शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

निवडणुकांसाठी अडीच लाख सुरक्षा कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 5:02 AM

२५ हेलिकॉप्टर्स, ५00 रेल्वेगाड्या : हजारो वाहने, जहाजे, घोडे व गाढवेही

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची कल्पना आपल्याला सहजासहजी येणारी नाही. यंदा सात टप्प्यांमध्ये होत असलेल्या या निवडणुकीसाठी सुमारे ९० कोटी मतदार आपला हक्क बजावणार आहेत. ५४३ लोकसभा सदस्यांच्या निवडीसाठी ३३ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये १० लाख मतदान केंद्रे असणार आहेत. या निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे २०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

निवडणुकीच्या विविध टप्प्यांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सुमारे अडीच लाख कर्मचाऱ्यांना देशात ठिकठिकाणी पाठविले जाणार आहे. यासाठी २५ हेलिकॉप्टर्स, ५०० हून अधिक रेल्वे गाड्या, १७ हजार ५०० अन्य प्रकारची वाहने तसेच शेकडो बोटी आणि जहाजे यांचा वापर केला जाणार आहे. याशिवाय हजारो घोडे, खेचरे, हत्ती तसेच उंटांचाही वापर केला जातो. या सर्वांच्या प्रयत्नांमधूनच ही सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत असते.

देशपातळीवर निवडणूक पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे पुरेसे कर्मचारी नसतात. त्यामुळेच ते राज्य सरकारांचे तसेच निमशासकीय संस्थांचे कर्मचारी या कामासाठी घेतात. १९९३मध्ये या कर्मचारी घेण्यावरून वाद निर्माण झाला होता. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली. त्यानुसार आता आयोग आणि सरकार हे परस्पर सहकार्याने लागणाºया मनुष्यबळाची तरतूद करतात.

निवडणूक घेण्याची प्रमुख जबाबदारी निवडणूक आयोगाची असली तरी या प्रक्रियेमध्ये केंद्रीय गृह मंत्रालय तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाचाही महत्त्वाचा सहभाग असतो. गेल्या दोन महिन्यांमध्ये या तीनही संस्थांनी अनेक संयुक्त बैठका घेऊन निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे कशी पार पाडता येईल, याचे नियोजन केले आहे.गृह खात्यातर्फे समन्वयकेंद्रीय गृहमंत्रालय निवडणुकीसाठीच्या सुरक्षा दलांची गरज भागविते. रेल्वे व अन्य मंत्रालये तसेच विविध राज्यांच्या गृह मंत्रालयांशी समन्वय साधून सुुरक्षेची व्यवस्था करीत असते. दलाचे जवान देण्याचे, त्यांना ठिकठिकाणी पाठविण्याचे आणि त्यांना अन्य सोयी-सुविधा देण्याचे जबाबदारीचे कामही गृह मंत्रालयच करते.