शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

२०० जागांवर ३२९५ उमेदवार; काँग्रेस, भाजपाला बंडखोरीने ग्रासले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 05:27 IST

राजस्थानात विधानसभेच्या २०० जागांसाठी एकूण ३२९५ अर्ज दाखल झाले आहेत. एकट्या जयपूर शहर व जिल्ह्यातील १९ जागांसाठी ५०२ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

- सुहास शेलार

जयपूर : राजस्थानात विधानसभेच्या २०० जागांसाठी एकूण ३२९५ अर्ज दाखल झाले आहेत. एकट्या जयपूर शहर व जिल्ह्यातील १९ जागांसाठी ५०२ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पण काँग्रेस व भारतीय जनता पार्टी या दोन्ही महत्त्वाच्या पक्षांना बंडखोरीने ग्रासले आहेत. काँग्रेसच्या बंडखोरांची संख्या ५0 च्या आसपास आहे. त्यात ४ माजी मंत्री आणि सहा माजी आमदार आहेत. गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक व राजीव सातव हे तिन्ही नेते या बंडखोरांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवाय अशोक गेहलोत, सचिन पायलट आणि अविनाश पांडे या नेत्यांनीही या बंडखोरांना भेटून त्यांना समजावण्याचे प्रयत्न चालवले आहेत.उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपाच्या ४ मंत्री व अनेक आमदारांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. त्यांच्यासह उमेदवारी न मिळालेल्या भाजपाच्या किमान ३0 जणांनी अपक्ष म्हणून उभे राहून भाजपाच्या अधिकृत उमेदवारांपुढेच आव्हान निर्माण केले आहे. मतांचे विभाजन रोखण्यासाठी बंडखोर उमेदवारांची मनधरणी करून, त्यांना उमेदवारी मागे घेण्याची विनवणी सुरू आहे. स्वत: वसुंधरा राजे, प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी, अविनाश राय खन्ना हे या बंडखोरांना समजावत आहेत. भाजपाने यंदा ४ मंत्री व ६0 आमदारांना उमेदवारी दिलेली नाही.श्रीगंगानगर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांतून १०९ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. शिवाय हनुमानगड जिल्ह्यातील पाच जागांसाठी ७३, बिकानेरच्या सात जागांसाठी ११४, चुरु जिल्ह्यातील सहा जागांसाठी १०२, झुंनझुनूच्या सात जागांसाठी १०८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.सिकर जिल्ह्याच्या आठमतदारसंघांतून १४०, अलवरच्या ११ जागांसाठी १९०, तर भरतपूरच्या सात जागांसाठी १०३ अर्ज दाखल झाले.जोधपूर जिल्ह्यातही १० जागांसाठी १६६ अर्ज दाखल झाले आहेत. राजपुतांचा प्रभाव असलेल्या चितौडगड जिल्ह्यातील पाच जागांसाठी ६९ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत....या उमेदवाराविरुद्ध पैसे वाटल्याचा गुन्हाआपल्या वाचाळपणामुळे नेहमी चर्चेत असलेले आमदार ज्ञानदेव अहुजा यांच्याविरुद्ध मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ते जयपूरच्या संगनेर मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढत आहेत.अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी मोठी रॅली काढली. यावेळी त्यांनी खिशातून १०० रूपयांच्या नोटा काढून रॅलीत सहभागी झालेल्यांना वाटले.हा व्हिडिओ व्हायरल झाला. याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने बनीपार्क पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकElectionनिवडणूक