शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

बांग्लादेशात 2200 अन् पाकिस्तानात 112 प्रकरणे...शेजारील देशांमध्ये हिंदूंवर हल्ले वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 19:50 IST

परराष्ट्र मंत्रालयाने राज्यसभेत आकडेवारी सादर केली.

बांग्लादेशातील शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग पक्षाचे सरकार पडल्यानंतर बांग्लादेशात राहणाऱ्या हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत. इस्लामी/कट्टरपंथी मानसिकतेच्या मोहम्मद युनूस यांचे सरकार आल्यापासून तेथील हिंदूंच्या विरोधात आतापर्यंत 2200 हिंसाचाराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याशिवाय, पाकिस्तानमध्येही हिंदूंविरुद्ध हिंसाचाराची 112 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी ही माहिती दिली.

राज्यसभेत आकडेवारी सादर करताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आम्ही बांग्लादेश आणि पाकिस्तान, या दोन्ही देशांना पत्रे लिहून हिंदूंची सुरक्षा, कल्याण सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, केंद्र सरकारने या घटना गांभीर्याने घेतल्या असून, बांग्लादेश सरकारकडे आपली चिंता व्यक्त केली आहे. भारताला आशा आहे की, बांगलादेश सरकार हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल.

पाकिस्तानबद्दल काय सांगितले

MEA च्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारने पाकिस्तान सरकारलाही धार्मिक असहिष्णुता, जातीय हिंसाचार, छळ आणि अल्पसंख्याक समुदायांवर हल्ले थांबवण्याचे आवाहन केले आहे. शिवाय, त्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले आहे. भारत आंतरराष्ट्रीय मंचांवर पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांची परिस्थिती प्रभावीपणे मांडत राहील.

गेल्या तीन वर्षांची आकडेवारीMEA च्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये बांग्लादेशात हिंदूंच्या विरोधात 47 हिंसाचाराच्या घटना घडल्या, तर 2023 मध्ये 302 आणि 2024 मध्ये (8 डिसेंबर 2024 पर्यंत) ही संख्या 2200 पर्यंत वाढली  आहे. तसेच, 2022 मध्ये पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचाराचे 241 गुन्हे दाखल झाले होते, तर 2023 मध्ये 103 आणि 2024 मध्ये (ऑक्टोबरपर्यंत) 112 गुन्हे दाखल झाले आहेत. बांग्लादेश आणि पाकिस्तान व्यतिरिक्त इतर शेजारील देशात हिंदूंविरुद्ध हिंसाचाराचा गुन्हा दाखल झालेला नाही, असेही सरकारने म्हटले आहे. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तानIndiaभारतHinduहिंदू