शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 14:35 IST

Noorjahan Mango: भारतात आंब्याच्या वेगवेगळ्या प्रजातींची वेगवेगळी वैशिष्टे दिसून येतात. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये सापडणाऱ्या सुमारे ३.५ किलो वजन आणि प्रतिकिलो १२०० रुपये दराने विक्री होणाऱ्या एका दुर्मीळ आंब्याची प्रजातीचं अस्तित्व सध्या संकटात आहे.

भारताचं राष्ट्रीय फळ असलेल्या आंब्याच्या देशभरात शेकडो प्रजाती आहेत. त्यात हापूस, केशर हे त्यातील सर्वात प्रसिद्ध आहेत. तसेच आंब्याच्या वेगवेगळ्या प्रजातींची वेगवेगळी वैशिष्टे दिसून येतात. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये सापडणाऱ्या सुमारे ३.५ किलो वजन आणि प्रतिकिलो १२०० रुपये दराने विक्री होणाऱ्या एका दुर्मीळ आंब्याची प्रजातीचं अस्तित्व सध्या संकटात आहे. मध्य प्रदेशमधील अलीराजपूर जिल्ह्यातील कट्ठीवाडी येथील दुर्मीळ नूरजहाँ आंब्याची आता मोजकीच झाडं उरली आहेत. त्यामुळे या आंब्याची प्रजाती वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आंब्याची ही दुर्मीळ प्रजाती वाचवण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा वापर करण्यात येत आहे.

मुळचा अफगाणिस्तानमधील असलेला नूरजहाँ आंबा त्याच्या मोठ्या आकारासाठी ओळखला जातो. या आंब्याच्या एका फळाचं वजन सुमारे ३.५ ते ४.५ किलोच्या दरम्यान असतं. तसेत बाजारामध्ये या आंब्याला १ हजार ते १२०० रुपये प्रतिकिलो एवढी किंमत मिळते.

इंदूर विभागाचे आयुक्त (महसूल) दीपक सिंह यांनी बागायतीसंबंधीच्याएका बैठकीत सांगितलं की, अलिराजपूर जिल्ह्यातील कट्ठीवाडा भागामध्ये नूरजहाँ आंब्याला वाचवण्यासाठीचे प्रयत्न अधिक वेगाने केले पाहिजेत. त्यांनी अलिराजपूर जिल्ह्यात आंब्याच्या झाडांच्या घटत असलेल्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली. तसेच वनविभागाला टिश्यू कल्चरच्या माध्यमातून नूरजहाँची नवी रोपटी तयार करण्याचे आदेश दिले. 

अलिराजपूरच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आर.के. यादव यांनी सांगितले की, नूरजहाँ आंब्याची फलधारणा होणारी केवळ १० झाडं उरली आहेत. मात्र आम्ही हार मानलेली नाही. आम्ही पाच वर्षांमध्ये वृक्षरोपन करून याची संख्या २०० पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही ही प्रजाती लुप्त होऊ देणार नाही.  त्यांनी सांगितले की, काही दशकांपूर्वी नूरजहाँ आंब्याचं कमाल वजन हे ४.५ किलोपर्यंत जायचं. मात्र आता ते घटून ३.५ ते ३.८ एवढं कमी झालं आहे.  

टॅग्स :MangoआंबाAgriculture Sectorशेती क्षेत्रMadhya Pradeshमध्य प्रदेश