शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

राज्यात ३६ टक्के घरे नळपाणी योजनेच्या प्रतीक्षेत; बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंडची स्थिती खराब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 16:30 IST

८,९७० गावांत काम पूर्ण : बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंडची स्थिती खराब

-नितीन अग्रवालनवी दिल्ली : २०२४ पर्यंत घरोघरी नळाने पाणी पुरवठा केला जाईल, असा दावा केंद्र सरकार करीत आहे; परंतु, महाराष्ट्रातील २२ टक्के गावांत हे शक्य झाले आहे. राज्यातील ३१,६२६ गावे नळपाणी योजनेपासून दूर आहेत. यापैकी २९,१४२ गावांत अजूनही नळपाणी योजनेचे काम सुरू झालेले नाही.

महाराष्ट्रातील ३६ टक्के घरांत नळाने पाणी पोहोचलेले नाही. सरकारी आकडेवारीनुसार ९१.८२ लाख घरांना नळाने पाणी पुरवठा होत आहे. आकडेवारीनुसार राज्यातील जालना जिल्ह्यातील सर्व घरांना  नळाने पाणी पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत नळपाणी योजनेचे काम जालना जिल्ह्यात ९९.५१ टक्के, धुळे जिल्ह्यात ९०.९३ टक्के,  कोल्हापूरमध्ये ८१.५३ टक्के, वर्धा जिल्ह्यात ७९.७९ टक्के आणि नागपूर जिल्ह्यात ७५.३९ टक्के झाले आहे. याबाबतीत पालघर (३२.४४ टक्के), चंद्रपूर (३८.४३ टक्के), नंदुरबार (३८.९६ टक्के), बीड  (३९.९६ टक्के), गडचिरोली ( ४४.८७ टक्के), वाशिम (४७.२९ टक्के) आणि यवतमाळ (४८.१९ टक्के) मागे आहे.

४३.३८ लाख घरांना नळपाणी योजनेचा लाभ...

पंतप्रधान मोदी यांंनी १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रातील ४३,३८,८४१ घरांना नळाने पाणीपुरवठा करण्यात आला. सर्वाधिक घरे अहमदनगर (३,३०,७१५), जळगाव (२,८८,४९५), नाशिक (२,५९,८७८), पुणे (२,५९,५३८), सोलापूर (२,०१,४८४), यवतमाळ (१,८४,२४८) आणि कोल्हापूरमधील (१,८३,१८७) आहेत.

टॅग्स :Waterपाणीwest bengalपश्चिम बंगालJharkhandझारखंड