शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

बिहारमधील पुरामध्ये 253 जणांचा मृत्यू; 18 जिल्ह्यातील एक कोटींपेक्षा जास्त लोकांना पुराचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 09:17 IST

बिहारमध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे राज्याला पुराचा तडाका बसला आहे.

ठळक मुद्दे बिहारमध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे राज्याला पुराचा तडाका बसला आहे. या पुरामध्ये आत्तापर्यंत 253 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 18 जिल्ह्यातील एक करोड 26 लाख 87 हजार लोकांना या पुराचा फटका बसला आहे.बचावरकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

पटना, दि. 21- बिहारमध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे राज्याला पुराचा तडाका बसला आहे. या पुरामध्ये आत्तापर्यंत 253 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 18 जिल्ह्यातील एक करोड 26 लाख 87 हजार लोकांना या पुराचा फटका बसला आहे. दरम्यान, तेथे बचावरकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

1152 जवान असलेल्या एनडीआरएफच्या 28 तुकड्या तसंच 118 बचाव बोटी, एसडीआरएफच्या 16 तुकड्या, 446 जवान आणि 92 बचाव बोटींकडून बचाव आणि मदत कार्य केलं जातं आहे. राज्य सरकारकडून पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचविण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. आत्तापर्यंत जवळपास 7 लाख 21 हजार 704 लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. तेथे सुरू करण्यात आलेल्या 1 हजार 358 मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी तब्बल ३.९२ कोटी लोकांनी आसरा घेतला आहे. एकुण 4 लाख 21 हजार 824 लोकांनी आश्रय घेतला आहे. जी लोक रहिवाली शिवारापर्यंत पोहचू शकत नाही अशांसाठी काही ठिकाणी समुदाय स्वयंपाक घर सुरू करण्यात आले आहेत. राज्यात एकुण 2569 सामुदायिक स्वयंपाकघर सुरू करण्यात आली असून त्यामध्ये 4 लाख 92 हजार 174 लोकांचं जेवण बनवलं जातं. काही भागातील पुराचं पाणी कमी होत असल्याचंही समजतं आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी पूर्व पंचारण जिल्ह्यातील सुरोली, बंजरिया, चिरेया, मधुबन तसंच पिपराही, सीतामढी जिल्ह्यातील रून्नीसेदपूर, मुज्जफरपूरमधील औराई, कटरा, मुसहरी आणि मुरोल, शिवहरमधील पुर क्षेत्र आणि पटना जिल्ह्यातील फतुहा, पुनपुन आणि मसोढीमधील पुरग्रस्त भाग या सगळ्या भागांची हवाई पाहणी केली. बिहारमधील 18 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणार पूर असल्याने रेल्वे वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला. 

आसामध्ये ही पावसाचं थैमान सुरूच आहे. तेथिल एकुण 19 लाख लोकांना पुराचा फटका बसल्याची माहिती मिळते आहे. उत्तर प्रदेशातील पावसात मृत्यू झालेल्यांचा आकडा 69 झाला आहे. 

बिहारच्या पुरातील मृतांचा आकडा 253अररिया जिल्ह्यात 57 जणांचा मृत्यूसीमामढीमध्ये 31जणांचा मृत्यू पश्चिम चंपारणमध्ये 29 जणांचा मृत्यू कटीहारमध्ये 23 जणांचा मृत्यू पूर्व पंचारणमध्ये 19 जणांचा मृत्यूमधुबनी, सुपोल तसंच मधेपुरामध्ये 13 जणांचा मृत्यू किशनगंजमध्ये 11 जणांचा मृत्यू दरभंगामध्ये 10  पूर्णियामध्ये 9 जणांचा मृत्यू गोपाजगंजमध्ये 8 जणांचा मृत्यू मुजफ्फरपूर, शिवहर तसंच सहरसामध्ये 44 जणांचा मृत्यू खगडियामध्ये 3 जणांचा मृत्यू सारणमध्ये एकाचा मृत्यू.