शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

विवाह मोसमात या वर्षी 3 लाख कोटींची उलाढाल; दोन महिन्यांत वाजणार २५ लाख सनई-चौघडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 09:02 IST

कोरोना साथीच्या काळात आजवर मुहूर्ताचे खूप कमी दिवस असल्याने, तसेच प्रतिबंधक नियमांमुळे विवाह हे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडले. 

नवी दिल्ली : कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर, यंदा दिवाळीत अनेकांचा व्यवसाय चांगला झाला. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत देशभरात सुमारे २५ लाख विवाह होणार असून, त्यामुळे ३ लाख कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात, कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) या संघटनेने म्हटले आहे की, येत्या रविवारी, १४ नोव्हेंबर रोजी देव उठाण एकादशी असून, त्या दिवसापासून सुरू झालेला विवाह हंगाम १३ डिसेंबरपर्यंत सुरू राहील.  त्या काळात विवाह समारंभासाठी होणारी पूर्वतयारी, खरेदी यातून सुमारे ३ लाख कोटी रुपयांची उलाढाल होईल.

कोरोना साथीच्या काळात आजवर मुहूर्ताचे खूप कमी दिवस असल्याने, तसेच प्रतिबंधक नियमांमुळे विवाह हे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडले.  त्यामुळे विवाहासाठी रोषणाई, मोठाले मंडप, कॅटरिंगवाले अशा अनेक लोकांचे रोजगार बुडाले होते.  सीएआयटीचे अध्यक्ष बी. सी. भाटिया यांनी सांगितले की, दिवाळीच्या आधी घराची दुरुस्ती व रंगरंगोटी यातून खूप मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे, विवाह मोसमात दागिने, साड्या, लेहेंगा-चुन्नी, आयते कपडे, सुका मेवा, मिठाई, चप्पल, अन्नधान्य, रोषणाईचे सामान, इलेक्ट्रिक सामान, भेटवस्तू आदी गोष्टींना खूप मागणी असते. हॉटेल, लॉन, फार्म हाऊस, सभागृहे अशा अनेक ठिकाणी विवाह सोहळे पार पडतात. त्यासाठी जाणाऱ्या लोकांना कॅब, बस  अशा गोष्टींची सेवा लागते. व्हिडीओग्राफर, फोटोग्राफर, बँडाबाजावाले, सनईवाले, जीडे अशा अनेक लोकांना त्यातून काम मिळते असेही भाटिया म्हणाले.

विवाहखर्च प्रत्येकी २ लाख ते १ कोटी 

यंदा होणाऱ्या विवाहांपैकी ५ लाख विवाहांचा खर्च प्रत्येकी २ लाख रुपये असेल. त्याशिवाय आणखी काही लाख विवाहांचा खर्च प्रत्येकी ५ लाख, २५ लाख किंवा ५० लाख रुपये देखील असेल. काही हजार विवाहांसाठी प्रत्येकी १ कोटी रुपये खर्च येईल असेही सीएआयटीने म्हटले आहे.

टॅग्स :marriageलग्न