शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"ताकद वाढवा, विषारी दारूही सहन करू शकाल"; 30 जणांच्या मृत्यूनंतर मंत्र्याचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 10:07 IST

समीर महासेठ हे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांना दारूमुळे होणाऱ्या मृत्यूबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी "खेळून ताकद वाढवा, विषारी दारूही सहन करू शकाल" असं उत्तर दिलं आहे.

बिहारच्या छपरामध्ये विषारी दारूने अनेकांचा बळी घेतला आहे. आतापर्यंत तब्बल 30 जणांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काहींची दृष्टी गेली आहे. ग्रामस्थांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. असं असताना बिहारच्या एका मंत्र्याने वादग्रस्त विधान केलं आहे. "ताकद वाढवा मग सर्व काही सहन कराल" असं म्हटलं आहे. मंत्री असलेल्या समीर महासेठ यांनी हे विधान केलं आहे. 

समीर महासेठ हे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांना दारूमुळे होणाऱ्या मृत्यूबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी "खेळून ताकद वाढवा, विषारी दारूही सहन करू शकाल" असं उत्तर दिलं आहे. तसेच बिहारमध्ये मिळाणारी दारू ही विष आहे. या विषारी दारूपासून वाचायचं असेल तर इम्युनिटी वाढवा असंही सांगितलं. महासेठ यांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. आरजेडीचे आणखी एक नेते रामबली चंद्रवंशी यांनी देखील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूवरून थट्टा केली आहे. 

"विषारी दारू प्यायल्यामुळे लोक मरत आहे. एखादा आजार किंवा दुर्घटनेने देखील लोक मरतच आहेत. त्यामुळे जगणं-मरणं ही काही मोठी गोष्ट नाही" असं चंद्रवंशी यांनी म्हटलं आहे. छपरा जिल्ह्यात विषारी दारूमुळे 30 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात विषारी दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढतच असली तरी जिल्हा प्रशासनाने याबाबत मौन बाळगले आहे. या प्रकरणी पिता-पुत्रासह तिघांना अटक करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. या घटनेवरून राजकारण तापले असून, भाजप सरकारच्या कालावधीतही अशा घटना घडल्या होत्या, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दिले आहे.

सर्व मृतांनी सोमवारी रात्री उशिरा मद्यप्राशन केले होते. त्यानंतर मंगळवारी ते आजारी पडले. त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. या घटनेतील 15 जण अत्यवस्थ आहेत व इतर अनेक जण सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. अनेकांचे डोळे गेले आहेत तर काही जण प्राणास मुकले आहेत. या मुद्द्यावरून बिहार विधानसभेत विरोधकांनी जोरदार हंगामा केला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना घेरण्याचा प्रयत्न केला. यामुळे नितीशकुमार कमालीचे संतापले. भाजप नेत्यांवर टीका करताने ते म्हणाले की, तुम्ही दारुडे आहात. यावर भाजपचे खासदार सुशील मोदी म्हणाले की, नितीश कुमार यांची स्मरणशक्ती गेली आहे. लहान-सहान गोष्टींमुळे त्यांना सतत राग येतो.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Deathमृत्यूBiharबिहार