शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

डिजिटल इंडिया? 2014 पासून देशात 350 पेक्षा अधिकवेळा इंटरनेट सेवा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 19:48 IST

2018 मध्ये जगभरातील 67 टक्के इंटरनेट बंदीच्या घटना एकट्या भारतात

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडियाची घोषणा केली होती. मात्र २०१४ पासून देशात आतापर्यंत ३५७ वेळा इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या वर्षात सर्वाधिक १३४ वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. गेल्या वर्षात जगभरात झालेल्या इंटरनेट बंदीच्या घटनांची आकडेवारी पाहिल्यास त्यातील तब्बल ६७ टक्के घटना भारतात घडल्या आहेत. तर चालू वर्षात आतापर्यंत ९३ वेळा इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर मोदी सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतला. शंभरपेक्षा अधिक दिवस जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद होती. आता सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जवळपास देशभरात आंदोलनं सुरू आहेत. आसामसह ईशान्य भारतामधून या आंदोलनांना सुरुवात झाली. या आंदोलनांची तीव्रतादेखील जास्त आहे. त्यामुळेच ईशान्य भारतामधील बऱ्याच भागांमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली. २०१४ पासून देशभरात करण्यात इंटरनेट बंदीची आकडेवारी इंडिया टुडेनं प्रसिद्ध केली आहे. यानुसार २०१४ पासून आतापर्यंत देशात ३५७ वेळा इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. २०१४ मध्ये सहावेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. यानंतर इंटरनेट सेवा खंडित करण्याचं प्रमाण दुपटीनं वाढू लागलं. २०१५ मध्ये १४ वेळा, २०१६ मध्ये ३१ वेळा, २०१७ मध्ये ७९ वेळा इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली. २०१८ मध्ये हे प्रमाण थेट १३४ वर गेलं. चालू वर्षात १५ डिसेंबरपर्यंत देशात ९३ वेळा इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. 

टॅग्स :InternetइंटरनेटJammu Kashmirजम्मू-काश्मीर