शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
3
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
4
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
5
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
6
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
8
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
9
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
10
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
11
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
12
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
13
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
14
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
15
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
16
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
17
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
18
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
19
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
20
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!

‘बेटी बचाओ’चे ३० लाख बनावट अर्ज!, बालकल्याण मंत्रालयापुढे नवी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 03:52 IST

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेत मुलींच्या शिक्षणासाठी कोणतेही अनुदान देण्याची तरतूद नसूनही तसे अनुदान मागणारे देशभरातून सुमारे ३० लाख अर्ज आल्याने महिला आणि बालकल्याण मंत्रालयापुढे नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेत मुलींच्या शिक्षणासाठी कोणतेही अनुदान देण्याची तरतूद नसूनही तसे अनुदान मागणारे देशभरातून सुमारे ३० लाख अर्ज आल्याने महिला आणि बालकल्याण मंत्रालयापुढे नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे.हे सर्व फॉर्म ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे दोन लाख रुपयांचे अनुदान ‘डीबीटी’ पद्धतीने अर्जदारांच्या बँक खात्यांत थेट जमा करण्यासाठी आहेत. सरकारी योजनेत अशा प्रकारे अनुदान देण्याची कोणतीही तरतूद नसल्याने हे सर्व फॉर्म बनावट आहेत, हे उघड आहे.अशा प्रकारचे फॉर्म देशातील अनेक शहरांमध्ये स्टेशनरीच्या दुकानांमध्ये व जन सुविधा केंद्रांमध्ये प्रत्येकी पाच ते १० रुपयांना विकले जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावेळी बालकल्याण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रके काढून स्पष्ट केले होते की, या योजनेत असे कोणतेही अनुदान देण्यात येत नाही. तसेच त्यासाठी कोणतेही फॉर्म नाहीत. तरी लोकांनी अशा बनावट दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही केले गेले होते. तरी असंख्य लोकांना फसवून काही दलालांनी स्वत:चे उखळ पांढरे करून घेतल्याचे आलेल्या फॉर्मस्च्या संख्येवरून दिसते.आता मंत्रालयाकडे आलेले सर्वाधिक बनावट अर्ज उत्तर प्रदेशातून आले आहेत. त्याखाळोखाल हरियाणा, पंजाब, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश, दिल्ली, बिहार, प. बंगाल, राजस्थान आणि केरळ या राज्यातील लोकांनी अर्ज केले आहेत. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हे समाजातील मुलींविषयीची मानसिकता बदलण्यासाठीचे जनजागृती अभियान आहे. त्यात मुलींच्या शिक्षणासाठी सरकारकडून पैसे दिले जात नाहीत वा ते घेण्यासाठी कोणीही सरकारकडे आपली व्यक्तिगत माहिती देण्याची गरज नाही, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले होते. (वृत्तसंस्था)>सर्व फॉर्म नष्ट करणारमंत्रालयाने हे प्रकरण ‘सीबीआय’कडेही सोपविले होते. तरी असे फॉर्म येणे सुरूच राहिले. यातून काय मार्ग काढायचा, यावर विचार करण्यासाठी गेल्या महिन्यात महिला व बालकल्याण, गृह, विधी आणि न्याय अशा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाºयांची बैठकही झाली. हे फॉर्म निरर्थक असल्याने आणि त्ंयातील माहितीची संभाव्य दुरुपयोग टाळण्यासाठी सरकारने आता हे सर्व फॉर्म नष्ट करून टाकण्याचे ठरविले आहे.