शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

2G स्पेक्ट्रम निकाल; सीबीआयच्या भूमिकेवर केजरीवाल यांचे प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 16:15 IST

या घोटाळ्यामुळे देशभरात संपुआ सरकारविरोधात आंदोलन उभे करुन सरकारवर टीका करणार्या अरविंद केजरीवाल यांनी या निकालावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे

नवी दिल्ली- सर्व देशाला हादरवून टाकणाऱ्या आणि संपुआ सरकारच्या पतनासाठी कारणीभूत ठरणाऱ्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा आज विशेष सीबीआय न्यायालयात निकाल लागला. न्यायालयाने माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, खासदार कनिमोळी यांच्यासह सर्व आरोपींना पुराव्याअभावी मुक्त केले आहे.

या घोटाळ्यामुळे देशभरात संपुआ सरकारविरोधात आंदोलन उभे करुन सरकारवर टीका करणार्या अरविंद केजरीवाल यांनी या निकालावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केजरीवाल यांनी ट्वीट करुन थेट सीबीआयच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात," टू जी स्पेक्ट्रम घोटाळा सर्वात मोठा घोटाळा होता, संपुआ सरकार याच घोटाळ्यामुळे पडले. आज सर्व आरोपी दोषमुक्त ठरवले गेले, सीबीआयने या खटल्याची दिशा बदलली ? जाणूनबुजून ? लोकांना याचं उत्तर हवं आहे" 

 

अशा शब्दांमध्ये केजरीवाल यांनी सीबीआयला प्रश्न विचारले आहेत. ज्या संपुआ सरकारच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांनी देशभरात आंदोलन केले होते त्या सरकारमधील काँग्रेसह अनेक घटक पक्षांबरोबर अनेक वेळा एकाच व्यासपिठावर केजरीवाल गेले आहेत इतकेच नव्हे तर दिल्लीमध्ये काँग्रेसबरोबर सरकारही त्यांनी स्थापन केले होते. आता भाजपाला देशात पराभूत करण्यासाठी विविध वेळेस या संपुआच्या घटकपक्षाबरोबर एकत्र येऊन भाजपावर टीकाही करतात. टू जी घोटाळ्यात आरोपी दोषमुक्त झाल्याने काँग्रेस आनंद व्यक्त करत असताना केजरीवाल कोणती ठोस भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच असा घोटाळा झालाच नाही असे काँग्रेस सुचवत असताना केजरीवाल यांच्या आप पक्षाचे मत काय असेल याची उत्सुकता राजकीय विश्लेषकांना लागली आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल2G Spectrum Scam2 जी स्पेक्ट्रम घोटाळा