोहोचलेले नाही. सरकारी आकडेवारीनुसार ९१.८२ लाख घरांना नळाने पाणी पुरवठा होत आहे. आकडेवारीनुसार राज्यातील जालना जिल्ह्यातील सर्व घरांना  नळाने पाणी पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत नळपाणी योजनेचे काम जालना जिल्ह्यात ९९.५१ टक्के, धुळे जिल्ह्यात ९०.९३ टक्के,  कोल्हापूरमध्ये ८१.५३ टक्के, वर्धा जिल्ह्यात ७९.७९ टक्के आणि नागपूर जिल्ह्यात ७५.३९ टक्के झाले आहे. याबाबतीत पालघर (३२.४४ टक्के), चंद्रपूर (३८.४३ टक्के), नंदुरबार (३८.९६ टक्के), बीड  (३९.९६ टक्के), गडचिरोली ( ४४.८७ टक्के), वाशिम (४७.२९ टक्के) आणि यवतमाळ (४८.१९ टक्के) मागे आहे.

४३.३८ लाख घरांना नळपाणी योजनेचा लाभ...

पंतप्रधान मोदी यांंनी १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रातील ४३,३८,८४१ घरांना नळाने पाणीपुरवठा करण्यात आला. सर्वाधिक घरे अहमदनगर (३,३०,७१५), जळगाव (२,८८,४९५), नाशिक (२,५९,८७८), पुणे (२,५९,५३८), सोलापूर (२,०१,४८४), यवतमाळ (१,८४,२४८) आणि कोल्हापूरमधील (१,८३,१८७) आहेत.

टॅग्स :Waterपाणीwest bengalपश्चिम बंगालJharkhandझारखंड