शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बालाकोट एअरस्ट्राकमध्ये मारले गेले 300 दहशतवादी, विंग कमांडर अभिनंदनच्या वडिलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 10:34 IST

बालाकोटमधील एअर स्ट्राइकमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येबाबत विंग कमांडर अभिनंदनच्या वडिलांनी केला मोठा दावा केला आहे.

चेन्नई - पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र या एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी ठार झाले याबाबत सुरुवातीपासूनच उलटसुलट दावे करण्यात येत आहेत. दरम्यान, विंग कमांडर अभिनंदन यांचे वडील एअर मार्शल (निवृत्त) सिम्हाकुट्टी वर्धमान यांनी बालाकोट येथील एअर स्ट्राइकमध्ये दहशतवाद्यांच्या तळावर टाकण्यात आलेल्या गायडेड स्पाइस-2000 या बॉम्बमुळे सुमारे 250 ते 300 दहशतवादी मारले गेले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली. भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसून लष्करी तळांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हल्ला परतवून लावण्यास सज्ज असलेल्या भारतीय लढाऊ विमानांनी हा हल्ला परतवून लावला होता. पण त्यावेळी उडालेल्या हवाई चकमकीत पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडताना अपघात होऊन भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. त्यानंतर जिनिव्हा करारातील तरतुदींनुसार पाकिस्तानने त्यांची मुक्तता केली होती.  दरम्यान, अभिनंदन वर्धमान यांचे वडील  एअर मार्शल (निवृत्त) सिम्हाकुट्टी वर्धमान यांनी आयआयटी मद्रासच्या डिफेन्स स्टडीजच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना बालाकोट हवाई हल्ल्याबाबत मोठे भाष्य केले. भारतीय हवाई दलाने जेव्हा एअर स्ट्राइक केले तेव्हा बहुतांश दहशतवादी हे तळामध्येच होते. या हल्ल्यात इमारतीचे फार नुकसान झाले नसावे मात्र बॉम्ब उशिरा फुटल्याने अधिकाधिक दहशतवादी मारले गेले असावेत.'' असे त्यांनी सांगितले. ''पाकिस्तानच्या ताफ्यात असलेली एफ-16 विमाने आणि त्यावर बसवण्यात येणारी AMRAAM क्षेपणास्त्रे भारतासाठी धोकादायक आहेत. बालाकोटवर चढाई करताना एफ-16 विमानांना गुंगारा देऊन पारिस्तानी विमाने दुसऱ्या दिशेला जातील याची व्यवस्था करणे आमच्यासाठी आवश्यक होते. त्यामुळे हवाई दलाने सात विमाने जैश ए मोहम्मदचे मुख्यालय असलेल्या बहावलपूरच्या दिशेने पाठवली. त्यामुळे भारतीय हवाई दल बहावलपूरवर हल्ला करतेय, असे पाकिस्तानला वाटले. त्यामुळे त्यांनी या विमानांना रोखण्यासाठी एफ 16 विमाने पाठवली. त्याचवेळी भारतीय हवाई दलाची काही विमाने बालाकोटकडे गेली आणि यशस्वीपणे हल्ला करून परत आली. त्यामुळे पाकिस्तानी हवाई दलाची पूर्णपणे फसगत झाली.''अशी महत्त्वपूर्ण माहिती यावेळी सिम्हाकुट्टी वर्धमान यांनी दिली. ''पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर बदला घेण्यासाठी भारताकडून नक्कीच प्रतिहल्ला करण्यात येईल, याची जाणीव पाकिस्तानला होता. त्यामुळे त्यांनी पूर्वतयारी ठेवही होती. मात्र आम्ही त्यांच्या हद्दीत घुसून हल्ला करू, असे त्यांना वाटले नव्हते,'' असा दावाही त्यांनी केला. तसेच एअर स्ट्राइकबाबत माझा हा अंदाज आहे. कदाचित तो चुकीचाही असू शकतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.  दरम्यान, बालाकोट येथे करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकनंतर देशात मृत दहशतवाद्यांच्या संख्येवरून उटल सुलट चर्चा सुरू आहे. या एअर स्ट्राइकमध्ये 250 ते 300 दहशतवादी ठार झाल्याचा दावा काही प्रसारमाध्यमे तसेच सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र विरोधी पक्षांकडून आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आणि पाकिस्तानचा हवाला देऊन पुरावे मागण्यात येत आहेत. 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान