शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

कोरोनातून बरे झालेल्या ३३ टक्के विमा ग्राहकांना अद्यापही भरपाईची प्रतीक्षा, महाराष्ट्रात २९ हजार प्रकरणे प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 01:25 IST

insurance : केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार अनेक राज्यांमध्ये कोरोना कवच तसेच नियमित आरोग्य विम्याचा परतावा मिळालेला नाही.

नवी दिल्ली : कोरोनातून बरे होऊन घरी परतलेल्यांना आरोग्य विम्याचा परतावा मिळण्यास विलंब होत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत दाखल झालेल्या आरोग्य विम्याच्या दाव्यापैकी ६७ टक्के रुग्णांना उपचारावर झालेला खर्च काही प्रमाणात परत मिळाला. उरलेल्या ३३ टक्के रुग्णांना अद्यापही विम्याची रक्कम (भरपाई) मिळालेली नाही. केरळमध्ये महाराष्ट्रापेक्षा वाईट स्थिती आहे. तेथे केवळ ५८ टक्के परतावा विमा कंपन्यांनी दिला. विमा कंपन्यांसाठी नियामक असलेल्या आयआरडीएने अद्याप यासंदर्भात अहवाल प्रसिद्ध केलेला नाही. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार अनेक राज्यांमध्ये कोरोना कवच तसेच नियमित आरोग्य विम्याचा परतावा मिळालेला नाही. महाराष्ट्रात डिसेंबर अखेर एकूण २९ हजारांपेक्षाही जास्त प्रकरणे प्रलंबित आहेत. विमा कंपन्यांनी त्या-त्या महिन्याची आकडेवारी प्रसिद्ध करणे बंधनकारक असते. परंतु तांत्रिक कारणे दाखवून त्यासाठी देखील मुदत मागितली जाते. महाराष्ट्रात आतापर्यंत ९४ हजार दावे बरे झालेल्यांकडून करण्यात आले. 

विलंब का?अनेकदा रुग्ण घरी उपचार घेतात. काही जणांवर रुग्णालयात उपचार केले जातात. कागदपत्रांची पूर्तता न करणे हे एक मुख्य कारण विमा दाव्यांना विलंब होण्यामागे दिले जाते. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार ठराविक चाचण्यांचे शुल्क विमा कंपनी देते. काही चाचण्यांचा विम्यात समावेश होत नाही. रुग्णालयात कॅशलेस सुविधा नसणे हेही विलंबाचे कारण मानले जाते. 

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या