शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

एएन-32 अपघात : शहिदांचे पार्थिव शोधण्यास गेलेली रेस्क्यू टीमच संकटात; 9 दिवसांपासून अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 16:05 IST

साप, विंचूंसारख्या विषारी प्राण्यांसोबतच त्यांच्याकडे आवश्यक अन्न, पाणीही नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.

ईटानगर : गेल्या महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये अपघातग्रस्त झालेल्या हवाईदलाचे एएन-32 विमानतील शहिदांना आणण्यासाठी गेलेली रेस्क्यू टीमच खराब हवामानामुळे गेल्या 9 दिवसांपासून अडकली आहे. साप, विंचूंसारख्या विषारी प्राण्यांसोबतच त्यांच्याकडे आवश्यक अन्न, पाणीही नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. खराब हवामानामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचताही येत नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. स्थिती सुधारल्यानंतर हेलिकॉप्टरद्वारे एअरलिफ्ट करण्यात येईल. 

हवाई दलाचे मालवाहू विमान 3 जूनपासून गायब होते. अरुणाचलमध्ये हे विमान बेपत्ता झाले होते. यामध्ये हवाई दलाच्या 8 क्रू मेंबरसोबत 13 जण प्रवास करत होते. या विमानाच्या शोधासाठी सुखोई 30, सी 130 सुपर हर्क्युलस, पी8आय एअरक्राफ्ट, ड्रोन आणि सॅटेलाईटचा वापर करत शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याशिवाय नौदल, सैन्य, गुप्तहेर संघटना, आयटीबीपी आणि पोलिसांचे जवानही शोध घेत होते. आठ दिवस ही शोधमोहिम राबविण्यात आली होती. या दरम्यान, एमआय-17 हेलिकॉप्टरला या विमानाचे अवशेष जंगलात दिसून आले होते. 

यानंतर 12 जूनला सियांग जिल्ह्यातील जंगलामध्ये दोन हेलिकॉप्टरद्वारे 12 जणांच्या रेस्क्यू टीमला उतरविण्यात आले होते. 19 जूनला या डोंगररांगांमधून 6 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. तर 20 जूनला 7 जणांचे मृतदेह मिळाले होते. 

हवेचा प्रवाह मोठा असल्याने या भागात विमान किंवा हेलिकॉप्टर उडविणे कठीण बनते. यामुळे या ठिकाणी पोहोचणे हवाई दलाला शक्य झालेले नाही. अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास या जवानांनाही प्राणाला मुकावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलAccidentअपघात