शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

राम माधव यांचा 3D फॉर्म्युला, म्हणाले NRC नंतर डिटेक्ट, डिलीट, डिपोर्ट करणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 09:50 IST

आसाममधील राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनसीआर)च्या अंतिम यादीत नावे नसलेल्या लोकांना मतदानाचा अधिकार भेटणार नाही. त्यांना देश सोडून जावे लागणार, असल्याचे भारतीय जनता पार्टीचे महासचिव राम माधव यांनी सांगितले.

नवी दिल्ली : आसाममधील राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनसीआर)च्या अंतिम यादीत नावे नसलेल्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही. त्यांना देश सोडून जावे लागणार, असल्याचे भारतीय जनता पार्टीचे महासचिव राम माधव यांनी सांगितले. सोमवारी दिल्लीत 'एनआरसी: डिफेंडिंग द बॉर्डर्स, सेक्युरिंग द कल्चर' या विषयावर आयोजित एका कार्यक्रमात राम माधव बोलत होते. यावेळी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.  

1985 मध्ये झालेल्या करारानुसार एनआरसी यादी अपडेट करण्यात येत आहे. सरकारने राज्यात अवैधरित्या राहाणाऱ्या नागरिकांची माहिती काढून त्यांना देशाबाहेर जाण्यास सांगितले होते. आता एनआरसीमुळे राज्यात अवैधरित्या राहणाऱ्या नागरिकांची एक वेगळी ओळख निर्माण होईल, असे राम माधव यांनी सांगितले. मात्र, एनआरसीच्या अंतिम यादीत नावे नसलेल्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही. त्यांना देश सोडून जावे लागणार, असे राम माधव म्हणाले. जगातील कोणताही देश अवैध्यरित्या घुसखोरी केलेल्या लोकांना आपल्या देशात राहू देत नाही. परंतू भारतात राजकीय कारणांमुळे अशा लोकांसाठी धर्मशाळाच बनली आहे, असेही राम माधव यावेळी म्हणाले.

देशातील सर्व राज्यांमध्ये एनआरसी लागू केली पाहिजे. भारतातील सर्व नागरिकांच्या सुरक्षतेसाठी एनआरसी योग्य आहे. तसेच, आसाममधील एनआरसी यादीत समावेश नसलेले नागरिक अन्य राज्यात जाऊ शकतात. यासाठी ठोस पाऊले उचलायला हवी, असे आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले.  

टॅग्स :NCRराष्ट्रीय राजधानी क्षेत्रBJPभाजपा