शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
4
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
5
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
6
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
7
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
8
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
9
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
10
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
11
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
12
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
13
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
14
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
15
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
16
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
17
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
18
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
19
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
20
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!

Bharat Jodo Yatra: काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत ३५ मिनिटे भाषण, राहुल गांधी यांचा भाजप, संघावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 08:11 IST

Bharat Jodo Yatra: ‘भारत जोडो यात्रा भारताची उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष मूल्ये जतन करण्याच्या उद्देशाने होती.

नवी दिल्ली : ‘भारत जोडो यात्रा भारताची उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष मूल्ये जतन करण्याच्या उद्देशाने होती. देशातील उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांवर भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्याकडून आक्रमण होत आहे,’ असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यात्रेच्या समारोपप्रसंगी केला. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टीमध्ये संपली. शेर-ए-काश्मीर स्टेडियममध्ये समारोप समारंभात राहुल गांधी यांनी ३५ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला. 

त्यांना दु:ख कळेल कसे?राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, इथे आम्ही ४ दिवस फिरलो, भाजपचा कोणताही नेता असे फिरू शकणार नाही याची मी खात्री देतो. जम्मू-काश्मीरचे लोक त्यांना फिरू देणार नाहीत म्हणून नाही, तर त्यांना भीती वाटते म्हणून.’ ‘मला जम्मू-काश्मीरच्या लोकांना आणि लष्कर-सुरक्षा दलांना काही सांगायचे आहे. मला हिंसा समजते. मी हिंसा अनुभवली आहे. ज्याने हिंसा पाहिली नाही त्यांना हे समजणार नाही. काश्मिरी व सैनिकांप्रमाणेच मी माझ्या प्रियजनांना गमावल्याचे दुःख सहन केले. ही वेदना मोदी-शहा समजू शकत नाही,’ असे भावुक भाषण राहुल गांधी यांनी केले. यावेळी प्रियांका गांधी, मेहबूबा मुफ्तींची भाषणे झाली.

माझ्यावर हँडग्रेनेड फेकले नाही, प्रेम दिले‘मी जम्मूहून काश्मीरला जात होतो तेव्हा मला इशारा देण्यात आला की, तुमच्यावर ग्रेनेड फेकले जाईल. मी म्हणालो, या टी-शर्टचा रंग बदला, लाल करा. जे होईल ते पाहू; पण मला जे वाटले तेच झाले. जम्मू-काश्मीरच्या लोकांनी माझ्यावर हँडग्रेनेड फेकले नाही, त्यांनी मला उघड्या हातांनी प्रेम दिले,’ असे राहुल गांधी म्हणाले. 

असे फोन कॉल थांबावेत...‘मला हिंसा समजते. आजीला गोळी घातली ती जागा मी पाहिली, तेव्हा मी १४ वर्षांचा होतो. प्रियजन गमावले की हृदयात काय होते, त्यांना फोन आल्यावर कसे वाटते, हे मला, माझ्या बहिणीला समजते. असे फोन कॉल्स थांबले पाहिजेत, हेच आमचे उद्दिष्ट आहे, या देशाचा पाया तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विचारधारेच्या विरोधात एकत्र उभे राहू या,’ असेही राहुल गांधी म्हणाले. 

हिमवर्षावाचा आनंद श्रीनगरमध्ये सकाळपासून बर्फवृष्टी झाली. पण कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही. सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. भाषणादरम्यान बर्फवृष्टी यामुळे राहुल गांधींनी ‘फेरन’ ही काश्मिरी टोपी घातली. समारोपानंतर राहुल व प्रियांका यांनी एकमेकांवर बर्फ फेकत आनंद लुटला.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस