शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात पुरामुळे २९ लोकांचा मृत्यू; ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 21:45 IST

तेलंगणात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत २९ जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती सरकारने दिली.

Telangana Flood : तेलंगणात आठवड्याभरापासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण राज्यात हाहाकार उडाला आहे. तेलंगणात अतिवृष्टी आणि पुराच्या अलीकडील घटनांमुळे नागरिकांनी प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. अशातच गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे तेलंगणात आतापर्यंत २९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

तेलंगणात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला आहे. ३१ ऑगस्टच्या पुरामुळे तेलंगणातील मीनावलू, पेड्डागोपावरम, मन्नूर आणि कट्टेलरू जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. तेलंगणा सरकारमधील मुख्य सचिव शांती कुमारी यांनी शनिवारी ही माहिती दिली.  अतिवृष्टीनंतर सरकारकडून राज्यातील ३३ पैकी २९ जिल्ह्यांना पूरग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे.

३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसाच्या आधारे राज्यातील ३३ पैकी २९ जिल्ह्यांना पूरग्रस्त घोषित करण्यात आले आहे. पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत कार्यासाठी प्रत्येकी ३ कोटी रुपये देण्यात येत आहेत, असे मुख्य सचिव शांती कुमारी म्हणाल्या. तसेच पूरग्रस्तांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना  प्राण गमावलेल्या २९ लोकांची माहिती पाठवण्यास सांगितले आहे.

शांती कुमारी यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांसोबत टेलिकॉन्फरन्समध्ये त्यांच्याकडून अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल मागवला आहे. सोमवारी दुपारपूर्वी सविस्तर अहवाल सादर करण्यास शांती कुमारी यांनी सांगितले आहे. यासोबत तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी सोमवारी मदत आणि पुनर्वसन उपायांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेणार आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, राज्य सरकारने पाऊस आणि पुरामुळे ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

शुक्रवारी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही तेलंगणाला भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. शुक्रवारी त्यांनी पूरग्रस्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला ३,४४८ कोटी रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली. पीक नुकसानीचे मूल्यांकन करून केंद्र योग्य नुकसान भरपाई देईल, असे आश्वासनही केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना दिले.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशात ८ ते ९ सप्टेंबर आणि तेलंगणात ९ ते १० सप्टेंबर या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या दोन राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केवळ तेलंगणातच नाही तर आंध्र प्रदेशातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेशात १७ हजार लोकांना वाचवून सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

टॅग्स :TelanganaतेलंगणाfloodपूरAndhra Pradeshआंध्र प्रदेश