शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

2G स्पेक्ट्रम निकाल; सीबीआयच्या भूमिकेवर केजरीवाल यांचे प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 16:15 IST

या घोटाळ्यामुळे देशभरात संपुआ सरकारविरोधात आंदोलन उभे करुन सरकारवर टीका करणार्या अरविंद केजरीवाल यांनी या निकालावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे

नवी दिल्ली- सर्व देशाला हादरवून टाकणाऱ्या आणि संपुआ सरकारच्या पतनासाठी कारणीभूत ठरणाऱ्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा आज विशेष सीबीआय न्यायालयात निकाल लागला. न्यायालयाने माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, खासदार कनिमोळी यांच्यासह सर्व आरोपींना पुराव्याअभावी मुक्त केले आहे.

या घोटाळ्यामुळे देशभरात संपुआ सरकारविरोधात आंदोलन उभे करुन सरकारवर टीका करणार्या अरविंद केजरीवाल यांनी या निकालावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केजरीवाल यांनी ट्वीट करुन थेट सीबीआयच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात," टू जी स्पेक्ट्रम घोटाळा सर्वात मोठा घोटाळा होता, संपुआ सरकार याच घोटाळ्यामुळे पडले. आज सर्व आरोपी दोषमुक्त ठरवले गेले, सीबीआयने या खटल्याची दिशा बदलली ? जाणूनबुजून ? लोकांना याचं उत्तर हवं आहे" 

 

अशा शब्दांमध्ये केजरीवाल यांनी सीबीआयला प्रश्न विचारले आहेत. ज्या संपुआ सरकारच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांनी देशभरात आंदोलन केले होते त्या सरकारमधील काँग्रेसह अनेक घटक पक्षांबरोबर अनेक वेळा एकाच व्यासपिठावर केजरीवाल गेले आहेत इतकेच नव्हे तर दिल्लीमध्ये काँग्रेसबरोबर सरकारही त्यांनी स्थापन केले होते. आता भाजपाला देशात पराभूत करण्यासाठी विविध वेळेस या संपुआच्या घटकपक्षाबरोबर एकत्र येऊन भाजपावर टीकाही करतात. टू जी घोटाळ्यात आरोपी दोषमुक्त झाल्याने काँग्रेस आनंद व्यक्त करत असताना केजरीवाल कोणती ठोस भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच असा घोटाळा झालाच नाही असे काँग्रेस सुचवत असताना केजरीवाल यांच्या आप पक्षाचे मत काय असेल याची उत्सुकता राजकीय विश्लेषकांना लागली आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल2G Spectrum Scam2 जी स्पेक्ट्रम घोटाळा