मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी ३१०० टँकर
By Admin | Updated: April 25, 2016 00:27 IST2016-04-25T00:27:53+5:302016-04-25T00:27:53+5:30
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी ३१०० टँकर

मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी ३१०० टँकर
म ाठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी ३१०० टँकरटँकरच पर्याय : मागणी होईल तेथे टँकरने पाणीपुरवठा औरंगाबाद : मराठवाडा विभागातील सुमारे २४०० गावे आणि ८४५ वाड्यांना ३२०० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. विभागात शनिवारअखेर औरंगाबाद जिल्ह्यात ५०२ गावे व १७ वाड्यांसाठी ७१० टँकरद्वारे, जालन्यात ४०० गावे आणि ६३ वाड्यांसाठी ४५० टँकर, परभणीत १४९ गावे, ३७ वाड्यांसाठी २०० टँकर, हिंगोलीत २७ गावांमध्ये ३० टँकर, नांदेडमध्ये १८८ गावे, १३८ वाड्यांसाठी ३१० टँकर, बीडमध्ये ६२१ गावे आणि ५३४ वाड्यांसाठी ८०० टँकर, लातूरमध्ये १९३ गावे, ४३ वाड्यांसाठी २६० टँकर, तर उस्मानाबादमध्ये २३८ गावे आणि १३ वाड्यांसाठी ३४० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. विभागात एकूण ६ हजार ५०० खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. मागील आठवड्यात २१०० गावे आणि ७८५ वाड्यांना २,८५६ टँकरद्वारे पाणी पुरविले जात होते. मराठवाड्यातील सर्व पाणीपुरवठ्याच्या योजना अवसायनात निघाल्यामुळे यावर्षी टँकरने पाणीपुरवठा हा एकमेव पर्याय प्रशासनाकडे शिल्लक आहे. त्यामुळे मागणी येईल तेथे टँकरने पाणी दिले जात आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. पारा ४० अंश सेल्शिअसच्या पुढे सरकत असल्यामुळे पाण्याचे साठे आटू लागले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील सुमारे ४३ लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.