शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

दोघांनाही ३४-३४ मते, ईश्वरी चिठ्ठीदेखील सिंघवींच्या नावाची, पण राज्यसभेचा नियम उलटा फिरला... हरले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 11:34 IST

How Abhishek Manu Singhavi Lost Rajya Sabha: चिठ्ठी जिंकली तरी सिंघवी कसे काय हरले... भल्या भल्या केसेस जिंकणाऱ्यां सिंघवींच्या आड एक नियम आला... 

हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीनंतर भूकंप झाला आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या मुलाने बंडखोरी केली आहे. विक्रमादित्य सिंह यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अशातच राज्यसभेचा निकाल धक्कादायक लागला असून काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याने मातब्बर नेते प्रसिद्ध कायदेतज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांना पराभूत व्हावे लागले आहे. 

काँग्रेसचे सिंघवी आणि भाजपाचे हर्ष महाजन यांना प्रत्येकी ३४-३४ मते पडली होती. यामुळे निकालासाठी ईश्वरी चिठ्ठीचा पर्याय निवडण्यात आला. भल्या भल्या केसेस जिंकणारे सिंघवी यांच्या नावाची चिठ्ठी निवडली गेली. परंतु, नशीबाचा फेरा एवढा विचित्र होता की नावाची चिठ्ठी येऊनही सिंघवी हरले होते. 

तुम्ही म्हणाल असे कसे झाले... चिठ्ठी जिंकली तरी सिंघवी कसे काय हरले... इकडे ग्राम पंचायत, जिल्हा परिषद किंवा अन्य निवडणुका असोत त्यामध्ये समसमान मते मिळाली तर ईश्वरी चिठ्ठी म्हणजेच ड्रॉ काढला जातो. यामध्ये ज्याच्या नावाची चिठ्ठी आली तो जिंकला असे जाहीर केले जाते. परंतु इथे उलटे आहे. ही राज्यसभेची निवडणूक होती. 

राज्यसभेच्या निवडणुकीत नियम वेगळे आहेत. निवडणूक आचार नियम, 1961 च्या नियम 75(4) अंतर्गत उमेदवारांना समान मते मिळाल्यास ड्रॉ काढला जातो. रिटर्निंग ऑफिसर उमेदवारांची नावे असलेल्या स्लिप एका बॉक्समध्ये ठेवतात. हा बॉक्स हलविला जातो. यानंतर चिठ्ठी काढली जाते. इथपर्यंत सर्व प्रक्रिया सारखीच असते. परंतु यापुढे सगळे बदलते. ज्याच्या नावाची चिठ्ठी य़ेते त्याला पराभूत असे जाहीर केले जाते. नेमके सिंघवींच्या बाबतीत हेच घडले. यामुळे नशीब असूनही पराभव पत्करावा लागला आहे.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसHimachal Pradeshहिमाचल प्रदेश