शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

आठ वर्षांत २४० नेते भाजपमध्ये दाखल; सत्तेचे गणित जुळवण्यात होतेय मोठी मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 10:46 IST

भाजपमध्ये ज्या पक्षातील नेते दाखल झाले, त्यात बसपा, तृणमूल, सपा आणि अन्य पक्षांच्या आमदार, खासदारांचा समावेश आहे

हरिश गुप्ता

नवी दिल्ली - २०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने दुसऱ्या पक्षातून आलेल्या सर्वाधिक १८ उमेदवारांना रिंगणात उतरविले आहे. हे प्रमाण त्यांच्या एकूण उमेदवारांच्या १० टक्के आहे. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत अन्य पक्षातून आलेल्या २ टक्के उमेदवारांना तिकीट देण्यात आले होते. तर, २०१७ च्या निवडणुकीत अशा ९ टक्के उमेदवारांना तिकीट देण्यात आले होते.

२०१७ मध्ये यापैकी ३० टक्क्यांपेक्षा कमी उमेदवार जिंकून येऊ शकले असे नंतर दिसून आले. तरीही प्रतिस्पर्ध्याना कमकुवत करण्यासाठी भाजपाने २०२२ मध्ये अशा उमेदवारांवर विश्वास दाखविला. विशेष म्हणजे, गेल्या ८ वर्षांत अनेक राज्यांतून वेगवेगळ्या पक्षातील २४० नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अमित शहा यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाजपाचे वरिष्ठ रणनीतीकार म्हणाले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत यापैकी ९० टक्के जागा जिंकू शकत नव्हतो. जर, अन्य पक्षातून आलेले नेते आमच्या एकूण संख्येत भर घालत असतील तर काय चूक आहे.

कुठे काय घडले?महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब आणि इतर राज्यात भाजपने अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांकडे मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. तर, काँग्रेसने अनेक आमदार आणि खासदार या काळात गमावले. २०१४ ते मार्च २०२२ पर्यंत यावर्षीच्या विधानसभा निवडणुकांपर्यंत या पक्षाचे १९७ आमदार, खासदार आणि अन्य नेते यांनी पक्ष सोडला. यात गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील नेत्यांचा समावेश आहे.

मध्य प्रदेश, कर्नाटकात मिळविली सत्ता  मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात २२ आमदारांनी बंडखोरी केल्याने भाजपने मध्य प्रदेशात पुन्हा सत्ता मिळविली. २०१९ मध्ये कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दलच्या (सेक्युलर) आघाडीतील १६ आमदार भाजपमध्ये सहभागी झाले आणि भाजपने पुन्हा सत्ता मिळविली.

अशोका युनिव्हर्सिटीशी संलग्न असलेल्या त्रिवेदी सेंटर फॉर पॉलिटिकल डेटा सेंटरच्या माहितीनुसार गेल्या दशकातील विधानसभा निवडणुकीत भाजपने अन्य पक्षातून आलेले सर्वाधिक ८३० उमेदवार उभे केले. ज्या राज्यात भाजपची ताकद कमी आहे अशा राज्यात भाजप २०१४ पासून पक्षाचा विस्तार करण्यासाठी जोरदारपणे प्रयत्न करत आहे.

पराभूत होऊनही आले सत्तेतभाजपमध्ये ज्या पक्षातील नेते दाखल झाले, त्यात बसपा, तृणमूल, सपा आणि अन्य पक्षांच्या आमदार, खासदारांचा समावेश आहे. अशा नेत्यांची एकूण संख्या २४० आहे. मध्य प्रदेश, मणिपूर, गोवा यासारख्या राज्यांत निवडणुकीत पराभूत होऊनही भाजपने आपली सरकारे स्थापन केली.

टॅग्स :BJPभाजपा