शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

तेलंगणात पुरामुळे २९ लोकांचा मृत्यू; ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 21:45 IST

तेलंगणात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत २९ जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती सरकारने दिली.

Telangana Flood : तेलंगणात आठवड्याभरापासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण राज्यात हाहाकार उडाला आहे. तेलंगणात अतिवृष्टी आणि पुराच्या अलीकडील घटनांमुळे नागरिकांनी प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. अशातच गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे तेलंगणात आतापर्यंत २९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

तेलंगणात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला आहे. ३१ ऑगस्टच्या पुरामुळे तेलंगणातील मीनावलू, पेड्डागोपावरम, मन्नूर आणि कट्टेलरू जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. तेलंगणा सरकारमधील मुख्य सचिव शांती कुमारी यांनी शनिवारी ही माहिती दिली.  अतिवृष्टीनंतर सरकारकडून राज्यातील ३३ पैकी २९ जिल्ह्यांना पूरग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे.

३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसाच्या आधारे राज्यातील ३३ पैकी २९ जिल्ह्यांना पूरग्रस्त घोषित करण्यात आले आहे. पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत कार्यासाठी प्रत्येकी ३ कोटी रुपये देण्यात येत आहेत, असे मुख्य सचिव शांती कुमारी म्हणाल्या. तसेच पूरग्रस्तांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना  प्राण गमावलेल्या २९ लोकांची माहिती पाठवण्यास सांगितले आहे.

शांती कुमारी यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांसोबत टेलिकॉन्फरन्समध्ये त्यांच्याकडून अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल मागवला आहे. सोमवारी दुपारपूर्वी सविस्तर अहवाल सादर करण्यास शांती कुमारी यांनी सांगितले आहे. यासोबत तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी सोमवारी मदत आणि पुनर्वसन उपायांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेणार आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, राज्य सरकारने पाऊस आणि पुरामुळे ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

शुक्रवारी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही तेलंगणाला भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. शुक्रवारी त्यांनी पूरग्रस्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला ३,४४८ कोटी रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली. पीक नुकसानीचे मूल्यांकन करून केंद्र योग्य नुकसान भरपाई देईल, असे आश्वासनही केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना दिले.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशात ८ ते ९ सप्टेंबर आणि तेलंगणात ९ ते १० सप्टेंबर या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या दोन राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केवळ तेलंगणातच नाही तर आंध्र प्रदेशातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेशात १७ हजार लोकांना वाचवून सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

टॅग्स :TelanganaतेलंगणाfloodपूरAndhra Pradeshआंध्र प्रदेश