शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

आता डरकाळी ३ हजार वाघांची; देशात ३,१६७ वाघ, २०० नी वाढली संख्या; पंतप्रधानांकडून व्याघ्रगणना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 05:32 IST

देशात वाघांची संख्या ३,१६७ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ च्या व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर केली. ‘हा अभिमानाचा क्षण आहे.

म्हैसूर (कर्नाटक) :

देशात वाघांची संख्या ३,१६७ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ च्या व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर केली. ‘हा अभिमानाचा क्षण आहे. पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांच्यातील सहअस्तित्वाला भारत महत्त्व देतो,’ असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. रविवारी ‘प्रोजेक्ट टायगर’ प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  वाघांच्या संरक्षण संवर्धनासाठी ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ या संघटनेची स्थापनाही त्यांनी केली. 

खुल्या जीपमधून जंगल सफारीचा आनंदमोदी रविवारी सकाळी साडेआठ वाजता बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात पोहोचले. टी-शर्ट, ट्राउझर, जॅकेट, टोपी, काळा चष्मा आणि कॅमेऱ्यासह ते नवीन लुकमध्ये दिसले. तेथे त्यांनी खुल्या जीपमध्ये सुमारे २० कि.मी. लांब जंगल सफारी केली. 

यानंतर त्यांनी कर्नाटकच्या सीमेला लागून असलेल्या मुदुमलाई राष्ट्रीय उद्यानातील थेप्पाकडू एलिफंट पार्क गाठले आणि हत्तींना ऊस भरवला.  तेथे ऑस्कर विजेता लघुपट ‘द एलिफंट व्हिस्पर्स’चे चित्रीकरण झाले होते. चित्रपटात दिसणारा हत्ती रघू आणि त्याला वाढवणारे बोमन आणि बेली यांचीही पंतप्रधानांनी भेट घेतली.

‘७५’चा असाही याेगायाेगदेशाच्या स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षी जगभरातील एकूण वाघांपैकी ७५ टक्के वाघ भारतात आहेत. तसेच जवळपास ७५ हजार वर्ग किलाेमीटर एवढ्या परिसरात देशातील व्याघ्रप्रकल्पांचा विस्तार झाला आहे.

देशात अशी वाढली वाघोबांची संख्या२००६- १४११२०१०- १७०६२०१४- २,२२६२०१८- २,९६७२०२२- ३१६७

२०२२ मध्ये भारतातील वाघांची संख्या ३,१६७ वर पोहोचली, या आकडेवारीचा हवाला देत मोदी म्हणाले, ‘देशात वाघांची संख्या वाढली आहे. त्यावरून दिसून येते की, आमचे हे कुटुंब वाढत आहे. हा अभिमानाचा क्षण आहे‘  कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, आदी उपस्थित होते.

चित्त्यांचे यशस्वी आंतरखंडीय स्थानांतर -भारतातून अनेक दशकांपूर्वी चित्ता नामशेष झाल्याचे निदर्शनास आणून देताना, पंतप्रधानांनी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून चित्ते भारतात आणले गेल्याविषयी सांगितले. - चित्त्यांचे हे पहिले यशस्वी आंतरखंडीय स्थानांतर आहे. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्याची चार पिल्ले जन्माला आली, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTigerवाघ