शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

आता डरकाळी ३ हजार वाघांची; देशात ३,१६७ वाघ, २०० नी वाढली संख्या; पंतप्रधानांकडून व्याघ्रगणना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 05:32 IST

देशात वाघांची संख्या ३,१६७ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ च्या व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर केली. ‘हा अभिमानाचा क्षण आहे.

म्हैसूर (कर्नाटक) :

देशात वाघांची संख्या ३,१६७ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ च्या व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर केली. ‘हा अभिमानाचा क्षण आहे. पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांच्यातील सहअस्तित्वाला भारत महत्त्व देतो,’ असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. रविवारी ‘प्रोजेक्ट टायगर’ प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  वाघांच्या संरक्षण संवर्धनासाठी ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ या संघटनेची स्थापनाही त्यांनी केली. 

खुल्या जीपमधून जंगल सफारीचा आनंदमोदी रविवारी सकाळी साडेआठ वाजता बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात पोहोचले. टी-शर्ट, ट्राउझर, जॅकेट, टोपी, काळा चष्मा आणि कॅमेऱ्यासह ते नवीन लुकमध्ये दिसले. तेथे त्यांनी खुल्या जीपमध्ये सुमारे २० कि.मी. लांब जंगल सफारी केली. 

यानंतर त्यांनी कर्नाटकच्या सीमेला लागून असलेल्या मुदुमलाई राष्ट्रीय उद्यानातील थेप्पाकडू एलिफंट पार्क गाठले आणि हत्तींना ऊस भरवला.  तेथे ऑस्कर विजेता लघुपट ‘द एलिफंट व्हिस्पर्स’चे चित्रीकरण झाले होते. चित्रपटात दिसणारा हत्ती रघू आणि त्याला वाढवणारे बोमन आणि बेली यांचीही पंतप्रधानांनी भेट घेतली.

‘७५’चा असाही याेगायाेगदेशाच्या स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षी जगभरातील एकूण वाघांपैकी ७५ टक्के वाघ भारतात आहेत. तसेच जवळपास ७५ हजार वर्ग किलाेमीटर एवढ्या परिसरात देशातील व्याघ्रप्रकल्पांचा विस्तार झाला आहे.

देशात अशी वाढली वाघोबांची संख्या२००६- १४११२०१०- १७०६२०१४- २,२२६२०१८- २,९६७२०२२- ३१६७

२०२२ मध्ये भारतातील वाघांची संख्या ३,१६७ वर पोहोचली, या आकडेवारीचा हवाला देत मोदी म्हणाले, ‘देशात वाघांची संख्या वाढली आहे. त्यावरून दिसून येते की, आमचे हे कुटुंब वाढत आहे. हा अभिमानाचा क्षण आहे‘  कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, आदी उपस्थित होते.

चित्त्यांचे यशस्वी आंतरखंडीय स्थानांतर -भारतातून अनेक दशकांपूर्वी चित्ता नामशेष झाल्याचे निदर्शनास आणून देताना, पंतप्रधानांनी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून चित्ते भारतात आणले गेल्याविषयी सांगितले. - चित्त्यांचे हे पहिले यशस्वी आंतरखंडीय स्थानांतर आहे. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्याची चार पिल्ले जन्माला आली, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTigerवाघ