शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

एएन-32 अपघात : शहिदांचे पार्थिव शोधण्यास गेलेली रेस्क्यू टीमच संकटात; 9 दिवसांपासून अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 16:05 IST

साप, विंचूंसारख्या विषारी प्राण्यांसोबतच त्यांच्याकडे आवश्यक अन्न, पाणीही नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.

ईटानगर : गेल्या महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये अपघातग्रस्त झालेल्या हवाईदलाचे एएन-32 विमानतील शहिदांना आणण्यासाठी गेलेली रेस्क्यू टीमच खराब हवामानामुळे गेल्या 9 दिवसांपासून अडकली आहे. साप, विंचूंसारख्या विषारी प्राण्यांसोबतच त्यांच्याकडे आवश्यक अन्न, पाणीही नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. खराब हवामानामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचताही येत नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. स्थिती सुधारल्यानंतर हेलिकॉप्टरद्वारे एअरलिफ्ट करण्यात येईल. 

हवाई दलाचे मालवाहू विमान 3 जूनपासून गायब होते. अरुणाचलमध्ये हे विमान बेपत्ता झाले होते. यामध्ये हवाई दलाच्या 8 क्रू मेंबरसोबत 13 जण प्रवास करत होते. या विमानाच्या शोधासाठी सुखोई 30, सी 130 सुपर हर्क्युलस, पी8आय एअरक्राफ्ट, ड्रोन आणि सॅटेलाईटचा वापर करत शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याशिवाय नौदल, सैन्य, गुप्तहेर संघटना, आयटीबीपी आणि पोलिसांचे जवानही शोध घेत होते. आठ दिवस ही शोधमोहिम राबविण्यात आली होती. या दरम्यान, एमआय-17 हेलिकॉप्टरला या विमानाचे अवशेष जंगलात दिसून आले होते. 

यानंतर 12 जूनला सियांग जिल्ह्यातील जंगलामध्ये दोन हेलिकॉप्टरद्वारे 12 जणांच्या रेस्क्यू टीमला उतरविण्यात आले होते. 19 जूनला या डोंगररांगांमधून 6 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. तर 20 जूनला 7 जणांचे मृतदेह मिळाले होते. 

हवेचा प्रवाह मोठा असल्याने या भागात विमान किंवा हेलिकॉप्टर उडविणे कठीण बनते. यामुळे या ठिकाणी पोहोचणे हवाई दलाला शक्य झालेले नाही. अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास या जवानांनाही प्राणाला मुकावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलAccidentअपघात