शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

३ लाख लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं; ४८ लोक तर पाकिस्तानात गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 13:20 IST

ज्या लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं त्यांनी जगातील वेगवेगळ्या १२० देशांमध्ये नागरिकत्व घेतले आहे.

नवी दिल्ली - मागील ३ वर्षात ३.९२ लाख लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं. विशेष म्हणजे भारताच्या या नागरिकांनी १२० देशातील नागरिकत्व स्वीकारलं. त्यात सर्वात जास्त १.७० लाख लोकांनी अमेरिकेचं नागरिकत्व घेतले. केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत ही माहिती दिली. इतकेच नाही ४८ जणांनी भारत सोडून पाकिस्तानचं नागरिकत्व घेतल्याचंही संसदेत समोर आले. 

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सांगितले की, परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ज्या लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं त्यांनी जगातील वेगवेगळ्या १२० देशांमध्ये नागरिकत्व घेतले आहे. या लोकांनी त्यांच्या खासगी कारणांसाठी भारताचं नागरिकत्व सोडलं आहे. लोकसभेत छापील उत्तरात सांगितले की, २०१९, २०२० आणि २०२१ या काळात ३ लाख ९२ हजार ६४३ लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं. त्यातील १ लाख ७० हजार ७९५ लोकांनी अमेरिकेचं नागरिकत्व घेतले. 

तर ६४ हजार ७१ लोकांनी कॅनडाचं नागरिकत्व घेतले. ५८ हजार ३९१ लोकांनी ऑस्ट्रेलिया, ३५ हजार ४३५ लोकांनी यूके, १२ हजार १३१ लोकांनी इटली, ८ हजार ८३२ लोकांनी न्यूझीलँडचं नागरिकत्व स्वीकारलं. त्याशिवाय ७ हजार ४६ लोकांनी सिंगापूर, ६ हजार ६९० लोकांनी जर्मनी, ३ हजार ७५४ लोकांनी स्वीडन आणि ४८ जणांनी पाकिस्तानचं नागरिकत्व स्वीकारलं आहे. २०२१ मध्ये म्हणजे मागील १ वर्षात १ लाख ६३ हजार ३७० लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं. त्यात सर्वाधिक ७८ हजार २८४ जणांनी अमेरिकेचं आणि २३ हजार ५३३ जणांनी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व घेतलं. 

याआधी एका आरटीआय उत्तरात केंद्रीय गृहमंत्रालयाने मागील ५ वर्षात ६ लाखाहून अधिक लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडल्याची माहिती दिली. २०१७ ते २०२१ या काळात ६ लाख ८ हजार १६२ लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं. अंदाजे सरासरी वर्षाला १ लाख २१ हजार ६३२ जण भारताचं नागरिकत्व सोडतात. तर ५ वर्षात ५ हजार २२० परदेशी नागरिकांना भारतानं नागरिकत्व दिले आहे. त्यात ८७ टक्के पाकिस्तानातून आलेले ४५५२ जणांचा समावेश आहे. भारतात दरवर्षी १ हजार जणांना भारतीय नागरिकत्व दिले जाते. भारताचं नागरिक बनण्यासाठी सर्वात पुढे पाकिस्तान आहे. २०२१ या काळात १७४५ परदेशी लोकांनी भारताचं नागरिकत्व घेतले त्यात १५८० पाकिस्तानातून आलेल्यांचा समावेश आहे.  

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान