शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विवाह मोसमात या वर्षी 3 लाख कोटींची उलाढाल; दोन महिन्यांत वाजणार २५ लाख सनई-चौघडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 09:02 IST

कोरोना साथीच्या काळात आजवर मुहूर्ताचे खूप कमी दिवस असल्याने, तसेच प्रतिबंधक नियमांमुळे विवाह हे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडले. 

नवी दिल्ली : कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर, यंदा दिवाळीत अनेकांचा व्यवसाय चांगला झाला. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत देशभरात सुमारे २५ लाख विवाह होणार असून, त्यामुळे ३ लाख कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात, कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) या संघटनेने म्हटले आहे की, येत्या रविवारी, १४ नोव्हेंबर रोजी देव उठाण एकादशी असून, त्या दिवसापासून सुरू झालेला विवाह हंगाम १३ डिसेंबरपर्यंत सुरू राहील.  त्या काळात विवाह समारंभासाठी होणारी पूर्वतयारी, खरेदी यातून सुमारे ३ लाख कोटी रुपयांची उलाढाल होईल.

कोरोना साथीच्या काळात आजवर मुहूर्ताचे खूप कमी दिवस असल्याने, तसेच प्रतिबंधक नियमांमुळे विवाह हे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडले.  त्यामुळे विवाहासाठी रोषणाई, मोठाले मंडप, कॅटरिंगवाले अशा अनेक लोकांचे रोजगार बुडाले होते.  सीएआयटीचे अध्यक्ष बी. सी. भाटिया यांनी सांगितले की, दिवाळीच्या आधी घराची दुरुस्ती व रंगरंगोटी यातून खूप मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे, विवाह मोसमात दागिने, साड्या, लेहेंगा-चुन्नी, आयते कपडे, सुका मेवा, मिठाई, चप्पल, अन्नधान्य, रोषणाईचे सामान, इलेक्ट्रिक सामान, भेटवस्तू आदी गोष्टींना खूप मागणी असते. हॉटेल, लॉन, फार्म हाऊस, सभागृहे अशा अनेक ठिकाणी विवाह सोहळे पार पडतात. त्यासाठी जाणाऱ्या लोकांना कॅब, बस  अशा गोष्टींची सेवा लागते. व्हिडीओग्राफर, फोटोग्राफर, बँडाबाजावाले, सनईवाले, जीडे अशा अनेक लोकांना त्यातून काम मिळते असेही भाटिया म्हणाले.

विवाहखर्च प्रत्येकी २ लाख ते १ कोटी 

यंदा होणाऱ्या विवाहांपैकी ५ लाख विवाहांचा खर्च प्रत्येकी २ लाख रुपये असेल. त्याशिवाय आणखी काही लाख विवाहांचा खर्च प्रत्येकी ५ लाख, २५ लाख किंवा ५० लाख रुपये देखील असेल. काही हजार विवाहांसाठी प्रत्येकी १ कोटी रुपये खर्च येईल असेही सीएआयटीने म्हटले आहे.

टॅग्स :marriageलग्न