शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

"ताकद वाढवा, विषारी दारूही सहन करू शकाल"; 30 जणांच्या मृत्यूनंतर मंत्र्याचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 10:07 IST

समीर महासेठ हे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांना दारूमुळे होणाऱ्या मृत्यूबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी "खेळून ताकद वाढवा, विषारी दारूही सहन करू शकाल" असं उत्तर दिलं आहे.

बिहारच्या छपरामध्ये विषारी दारूने अनेकांचा बळी घेतला आहे. आतापर्यंत तब्बल 30 जणांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काहींची दृष्टी गेली आहे. ग्रामस्थांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. असं असताना बिहारच्या एका मंत्र्याने वादग्रस्त विधान केलं आहे. "ताकद वाढवा मग सर्व काही सहन कराल" असं म्हटलं आहे. मंत्री असलेल्या समीर महासेठ यांनी हे विधान केलं आहे. 

समीर महासेठ हे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांना दारूमुळे होणाऱ्या मृत्यूबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी "खेळून ताकद वाढवा, विषारी दारूही सहन करू शकाल" असं उत्तर दिलं आहे. तसेच बिहारमध्ये मिळाणारी दारू ही विष आहे. या विषारी दारूपासून वाचायचं असेल तर इम्युनिटी वाढवा असंही सांगितलं. महासेठ यांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. आरजेडीचे आणखी एक नेते रामबली चंद्रवंशी यांनी देखील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूवरून थट्टा केली आहे. 

"विषारी दारू प्यायल्यामुळे लोक मरत आहे. एखादा आजार किंवा दुर्घटनेने देखील लोक मरतच आहेत. त्यामुळे जगणं-मरणं ही काही मोठी गोष्ट नाही" असं चंद्रवंशी यांनी म्हटलं आहे. छपरा जिल्ह्यात विषारी दारूमुळे 30 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात विषारी दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढतच असली तरी जिल्हा प्रशासनाने याबाबत मौन बाळगले आहे. या प्रकरणी पिता-पुत्रासह तिघांना अटक करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. या घटनेवरून राजकारण तापले असून, भाजप सरकारच्या कालावधीतही अशा घटना घडल्या होत्या, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दिले आहे.

सर्व मृतांनी सोमवारी रात्री उशिरा मद्यप्राशन केले होते. त्यानंतर मंगळवारी ते आजारी पडले. त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. या घटनेतील 15 जण अत्यवस्थ आहेत व इतर अनेक जण सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. अनेकांचे डोळे गेले आहेत तर काही जण प्राणास मुकले आहेत. या मुद्द्यावरून बिहार विधानसभेत विरोधकांनी जोरदार हंगामा केला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना घेरण्याचा प्रयत्न केला. यामुळे नितीशकुमार कमालीचे संतापले. भाजप नेत्यांवर टीका करताने ते म्हणाले की, तुम्ही दारुडे आहात. यावर भाजपचे खासदार सुशील मोदी म्हणाले की, नितीश कुमार यांची स्मरणशक्ती गेली आहे. लहान-सहान गोष्टींमुळे त्यांना सतत राग येतो.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Deathमृत्यूBiharबिहार