शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

जिल्हा परिषदेसंदर्भात न्यायालयात २९७ प्रकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 01:07 IST

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांशी संबंधित स्थानिक तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालयात सुमारे २९७ प्रकरणे सुरू असतानाच नियमितपणे प्रकरणांमध्ये भर पडतच असल्याने जिल्हा परिषदेच्या वकील पॅनलवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांशी संबंधित स्थानिक तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालयात सुमारे २९७ प्रकरणे सुरू असतानाच नियमितपणे प्रकरणांमध्ये भर पडतच असल्याने जिल्हा परिषदेच्या वकील पॅनलवर मोठा ताण निर्माण झाला आहे. न्यायालयीन प्रकरणांसदर्भात न्यायालायाचा अवमान होऊ नये तसेच जिल्हा परिषदेची भूमिका वेळीच स्पष्ट होणे अपेक्षित असल्याने जिल्हा परिषदेने विधी अधिकारी नियुक्त करून विधी कक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.  जिल्हा परिषदेच्या संदर्भात अनेकांचे अनेक प्रकारचे आक्षेप असतात. त्यामुळे जिल्हा, दिवाणी, फौजदारी, कामगार, औद्योगिक न्यायालयांमध्ये अनेक प्रकरणे दाखल झालेली आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने न्यायालयाचे कामकाज पाहण्यासाठी नऊ विधी तज्ज्ञ तसेच सर्वोच्च, उच्च न्यायालय, दिल्ली, मुंबई व खंडपीठ औरंगाबाद येथील न्यायालयीन प्रकरणांमध्ये कामकाज पाहणाऱ्या जिल्हा परिषद वकील पॅनलवर १४ विधितज्ज्ञ आहेत. या वकील पॅनल्सला न्यायलयीन लढाई लढण्याबरोबरच न्यायालयीन निकालाची अंमलजबावणी करणे अथवा अपिलात जाणे, खंडपीठात जाणे आदी कामेदेखील करावी लागतात. यातून कार्यवाहीस विलंब होऊन परिणामी अवमान याचिका दाखल होण्याचीदेखील शक्यता असते.  जिल्हा परिषदेसंदर्भात स्थानिक स्तरावर सद्यस्थितीत १७१ तर सर्वोच्च व उच्च न्यायालयीन स्तरावर १२६ अशी एकूण २९७ न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत. सदर प्रकरणे ही जिल्हा परिषदेचे वकील पॅनल हाताळत आहेत.  ही बाब लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात विधी कक्ष स्थापन करून विधी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकरणांचा वेळीच निपटारा करण्याबरोबरच अवमान याचिका दाखल होऊ नये असा गिते यांचा प्रयत्न असून, सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने जिल्हा परिषदेत लवकरच विधी कक्ष स्थापन होणार आहे.अवमान याचिका दाखल होण्याची भीतीसद्यस्थितीतील प्रकरणांची संख्या लक्षात घेता नव्याने दाखल प्रकरणांची संख्या पाहता वकिलांचे कामकाज मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुद्देनिहाय अभिप्राय, तसेच प्रतिज्ञापत्र दाखल करणे, न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करणे, न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने विहित मुदतीत अंमलबजावणी करणे, अथवा त्याविरुद्ध अपील दाखल करणे आदी कामे वकील पॅनल्सला करावी लागतात. नव्याने प्राप्त होणारी प्रकरणे तसेच न्यायालयाने निकाली काढलेल्या प्रकरणी न्यायनिर्णयाचा स्पष्ट व योग्य तो अर्थबोध होण्यासाठी त्यावर विधितज्ज्ञांचे अभिप्राय प्राप्त करून कार्यवाही करणे अपेक्षित असते. यासाठी मुंबई, औरंगाबाद येथे संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना प्रत्यक्ष जाणे क्रमप्राप्त असते. त्यामुळे कार्यवाहीस विलंबदेखील होऊ शकतो. यामुळे अवमान याचिका दाखल होण्याची भीती असते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद