शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोरोनाचा परिणाम : लोकांच्या हातात २६ लाख कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 01:22 IST

कोरोनाचा परिणाम : सार्वकालिक उच्चांक; हातातील रोकड साठा संपला

मुंबई/नवी दिल्ली : भारतातील चलनात म्हणजेच लोकांच्या हातात असलेल्या नोटा पहिल्यांदाच विक्रमी २६ लाख कोटी रुपयांवर गेल्या आहेत. कोविड-१९च्या काळात लोकांनी आपल्याकडील रोख रकमेचा साठा वाढविल्यामुळे चलनातील नोटा वाढल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले.रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या डाटानुसार, चलनातील नोटांचे प्रमाण नव्या उच्चांकावर गेले असले तरी मागील दोन महिन्यांपासून वाढीची गती मंदावली आहे. ११ सप्टेंबरला संपलेल्या पंधरवड्यात लोकांच्या हातातील चलन १७,८९१ कोटी रुपयांनी वाढून २६ लाख कोटी रुपयांवर गेले. २८ फेब्रुवारी २०२० रोजी चलनात २२.५५ लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या. तेव्हापासून लोकांच्या हातातील चलनात ३.४५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

नोटांबदीच्या आधी ४ नोव्हेंबर २०१६ रोजी चलनात १७.९७ लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या. नोटाबंदीनंतर अल्पकाळासाठी चलनातील नोटांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले होते. उदा. जानेवारी २०१७ मध्ये चलनातील नोटा घसरून ७.८ लाख कोटी रुपयांवर आल्या होत्या. तथापि, ही स्थिती फार काळ टिकून राहू शकली नाही. चलनातील नोटा त्यानंतर झपाट्याने वाढत गेल्या. आता त्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचल्या आहेत.कोरोनाच्या संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या उत्पन्नात मोठी घट झाली. परिणामी साठविलेल्या पैशांवर त्यांना गुजराण करावी लागली.२०१६ मध्ये सरकारने नोटांबदी जाहीर केली तेव्हा ‘देशाची अर्थव्यवस्था रोखविरहित करण्यासाठी’ हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात होते. तथापि, सरकारचा हा उद्देश तर साध्य झाला नाहीच, उलट नोटाबंदीनंतर आतापर्यंत चलनी नोटांत ४५ टक्के वाढ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMONEYपैसा