शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 14:35 IST

Noorjahan Mango: भारतात आंब्याच्या वेगवेगळ्या प्रजातींची वेगवेगळी वैशिष्टे दिसून येतात. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये सापडणाऱ्या सुमारे ३.५ किलो वजन आणि प्रतिकिलो १२०० रुपये दराने विक्री होणाऱ्या एका दुर्मीळ आंब्याची प्रजातीचं अस्तित्व सध्या संकटात आहे.

भारताचं राष्ट्रीय फळ असलेल्या आंब्याच्या देशभरात शेकडो प्रजाती आहेत. त्यात हापूस, केशर हे त्यातील सर्वात प्रसिद्ध आहेत. तसेच आंब्याच्या वेगवेगळ्या प्रजातींची वेगवेगळी वैशिष्टे दिसून येतात. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये सापडणाऱ्या सुमारे ३.५ किलो वजन आणि प्रतिकिलो १२०० रुपये दराने विक्री होणाऱ्या एका दुर्मीळ आंब्याची प्रजातीचं अस्तित्व सध्या संकटात आहे. मध्य प्रदेशमधील अलीराजपूर जिल्ह्यातील कट्ठीवाडी येथील दुर्मीळ नूरजहाँ आंब्याची आता मोजकीच झाडं उरली आहेत. त्यामुळे या आंब्याची प्रजाती वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आंब्याची ही दुर्मीळ प्रजाती वाचवण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा वापर करण्यात येत आहे.

मुळचा अफगाणिस्तानमधील असलेला नूरजहाँ आंबा त्याच्या मोठ्या आकारासाठी ओळखला जातो. या आंब्याच्या एका फळाचं वजन सुमारे ३.५ ते ४.५ किलोच्या दरम्यान असतं. तसेत बाजारामध्ये या आंब्याला १ हजार ते १२०० रुपये प्रतिकिलो एवढी किंमत मिळते.

इंदूर विभागाचे आयुक्त (महसूल) दीपक सिंह यांनी बागायतीसंबंधीच्याएका बैठकीत सांगितलं की, अलिराजपूर जिल्ह्यातील कट्ठीवाडा भागामध्ये नूरजहाँ आंब्याला वाचवण्यासाठीचे प्रयत्न अधिक वेगाने केले पाहिजेत. त्यांनी अलिराजपूर जिल्ह्यात आंब्याच्या झाडांच्या घटत असलेल्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली. तसेच वनविभागाला टिश्यू कल्चरच्या माध्यमातून नूरजहाँची नवी रोपटी तयार करण्याचे आदेश दिले. 

अलिराजपूरच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आर.के. यादव यांनी सांगितले की, नूरजहाँ आंब्याची फलधारणा होणारी केवळ १० झाडं उरली आहेत. मात्र आम्ही हार मानलेली नाही. आम्ही पाच वर्षांमध्ये वृक्षरोपन करून याची संख्या २०० पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही ही प्रजाती लुप्त होऊ देणार नाही.  त्यांनी सांगितले की, काही दशकांपूर्वी नूरजहाँ आंब्याचं कमाल वजन हे ४.५ किलोपर्यंत जायचं. मात्र आता ते घटून ३.५ ते ३.८ एवढं कमी झालं आहे.  

टॅग्स :MangoआंबाAgriculture Sectorशेती क्षेत्रMadhya Pradeshमध्य प्रदेश