शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बालाकोट एअरस्ट्राकमध्ये मारले गेले 300 दहशतवादी, विंग कमांडर अभिनंदनच्या वडिलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 10:34 IST

बालाकोटमधील एअर स्ट्राइकमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येबाबत विंग कमांडर अभिनंदनच्या वडिलांनी केला मोठा दावा केला आहे.

चेन्नई - पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र या एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी ठार झाले याबाबत सुरुवातीपासूनच उलटसुलट दावे करण्यात येत आहेत. दरम्यान, विंग कमांडर अभिनंदन यांचे वडील एअर मार्शल (निवृत्त) सिम्हाकुट्टी वर्धमान यांनी बालाकोट येथील एअर स्ट्राइकमध्ये दहशतवाद्यांच्या तळावर टाकण्यात आलेल्या गायडेड स्पाइस-2000 या बॉम्बमुळे सुमारे 250 ते 300 दहशतवादी मारले गेले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली. भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसून लष्करी तळांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हल्ला परतवून लावण्यास सज्ज असलेल्या भारतीय लढाऊ विमानांनी हा हल्ला परतवून लावला होता. पण त्यावेळी उडालेल्या हवाई चकमकीत पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडताना अपघात होऊन भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. त्यानंतर जिनिव्हा करारातील तरतुदींनुसार पाकिस्तानने त्यांची मुक्तता केली होती.  दरम्यान, अभिनंदन वर्धमान यांचे वडील  एअर मार्शल (निवृत्त) सिम्हाकुट्टी वर्धमान यांनी आयआयटी मद्रासच्या डिफेन्स स्टडीजच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना बालाकोट हवाई हल्ल्याबाबत मोठे भाष्य केले. भारतीय हवाई दलाने जेव्हा एअर स्ट्राइक केले तेव्हा बहुतांश दहशतवादी हे तळामध्येच होते. या हल्ल्यात इमारतीचे फार नुकसान झाले नसावे मात्र बॉम्ब उशिरा फुटल्याने अधिकाधिक दहशतवादी मारले गेले असावेत.'' असे त्यांनी सांगितले. ''पाकिस्तानच्या ताफ्यात असलेली एफ-16 विमाने आणि त्यावर बसवण्यात येणारी AMRAAM क्षेपणास्त्रे भारतासाठी धोकादायक आहेत. बालाकोटवर चढाई करताना एफ-16 विमानांना गुंगारा देऊन पारिस्तानी विमाने दुसऱ्या दिशेला जातील याची व्यवस्था करणे आमच्यासाठी आवश्यक होते. त्यामुळे हवाई दलाने सात विमाने जैश ए मोहम्मदचे मुख्यालय असलेल्या बहावलपूरच्या दिशेने पाठवली. त्यामुळे भारतीय हवाई दल बहावलपूरवर हल्ला करतेय, असे पाकिस्तानला वाटले. त्यामुळे त्यांनी या विमानांना रोखण्यासाठी एफ 16 विमाने पाठवली. त्याचवेळी भारतीय हवाई दलाची काही विमाने बालाकोटकडे गेली आणि यशस्वीपणे हल्ला करून परत आली. त्यामुळे पाकिस्तानी हवाई दलाची पूर्णपणे फसगत झाली.''अशी महत्त्वपूर्ण माहिती यावेळी सिम्हाकुट्टी वर्धमान यांनी दिली. ''पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर बदला घेण्यासाठी भारताकडून नक्कीच प्रतिहल्ला करण्यात येईल, याची जाणीव पाकिस्तानला होता. त्यामुळे त्यांनी पूर्वतयारी ठेवही होती. मात्र आम्ही त्यांच्या हद्दीत घुसून हल्ला करू, असे त्यांना वाटले नव्हते,'' असा दावाही त्यांनी केला. तसेच एअर स्ट्राइकबाबत माझा हा अंदाज आहे. कदाचित तो चुकीचाही असू शकतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.  दरम्यान, बालाकोट येथे करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकनंतर देशात मृत दहशतवाद्यांच्या संख्येवरून उटल सुलट चर्चा सुरू आहे. या एअर स्ट्राइकमध्ये 250 ते 300 दहशतवादी ठार झाल्याचा दावा काही प्रसारमाध्यमे तसेच सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र विरोधी पक्षांकडून आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आणि पाकिस्तानचा हवाला देऊन पुरावे मागण्यात येत आहेत. 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान