शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

३ लाख लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं; ४८ लोक तर पाकिस्तानात गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 13:20 IST

ज्या लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं त्यांनी जगातील वेगवेगळ्या १२० देशांमध्ये नागरिकत्व घेतले आहे.

नवी दिल्ली - मागील ३ वर्षात ३.९२ लाख लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं. विशेष म्हणजे भारताच्या या नागरिकांनी १२० देशातील नागरिकत्व स्वीकारलं. त्यात सर्वात जास्त १.७० लाख लोकांनी अमेरिकेचं नागरिकत्व घेतले. केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत ही माहिती दिली. इतकेच नाही ४८ जणांनी भारत सोडून पाकिस्तानचं नागरिकत्व घेतल्याचंही संसदेत समोर आले. 

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सांगितले की, परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ज्या लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं त्यांनी जगातील वेगवेगळ्या १२० देशांमध्ये नागरिकत्व घेतले आहे. या लोकांनी त्यांच्या खासगी कारणांसाठी भारताचं नागरिकत्व सोडलं आहे. लोकसभेत छापील उत्तरात सांगितले की, २०१९, २०२० आणि २०२१ या काळात ३ लाख ९२ हजार ६४३ लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं. त्यातील १ लाख ७० हजार ७९५ लोकांनी अमेरिकेचं नागरिकत्व घेतले. 

तर ६४ हजार ७१ लोकांनी कॅनडाचं नागरिकत्व घेतले. ५८ हजार ३९१ लोकांनी ऑस्ट्रेलिया, ३५ हजार ४३५ लोकांनी यूके, १२ हजार १३१ लोकांनी इटली, ८ हजार ८३२ लोकांनी न्यूझीलँडचं नागरिकत्व स्वीकारलं. त्याशिवाय ७ हजार ४६ लोकांनी सिंगापूर, ६ हजार ६९० लोकांनी जर्मनी, ३ हजार ७५४ लोकांनी स्वीडन आणि ४८ जणांनी पाकिस्तानचं नागरिकत्व स्वीकारलं आहे. २०२१ मध्ये म्हणजे मागील १ वर्षात १ लाख ६३ हजार ३७० लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं. त्यात सर्वाधिक ७८ हजार २८४ जणांनी अमेरिकेचं आणि २३ हजार ५३३ जणांनी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व घेतलं. 

याआधी एका आरटीआय उत्तरात केंद्रीय गृहमंत्रालयाने मागील ५ वर्षात ६ लाखाहून अधिक लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडल्याची माहिती दिली. २०१७ ते २०२१ या काळात ६ लाख ८ हजार १६२ लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं. अंदाजे सरासरी वर्षाला १ लाख २१ हजार ६३२ जण भारताचं नागरिकत्व सोडतात. तर ५ वर्षात ५ हजार २२० परदेशी नागरिकांना भारतानं नागरिकत्व दिले आहे. त्यात ८७ टक्के पाकिस्तानातून आलेले ४५५२ जणांचा समावेश आहे. भारतात दरवर्षी १ हजार जणांना भारतीय नागरिकत्व दिले जाते. भारताचं नागरिक बनण्यासाठी सर्वात पुढे पाकिस्तान आहे. २०२१ या काळात १७४५ परदेशी लोकांनी भारताचं नागरिकत्व घेतले त्यात १५८० पाकिस्तानातून आलेल्यांचा समावेश आहे.  

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान