शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

राज्यात ३६ टक्के घरे नळपाणी योजनेच्या प्रतीक्षेत; बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंडची स्थिती खराब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 16:30 IST

८,९७० गावांत काम पूर्ण : बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंडची स्थिती खराब

-नितीन अग्रवालनवी दिल्ली : २०२४ पर्यंत घरोघरी नळाने पाणी पुरवठा केला जाईल, असा दावा केंद्र सरकार करीत आहे; परंतु, महाराष्ट्रातील २२ टक्के गावांत हे शक्य झाले आहे. राज्यातील ३१,६२६ गावे नळपाणी योजनेपासून दूर आहेत. यापैकी २९,१४२ गावांत अजूनही नळपाणी योजनेचे काम सुरू झालेले नाही.

महाराष्ट्रातील ३६ टक्के घरांत नळाने पाणी पोहोचलेले नाही. सरकारी आकडेवारीनुसार ९१.८२ लाख घरांना नळाने पाणी पुरवठा होत आहे. आकडेवारीनुसार राज्यातील जालना जिल्ह्यातील सर्व घरांना  नळाने पाणी पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत नळपाणी योजनेचे काम जालना जिल्ह्यात ९९.५१ टक्के, धुळे जिल्ह्यात ९०.९३ टक्के,  कोल्हापूरमध्ये ८१.५३ टक्के, वर्धा जिल्ह्यात ७९.७९ टक्के आणि नागपूर जिल्ह्यात ७५.३९ टक्के झाले आहे. याबाबतीत पालघर (३२.४४ टक्के), चंद्रपूर (३८.४३ टक्के), नंदुरबार (३८.९६ टक्के), बीड  (३९.९६ टक्के), गडचिरोली ( ४४.८७ टक्के), वाशिम (४७.२९ टक्के) आणि यवतमाळ (४८.१९ टक्के) मागे आहे.

४३.३८ लाख घरांना नळपाणी योजनेचा लाभ...

पंतप्रधान मोदी यांंनी १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रातील ४३,३८,८४१ घरांना नळाने पाणीपुरवठा करण्यात आला. सर्वाधिक घरे अहमदनगर (३,३०,७१५), जळगाव (२,८८,४९५), नाशिक (२,५९,८७८), पुणे (२,५९,५३८), सोलापूर (२,०१,४८४), यवतमाळ (१,८४,२४८) आणि कोल्हापूरमधील (१,८३,१८७) आहेत.

टॅग्स :Waterपाणीwest bengalपश्चिम बंगालJharkhandझारखंड