शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

2G स्पेक्ट्रम निकाल; सीबीआयच्या भूमिकेवर केजरीवाल यांचे प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 16:15 IST

या घोटाळ्यामुळे देशभरात संपुआ सरकारविरोधात आंदोलन उभे करुन सरकारवर टीका करणार्या अरविंद केजरीवाल यांनी या निकालावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे

नवी दिल्ली- सर्व देशाला हादरवून टाकणाऱ्या आणि संपुआ सरकारच्या पतनासाठी कारणीभूत ठरणाऱ्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा आज विशेष सीबीआय न्यायालयात निकाल लागला. न्यायालयाने माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, खासदार कनिमोळी यांच्यासह सर्व आरोपींना पुराव्याअभावी मुक्त केले आहे.

या घोटाळ्यामुळे देशभरात संपुआ सरकारविरोधात आंदोलन उभे करुन सरकारवर टीका करणार्या अरविंद केजरीवाल यांनी या निकालावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केजरीवाल यांनी ट्वीट करुन थेट सीबीआयच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात," टू जी स्पेक्ट्रम घोटाळा सर्वात मोठा घोटाळा होता, संपुआ सरकार याच घोटाळ्यामुळे पडले. आज सर्व आरोपी दोषमुक्त ठरवले गेले, सीबीआयने या खटल्याची दिशा बदलली ? जाणूनबुजून ? लोकांना याचं उत्तर हवं आहे" 

 

अशा शब्दांमध्ये केजरीवाल यांनी सीबीआयला प्रश्न विचारले आहेत. ज्या संपुआ सरकारच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांनी देशभरात आंदोलन केले होते त्या सरकारमधील काँग्रेसह अनेक घटक पक्षांबरोबर अनेक वेळा एकाच व्यासपिठावर केजरीवाल गेले आहेत इतकेच नव्हे तर दिल्लीमध्ये काँग्रेसबरोबर सरकारही त्यांनी स्थापन केले होते. आता भाजपाला देशात पराभूत करण्यासाठी विविध वेळेस या संपुआच्या घटकपक्षाबरोबर एकत्र येऊन भाजपावर टीकाही करतात. टू जी घोटाळ्यात आरोपी दोषमुक्त झाल्याने काँग्रेस आनंद व्यक्त करत असताना केजरीवाल कोणती ठोस भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच असा घोटाळा झालाच नाही असे काँग्रेस सुचवत असताना केजरीवाल यांच्या आप पक्षाचे मत काय असेल याची उत्सुकता राजकीय विश्लेषकांना लागली आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल2G Spectrum Scam2 जी स्पेक्ट्रम घोटाळा