शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दिल्लीत शिंदेंच्या मंत्र्यांकडे ठाकरेंचे ३ खासदार स्नेह भोजनाला, आदित्य ठाकरे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 12:21 IST

वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडण्याचं पाप, दिलेले नाव चोरण्याचं पाप, चिन्ह चोरण्याचं पाप हे एकनाथ शिंदेंनी केले आहे, त्याचा आम्हाला राग आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले.

नवी दिल्ली - महाराष्ट्रात सध्या ऑपरेशन टायगरची चांगलीच चर्चा सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंकडील नेते गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात काही आमदार, खासदार संपर्कात असल्याचाही दावा करण्यात येत आहे. या घडामोडीतच शिंदे गटातील केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी स्नेहभोजनाला ठाकरे गटातील ३ खासदारांनी हजेरी लावली. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. आदित्य ठाकरे हेदेखील दिल्लीत असून ते इंडिया आघाडीतील नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. 

आज सकाळी आदित्य ठाकरेंनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. तेव्हा ठाकरेंचे ३ खासदार स्नेहभोजनाला मंत्री प्रतापराव जाधवांच्या घरी गेल्याचं विचारण्यात आले. तेव्हा आदित्य ठाकरे म्हणाले की, नागपूरात जसं वातावरण असते तसे दिल्लीत आहे, अधिवेशन काळात लोक एकमेकांना भेटतात. कुणी कुणाला भेटायचे हे त्यांनी ठरवायचे आहे. महाराष्ट्रात बहुमताने सरकार बसलेले आहे. आमचा पक्ष जेवढा फोडायचा असेल तेवढा फोडा, ज्यांना घ्यायचं असेल त्यांना घ्या. जे भ्रष्ट असतील त्यांना घ्या. आम्ही डाग आहे बोलत नाही भाजपा बोलते. पण हे सर्व झाल्यानंतर तुमच्या जाहीरनाम्यात मांडलेले विषय कधी सोडवणार हे सांगा असं त्यांनी म्हटलं.

त्याशिवाय मागील ३ महिन्यापासून महाराष्ट्रात महायुती सरकारमध्ये अनेक मुद्द्यांवर वाद आहे. मुख्यमंत्री कोण होणार त्यासाठी १०-१५ दिवस वाद चालला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, ते झाल्यानंतर पालकमंत्री कोण यावरून अजूनही वाद सुरू आहेत. स्वार्थीपणा आणि हावरटपणा थांबत नाही. जनतेच्या प्रश्नावर कुणी बोलत नाही. लाडकी बहीण योजनेत २१०० रूपये देणार ते सुरू केले का, लाडका भाऊ योजनेत १० हजार देणार ते सुरू केले का? अनेक गोष्टी महाराष्ट्र करणार असं सांगितले पण अजून सुरू नाही असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला.

दरम्यान, कुणी कुणाचं कौतुक करावे हा त्यांचा विषय आहे. पण ज्या एकनाथ शिंदेंनी आमच्यासोबतच नव्हे तर महाराष्ट्राशी गद्दारी केली. अनेक लोक पक्ष सोडतात, पक्षातून बाहेर जातात पण यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडण्याचं पाप, दिलेले नाव चोरण्याचं पाप, चिन्ह चोरण्याचं पाप हे एकनाथ शिंदेंनी केले आहे, त्याचा आम्हाला राग आहे. महाराष्ट्रात जी सुख, शांती, समृद्धी आम्ही आणण्याचा प्रयत्न करत होतो तेदेखील दुसऱ्या राज्यात पाठवण्याचं पाप शिंदेंनी केले आहे असं सांगत दिल्लीत आज शरद पवारांना भेटणार नाही अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतली आहे. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारShiv Senaशिवसेना