शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

आठ वर्षांत २४० नेते भाजपमध्ये दाखल; सत्तेचे गणित जुळवण्यात होतेय मोठी मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 10:46 IST

भाजपमध्ये ज्या पक्षातील नेते दाखल झाले, त्यात बसपा, तृणमूल, सपा आणि अन्य पक्षांच्या आमदार, खासदारांचा समावेश आहे

हरिश गुप्ता

नवी दिल्ली - २०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने दुसऱ्या पक्षातून आलेल्या सर्वाधिक १८ उमेदवारांना रिंगणात उतरविले आहे. हे प्रमाण त्यांच्या एकूण उमेदवारांच्या १० टक्के आहे. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत अन्य पक्षातून आलेल्या २ टक्के उमेदवारांना तिकीट देण्यात आले होते. तर, २०१७ च्या निवडणुकीत अशा ९ टक्के उमेदवारांना तिकीट देण्यात आले होते.

२०१७ मध्ये यापैकी ३० टक्क्यांपेक्षा कमी उमेदवार जिंकून येऊ शकले असे नंतर दिसून आले. तरीही प्रतिस्पर्ध्याना कमकुवत करण्यासाठी भाजपाने २०२२ मध्ये अशा उमेदवारांवर विश्वास दाखविला. विशेष म्हणजे, गेल्या ८ वर्षांत अनेक राज्यांतून वेगवेगळ्या पक्षातील २४० नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अमित शहा यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाजपाचे वरिष्ठ रणनीतीकार म्हणाले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत यापैकी ९० टक्के जागा जिंकू शकत नव्हतो. जर, अन्य पक्षातून आलेले नेते आमच्या एकूण संख्येत भर घालत असतील तर काय चूक आहे.

कुठे काय घडले?महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब आणि इतर राज्यात भाजपने अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांकडे मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. तर, काँग्रेसने अनेक आमदार आणि खासदार या काळात गमावले. २०१४ ते मार्च २०२२ पर्यंत यावर्षीच्या विधानसभा निवडणुकांपर्यंत या पक्षाचे १९७ आमदार, खासदार आणि अन्य नेते यांनी पक्ष सोडला. यात गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील नेत्यांचा समावेश आहे.

मध्य प्रदेश, कर्नाटकात मिळविली सत्ता  मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात २२ आमदारांनी बंडखोरी केल्याने भाजपने मध्य प्रदेशात पुन्हा सत्ता मिळविली. २०१९ मध्ये कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दलच्या (सेक्युलर) आघाडीतील १६ आमदार भाजपमध्ये सहभागी झाले आणि भाजपने पुन्हा सत्ता मिळविली.

अशोका युनिव्हर्सिटीशी संलग्न असलेल्या त्रिवेदी सेंटर फॉर पॉलिटिकल डेटा सेंटरच्या माहितीनुसार गेल्या दशकातील विधानसभा निवडणुकीत भाजपने अन्य पक्षातून आलेले सर्वाधिक ८३० उमेदवार उभे केले. ज्या राज्यात भाजपची ताकद कमी आहे अशा राज्यात भाजप २०१४ पासून पक्षाचा विस्तार करण्यासाठी जोरदारपणे प्रयत्न करत आहे.

पराभूत होऊनही आले सत्तेतभाजपमध्ये ज्या पक्षातील नेते दाखल झाले, त्यात बसपा, तृणमूल, सपा आणि अन्य पक्षांच्या आमदार, खासदारांचा समावेश आहे. अशा नेत्यांची एकूण संख्या २४० आहे. मध्य प्रदेश, मणिपूर, गोवा यासारख्या राज्यांत निवडणुकीत पराभूत होऊनही भाजपने आपली सरकारे स्थापन केली.

टॅग्स :BJPभाजपा