शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 14:35 IST

Noorjahan Mango: भारतात आंब्याच्या वेगवेगळ्या प्रजातींची वेगवेगळी वैशिष्टे दिसून येतात. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये सापडणाऱ्या सुमारे ३.५ किलो वजन आणि प्रतिकिलो १२०० रुपये दराने विक्री होणाऱ्या एका दुर्मीळ आंब्याची प्रजातीचं अस्तित्व सध्या संकटात आहे.

भारताचं राष्ट्रीय फळ असलेल्या आंब्याच्या देशभरात शेकडो प्रजाती आहेत. त्यात हापूस, केशर हे त्यातील सर्वात प्रसिद्ध आहेत. तसेच आंब्याच्या वेगवेगळ्या प्रजातींची वेगवेगळी वैशिष्टे दिसून येतात. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये सापडणाऱ्या सुमारे ३.५ किलो वजन आणि प्रतिकिलो १२०० रुपये दराने विक्री होणाऱ्या एका दुर्मीळ आंब्याची प्रजातीचं अस्तित्व सध्या संकटात आहे. मध्य प्रदेशमधील अलीराजपूर जिल्ह्यातील कट्ठीवाडी येथील दुर्मीळ नूरजहाँ आंब्याची आता मोजकीच झाडं उरली आहेत. त्यामुळे या आंब्याची प्रजाती वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आंब्याची ही दुर्मीळ प्रजाती वाचवण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा वापर करण्यात येत आहे.

मुळचा अफगाणिस्तानमधील असलेला नूरजहाँ आंबा त्याच्या मोठ्या आकारासाठी ओळखला जातो. या आंब्याच्या एका फळाचं वजन सुमारे ३.५ ते ४.५ किलोच्या दरम्यान असतं. तसेत बाजारामध्ये या आंब्याला १ हजार ते १२०० रुपये प्रतिकिलो एवढी किंमत मिळते.

इंदूर विभागाचे आयुक्त (महसूल) दीपक सिंह यांनी बागायतीसंबंधीच्याएका बैठकीत सांगितलं की, अलिराजपूर जिल्ह्यातील कट्ठीवाडा भागामध्ये नूरजहाँ आंब्याला वाचवण्यासाठीचे प्रयत्न अधिक वेगाने केले पाहिजेत. त्यांनी अलिराजपूर जिल्ह्यात आंब्याच्या झाडांच्या घटत असलेल्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली. तसेच वनविभागाला टिश्यू कल्चरच्या माध्यमातून नूरजहाँची नवी रोपटी तयार करण्याचे आदेश दिले. 

अलिराजपूरच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आर.के. यादव यांनी सांगितले की, नूरजहाँ आंब्याची फलधारणा होणारी केवळ १० झाडं उरली आहेत. मात्र आम्ही हार मानलेली नाही. आम्ही पाच वर्षांमध्ये वृक्षरोपन करून याची संख्या २०० पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही ही प्रजाती लुप्त होऊ देणार नाही.  त्यांनी सांगितले की, काही दशकांपूर्वी नूरजहाँ आंब्याचं कमाल वजन हे ४.५ किलोपर्यंत जायचं. मात्र आता ते घटून ३.५ ते ३.८ एवढं कमी झालं आहे.  

टॅग्स :MangoआंबाAgriculture Sectorशेती क्षेत्रMadhya Pradeshमध्य प्रदेश