शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

२०२० मध्ये शेतकऱ्यांपेक्षा व्यावसायिकांनी केल्या अधिक आत्महत्या, NCRBच्या अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 14:22 IST

More Suicides Among Businessmen Than Farmers, NCRB Reports: कोरोनाच्या महामारीमुळे सर्व व्यवहार जवळपास बंद झाल्याने आर्थिक संकटही गंभीर बनले. त्यामुळे कोट्यवधी लोकांचे जीवन संकटात सापडले. त्यामुळे भारतात व्यावसायिक, व्यापाऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणामध्ये वाढ दिसून आली.

नवी दिल्ली - २०२० मध्ये कोरोनाच्या फैलावामुळे जगाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. कोरोनाच्या महामारीमुळे सर्व व्यवहार जवळपास बंद झाल्याने आर्थिक संकटही गंभीर बनले. त्यामुळे कोट्यवधी लोकांचे जीवन संकटात सापडले. त्यामुळे भारतात व्यावसायिक, व्यापाऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणामध्ये वाढ दिसून आली. २०१९ शी तुलना केली असता २०२० मध्ये शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड्स ब्युरोच्या ताजा आकडेवारीनुसार सन २०२० मध्ये ११ हजार ६७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर यादरम्यान १० हजार ६७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती.  या ११ हजारांहून अधिक आत्महत्यांमध्ये ४ हजार ३५६ व्यापाऱ्यांनी तर ४ हजार २२६ दुकानदारांनी आत्महत्या केली. तर अन्य आत्महत्या ह्या व्यवसायाशी संबंधित आहेत.

एनसीआरबीने या तीन कॅटॅगरीना बिझनेस समुदायाशी जोडून एकूण आकडेवारी नोंदवली आहे. २०१९ शी तुलना केली असता बिझनेस समुदायामध्ये २०२० मध्ये आत्महत्येच्या प्रकरणामध्ये २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. व्यापारी लोकांमध्ये आत्महत्येच्या प्रकरणामध्ये २०१९ मधील २९०६ आत्महत्यांच्या तुलनेत २०२० मध्ये ४३५६मध्ये ४९.९ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. तर संपूर्ण देशामध्ये आत्महत्येच्या प्रमाणामध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच ही संख्या वाढून १ लाख ५३ हजार ०५२ एवढी झाली आहे.

पारंपरिकपणे व्यावसायिकांमध्ये शेतकऱ्यांच्या तुलनेत आत्महत्यांचे प्रमाण कमी दिसून येते. मात्र कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे छोटे व्यापारी आणि व्यावसायितांना खूप नुकसानीचा सामना करावा लागला. मोठ्या संख्येने व्यावसायिकांना आपली दुकाने बंद ठेवावी लागली. तसेच कर्जफेक करू न शकल्याने त्यांवा दिवाळखोर व्हावे लागले.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना फेडरेशन ऑफ इंडियन मायक्रो स्मॉल आणि मीडियम इंटरप्रायझेसचे सेक्रेटरी जनरल अनिल भारद्वाज यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात छोट्या व्यापाऱ्यांना खूप नुकसान सहन करावे लागले. आतापर्यंत शेतीचे नुकसान आणि कर्जामुळे शेतकरीच सर्वाधिक आत्महत्या करतात. मात्र एनसीआरबीच्या आकड्यांमधून समजते की, व्यावसायिकसुद्धा खूप दबावामध्ये आणि तणावामध्ये आहे. तसेच कोरोनाच्या साथीने त्यांची परिस्थिती अधिकच बिकट केली आहे.  

टॅग्स :businessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत