शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

गतवर्षीच्या आत्महत्यांत मजुरांचे प्रमाण २४ टक्के; तामिळनाडू प्रथम, तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 05:48 IST

Suicide cases in last year : २०२० साली देशात १,५३,०५३ लोकांनी आत्महत्या केली. त्यातील ३७,६६६ लोक हे रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण २४.६ टक्के आहे.

नवी दिल्ली : गेल्या वर्षी आत्महत्या करणाऱ्यांपैकी २४ टक्के लोक हे रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. सात वर्षांपूर्वी जितक्या मजुरांनी आत्महत्या केली होती त्यापेक्षा हे प्रमाण दुप्पट आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. देशात मजुरांनी सर्वाधिक आत्महत्या तामिळनाडूमध्ये केल्या असून त्यानंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा व गुजरात या राज्यांचा क्रमांक लागतो. २०२० साली देशात १,५३,०५३ लोकांनी आत्महत्या केली. त्यातील ३७,६६६ लोक हे रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण २४.६ टक्के आहे. गेल्या काही वर्षांत मजुरांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यात गेल्या वर्षी कोरोना साथीमुळे स्थिती आणखी बिघडली होती. २०१४ साली आत्महत्या केलेल्यांपैकी १२ टक्के लोक मजूर होते. हे प्रमाण २०१५ साली १७.८ टक्के, २०१६ मध्ये १९.२ टक्के, २०१७ मध्ये २२.१ टक्के, २०१८ मध्ये २२.४ टक्के, २०१९ मध्ये २३.४ टक्के इतके होते. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०२० साली तामिळनाडूमध्ये ६,४९५ मजुरांनी आत्महत्या केली होती. तर, मध्य प्रदेशमध्ये ४,९४५, महाराष्ट्रात ४,१७६, तेलंगणामध्ये ३,८३१ व गुजरातमध्ये २,७५४ मजुरांनी आत्महत्या केली आहे. अपघातांमुळे होणारे मजुरांचे मृत्यू व आत्महत्या करणारे मजूर यांची वेगवेगळी नोंद ठेवण्यास एनसीआरबीने २०१४ सालापासून सुरुवात केली. देशात आत्महत्या करणाऱ्या नोंदीची नऊ गटात विभागणी करण्यात येते. रोजंदारीवरील मजुरांप्रमाणेच गृहिणी, शेतकरी, पगारदार तसेच व्यावसायिक, उद्योजक, सेवानिवृत्त याचबरोबर इतर काही गटांतील लोकांच्या आत्महत्यांची स्वतंत्र नोंद करण्यात येते.

आत्महत्या केलेल्या गृहिणींचे प्रमाण १४ टक्केव्यवसायानुरूप विचार केला तर देशात रोजंदारीवरील मजुरांनी सर्वाधिक आत्महत्या केल्या आहेत. त्यानंतर अन्य व्यक्तींनी आत्महत्या करण्याचे प्रमाण गृहिणी (१४.६ टक्के), स्वत:चा व्यवसाय असलेले (११.३ टक्के), बेरोजगार (१०.२ टक्के), पगारदार व्यक्ती (९.७ टक्के), विद्यार्थी (८ टक्के), शेतकरी (७ टक्के), सेवानिवृत्त (१ टक्का) व इतर गट (१३.४ टक्के) असे आहे. बेरोजगार व्यक्तींनी आत्महत्या करण्याचे प्रमाण २०१९ रोजी १०.१ टक्के होते ते २०२० साली १०.२ टक्के झाले. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रTamilnaduतामिळनाडू