शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

एएन-32 अपघात : शहिदांचे पार्थिव शोधण्यास गेलेली रेस्क्यू टीमच संकटात; 9 दिवसांपासून अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 16:05 IST

साप, विंचूंसारख्या विषारी प्राण्यांसोबतच त्यांच्याकडे आवश्यक अन्न, पाणीही नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.

ईटानगर : गेल्या महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये अपघातग्रस्त झालेल्या हवाईदलाचे एएन-32 विमानतील शहिदांना आणण्यासाठी गेलेली रेस्क्यू टीमच खराब हवामानामुळे गेल्या 9 दिवसांपासून अडकली आहे. साप, विंचूंसारख्या विषारी प्राण्यांसोबतच त्यांच्याकडे आवश्यक अन्न, पाणीही नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. खराब हवामानामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचताही येत नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. स्थिती सुधारल्यानंतर हेलिकॉप्टरद्वारे एअरलिफ्ट करण्यात येईल. 

हवाई दलाचे मालवाहू विमान 3 जूनपासून गायब होते. अरुणाचलमध्ये हे विमान बेपत्ता झाले होते. यामध्ये हवाई दलाच्या 8 क्रू मेंबरसोबत 13 जण प्रवास करत होते. या विमानाच्या शोधासाठी सुखोई 30, सी 130 सुपर हर्क्युलस, पी8आय एअरक्राफ्ट, ड्रोन आणि सॅटेलाईटचा वापर करत शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याशिवाय नौदल, सैन्य, गुप्तहेर संघटना, आयटीबीपी आणि पोलिसांचे जवानही शोध घेत होते. आठ दिवस ही शोधमोहिम राबविण्यात आली होती. या दरम्यान, एमआय-17 हेलिकॉप्टरला या विमानाचे अवशेष जंगलात दिसून आले होते. 

यानंतर 12 जूनला सियांग जिल्ह्यातील जंगलामध्ये दोन हेलिकॉप्टरद्वारे 12 जणांच्या रेस्क्यू टीमला उतरविण्यात आले होते. 19 जूनला या डोंगररांगांमधून 6 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. तर 20 जूनला 7 जणांचे मृतदेह मिळाले होते. 

हवेचा प्रवाह मोठा असल्याने या भागात विमान किंवा हेलिकॉप्टर उडविणे कठीण बनते. यामुळे या ठिकाणी पोहोचणे हवाई दलाला शक्य झालेले नाही. अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास या जवानांनाही प्राणाला मुकावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलAccidentअपघात