शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

देशद्रोहाच्या कायद्याखाली ३२६ गुन्हे दाखल; ६ दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 08:00 IST

वादग्रस्त ठरलेल्या देशद्रोहाच्या कायद्याखाली देशात २०१४ ते २०१९ दरम्यान ३२६ गुन्हे दाखल झाले व फक्त सहा जण दोषी ठरले.

२०१४-२०१९ दरम्यानचा प्रवास : केंद्रीय गृहमंत्रालयाकडील माहिती

नवी दिल्ली : वादग्रस्त ठरलेल्या देशद्रोहाच्या कायद्याखाली देशात २०१४ ते २०१९ दरम्यान ३२६ गुन्हे दाखल झाले व फक्त सहा जण दोषी ठरले. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात भारतीय दंड संहितेचे कलम १२४ (ए) म्हणजेच देशद्रोहाच्या कायद्याचा फार मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचे निरीक्षण नोंदवून केंद्र सरकार हा कायदा का रद्द करीत नाही असा प्रश्न विचारला होता. ब्रिटिशांच्या भारतातील राजवटीत स्वातंत्र्य लढा दाबून टाकण्यासाठी महात्मा गांधी यांच्यासारख्या लोकांंना ‘शांत’करण्यासाठी देशद्रोहाचा कायद्याची तरतूद केली गेली होती.

गृहमंत्रालयाकडील माहितीनुसार सहा वर्षांत (२०१४ ते २०१९) देशद्रोहाच्या कायद्याखाली एकूम ३२६ गुन्हे नोंदवले गेले. त्यातील सर्वात जास्त ५४ होते आसाममधील.

- २०२० ची माहिती मंंत्रालयाने एकत्रित केलेली नाही, असे अधिकारी म्हणाले. 

- ५४ गुन्ह्यांत फक्त २६ प्रकरणांत आसाममध्ये आरोपपत्र दाखल झाले, तर २५ प्रकरणांत खटला पूर्ण्र झाला. 

- तथापि, राज्यात या सहा वर्षांत एकही आरोपी दोषी ठरलेला नाही, असे माहितीत म्हटले आहे. 

- झारखंडमध्ये याच सहा वर्षांत ४० गुन्हे दाखल असून २९ प्रकरणांत आरोपपत्र दाखल झाले आहे व १६ प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली व एक जण दोषी ठरला. 

- हरयाणात ३१ गुन्हे दाखल असून १९ प्रकरणांत आरोपपत्र दाखल झाले व एक जण दोषी ठरला.

टॅग्स :seditionदेशद्रोहCentral Governmentकेंद्र सरकारAssamआसाम