शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

२०२० मध्ये शेतकऱ्यांपेक्षा व्यावसायिकांनी केल्या अधिक आत्महत्या, NCRBच्या अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2021 2:22 PM

More Suicides Among Businessmen Than Farmers, NCRB Reports: कोरोनाच्या महामारीमुळे सर्व व्यवहार जवळपास बंद झाल्याने आर्थिक संकटही गंभीर बनले. त्यामुळे कोट्यवधी लोकांचे जीवन संकटात सापडले. त्यामुळे भारतात व्यावसायिक, व्यापाऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणामध्ये वाढ दिसून आली.

नवी दिल्ली - २०२० मध्ये कोरोनाच्या फैलावामुळे जगाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. कोरोनाच्या महामारीमुळे सर्व व्यवहार जवळपास बंद झाल्याने आर्थिक संकटही गंभीर बनले. त्यामुळे कोट्यवधी लोकांचे जीवन संकटात सापडले. त्यामुळे भारतात व्यावसायिक, व्यापाऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणामध्ये वाढ दिसून आली. २०१९ शी तुलना केली असता २०२० मध्ये शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड्स ब्युरोच्या ताजा आकडेवारीनुसार सन २०२० मध्ये ११ हजार ६७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर यादरम्यान १० हजार ६७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती.  या ११ हजारांहून अधिक आत्महत्यांमध्ये ४ हजार ३५६ व्यापाऱ्यांनी तर ४ हजार २२६ दुकानदारांनी आत्महत्या केली. तर अन्य आत्महत्या ह्या व्यवसायाशी संबंधित आहेत.

एनसीआरबीने या तीन कॅटॅगरीना बिझनेस समुदायाशी जोडून एकूण आकडेवारी नोंदवली आहे. २०१९ शी तुलना केली असता बिझनेस समुदायामध्ये २०२० मध्ये आत्महत्येच्या प्रकरणामध्ये २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. व्यापारी लोकांमध्ये आत्महत्येच्या प्रकरणामध्ये २०१९ मधील २९०६ आत्महत्यांच्या तुलनेत २०२० मध्ये ४३५६मध्ये ४९.९ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. तर संपूर्ण देशामध्ये आत्महत्येच्या प्रमाणामध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच ही संख्या वाढून १ लाख ५३ हजार ०५२ एवढी झाली आहे.

पारंपरिकपणे व्यावसायिकांमध्ये शेतकऱ्यांच्या तुलनेत आत्महत्यांचे प्रमाण कमी दिसून येते. मात्र कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे छोटे व्यापारी आणि व्यावसायितांना खूप नुकसानीचा सामना करावा लागला. मोठ्या संख्येने व्यावसायिकांना आपली दुकाने बंद ठेवावी लागली. तसेच कर्जफेक करू न शकल्याने त्यांवा दिवाळखोर व्हावे लागले.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना फेडरेशन ऑफ इंडियन मायक्रो स्मॉल आणि मीडियम इंटरप्रायझेसचे सेक्रेटरी जनरल अनिल भारद्वाज यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात छोट्या व्यापाऱ्यांना खूप नुकसान सहन करावे लागले. आतापर्यंत शेतीचे नुकसान आणि कर्जामुळे शेतकरीच सर्वाधिक आत्महत्या करतात. मात्र एनसीआरबीच्या आकड्यांमधून समजते की, व्यावसायिकसुद्धा खूप दबावामध्ये आणि तणावामध्ये आहे. तसेच कोरोनाच्या साथीने त्यांची परिस्थिती अधिकच बिकट केली आहे.  

टॅग्स :businessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत