शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

भारतीय लष्कराच्या जाळ्यात ३ दहशतवादी अडकले; चारही बाजूंनी रस्ते घेरले, ड्रोनद्वारे हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 14:10 IST

कोणतीही हानी होऊ नये म्हणून सुरक्षा दल अत्यंत सावधगिरीने संथ गतीने पुढे जात असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमध्ये अजूनही दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. दरम्यान, सुरक्षा दलांनी दोन ते तीन टीआरएफ दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरले असल्याची माहिती मिळाली आहे. टेकडीवर लपलेल्या दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी सुरक्षा दलांनी अंतिम कारवाई सुरू केली आहे. ड्रोनमधून त्यांच्या लपून बसलेल्या ठिकाणावर स्फोटके टाकण्यात आली, त्यामुळे मोठा स्फोट झाला आणि काही आगीसह धूरही निघाला. यावेळीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घेरावात तीन दहशतवादी अडकल्याचे सांगण्यात येत आहे. पॅरा कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. 

कोणतीही हानी होऊ नये म्हणून सुरक्षा दल अत्यंत सावधगिरीने संथ गतीने पुढे जात असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. दहशतवाद्यांचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी ड्रोन आणि स्निफर डॉगचीही मदत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरण्यात आले असून त्यांचे पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. एप्रिलमध्ये पुंछमध्ये लष्कराच्या ५ जवानांवर ज्या दहशतवादी मॉड्यूलने हल्ला केला होता, त्याच दहशतवादी मॉड्यूलने अनंतनागमध्ये हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. लष्कर आणि जैशच्या दहशतवाद्यांना एकत्र करून तयार केलेले हे नवे दहशतवादी मॉड्यूल ६ महिन्यांपासून खोऱ्यात सक्रिय आहे.

मंगळवारी सुरक्षा दलांना अनंतनागच्या कोकरनागमध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली. मंगळवारी रात्र असल्याने ती थांबविण्यात आली. बुधवारी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू केली होती. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले होते. सुरक्षा दलाचे अधिकारी दहशतवादी लपलेल्या ठिकाणी पोहोचताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, त्यानंतर चकमक सुरू झाली. यादरम्यान लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट यांना गोळ्या लागल्या. जखमी अधिकाऱ्यांना तातडीने हेलिकॉप्टरने विमानाने हलवण्यात आले, मात्र या अधिकाऱ्यांना वाचवता आले नाही. बुधवारी जखमी झालेल्या एका जवानाचाही गुरुवारी मृत्यू झाला. या दहशतवादी घटनेची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाची दहशतवादी संघटना असलेल्या टीआरएफने घेतली आहे. या हल्ल्यात १० लाख रुपयांचे इनाम असलेला दहशतवादी उझैरचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. 

लष्कराने आधुनिक शस्त्रे तैनात केली

कोकरनागच्या जंगलात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलांनी तळ ठोकला आहे. गुरुवारी सकाळी पुन्हा जंगलात शोधमोहीम सुरू करण्यात आली. गुरुवारी पहाटे चकमक परिसरातून तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले. डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले की, आम्ही दहशतवाद्यांना घेरले आहे. त्यांना सोडले जाणार नाही. ऑपरेशन लवकर संपवण्यासाठी आमचे जवान सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या कारवाईत नवीन पिढीतील सर्व शस्त्रे आणि उपकरणे वापरली जात आहेत. ड्रोनपासून ते हेलिकॉप्टरपर्यंतचा वापर केला जात आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवादPakistanपाकिस्तान