शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षीच्या आत्महत्यांत मजुरांचे प्रमाण २४ टक्के; तामिळनाडू प्रथम, तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 05:48 IST

Suicide cases in last year : २०२० साली देशात १,५३,०५३ लोकांनी आत्महत्या केली. त्यातील ३७,६६६ लोक हे रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण २४.६ टक्के आहे.

नवी दिल्ली : गेल्या वर्षी आत्महत्या करणाऱ्यांपैकी २४ टक्के लोक हे रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. सात वर्षांपूर्वी जितक्या मजुरांनी आत्महत्या केली होती त्यापेक्षा हे प्रमाण दुप्पट आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. देशात मजुरांनी सर्वाधिक आत्महत्या तामिळनाडूमध्ये केल्या असून त्यानंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा व गुजरात या राज्यांचा क्रमांक लागतो. २०२० साली देशात १,५३,०५३ लोकांनी आत्महत्या केली. त्यातील ३७,६६६ लोक हे रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण २४.६ टक्के आहे. गेल्या काही वर्षांत मजुरांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यात गेल्या वर्षी कोरोना साथीमुळे स्थिती आणखी बिघडली होती. २०१४ साली आत्महत्या केलेल्यांपैकी १२ टक्के लोक मजूर होते. हे प्रमाण २०१५ साली १७.८ टक्के, २०१६ मध्ये १९.२ टक्के, २०१७ मध्ये २२.१ टक्के, २०१८ मध्ये २२.४ टक्के, २०१९ मध्ये २३.४ टक्के इतके होते. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०२० साली तामिळनाडूमध्ये ६,४९५ मजुरांनी आत्महत्या केली होती. तर, मध्य प्रदेशमध्ये ४,९४५, महाराष्ट्रात ४,१७६, तेलंगणामध्ये ३,८३१ व गुजरातमध्ये २,७५४ मजुरांनी आत्महत्या केली आहे. अपघातांमुळे होणारे मजुरांचे मृत्यू व आत्महत्या करणारे मजूर यांची वेगवेगळी नोंद ठेवण्यास एनसीआरबीने २०१४ सालापासून सुरुवात केली. देशात आत्महत्या करणाऱ्या नोंदीची नऊ गटात विभागणी करण्यात येते. रोजंदारीवरील मजुरांप्रमाणेच गृहिणी, शेतकरी, पगारदार तसेच व्यावसायिक, उद्योजक, सेवानिवृत्त याचबरोबर इतर काही गटांतील लोकांच्या आत्महत्यांची स्वतंत्र नोंद करण्यात येते.

आत्महत्या केलेल्या गृहिणींचे प्रमाण १४ टक्केव्यवसायानुरूप विचार केला तर देशात रोजंदारीवरील मजुरांनी सर्वाधिक आत्महत्या केल्या आहेत. त्यानंतर अन्य व्यक्तींनी आत्महत्या करण्याचे प्रमाण गृहिणी (१४.६ टक्के), स्वत:चा व्यवसाय असलेले (११.३ टक्के), बेरोजगार (१०.२ टक्के), पगारदार व्यक्ती (९.७ टक्के), विद्यार्थी (८ टक्के), शेतकरी (७ टक्के), सेवानिवृत्त (१ टक्का) व इतर गट (१३.४ टक्के) असे आहे. बेरोजगार व्यक्तींनी आत्महत्या करण्याचे प्रमाण २०१९ रोजी १०.१ टक्के होते ते २०२० साली १०.२ टक्के झाले. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रTamilnaduतामिळनाडू