शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

२०२० मध्ये शेतकऱ्यांपेक्षा व्यावसायिकांनी केल्या अधिक आत्महत्या, NCRBच्या अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 14:22 IST

More Suicides Among Businessmen Than Farmers, NCRB Reports: कोरोनाच्या महामारीमुळे सर्व व्यवहार जवळपास बंद झाल्याने आर्थिक संकटही गंभीर बनले. त्यामुळे कोट्यवधी लोकांचे जीवन संकटात सापडले. त्यामुळे भारतात व्यावसायिक, व्यापाऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणामध्ये वाढ दिसून आली.

नवी दिल्ली - २०२० मध्ये कोरोनाच्या फैलावामुळे जगाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. कोरोनाच्या महामारीमुळे सर्व व्यवहार जवळपास बंद झाल्याने आर्थिक संकटही गंभीर बनले. त्यामुळे कोट्यवधी लोकांचे जीवन संकटात सापडले. त्यामुळे भारतात व्यावसायिक, व्यापाऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणामध्ये वाढ दिसून आली. २०१९ शी तुलना केली असता २०२० मध्ये शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड्स ब्युरोच्या ताजा आकडेवारीनुसार सन २०२० मध्ये ११ हजार ६७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर यादरम्यान १० हजार ६७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती.  या ११ हजारांहून अधिक आत्महत्यांमध्ये ४ हजार ३५६ व्यापाऱ्यांनी तर ४ हजार २२६ दुकानदारांनी आत्महत्या केली. तर अन्य आत्महत्या ह्या व्यवसायाशी संबंधित आहेत.

एनसीआरबीने या तीन कॅटॅगरीना बिझनेस समुदायाशी जोडून एकूण आकडेवारी नोंदवली आहे. २०१९ शी तुलना केली असता बिझनेस समुदायामध्ये २०२० मध्ये आत्महत्येच्या प्रकरणामध्ये २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. व्यापारी लोकांमध्ये आत्महत्येच्या प्रकरणामध्ये २०१९ मधील २९०६ आत्महत्यांच्या तुलनेत २०२० मध्ये ४३५६मध्ये ४९.९ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. तर संपूर्ण देशामध्ये आत्महत्येच्या प्रमाणामध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच ही संख्या वाढून १ लाख ५३ हजार ०५२ एवढी झाली आहे.

पारंपरिकपणे व्यावसायिकांमध्ये शेतकऱ्यांच्या तुलनेत आत्महत्यांचे प्रमाण कमी दिसून येते. मात्र कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे छोटे व्यापारी आणि व्यावसायितांना खूप नुकसानीचा सामना करावा लागला. मोठ्या संख्येने व्यावसायिकांना आपली दुकाने बंद ठेवावी लागली. तसेच कर्जफेक करू न शकल्याने त्यांवा दिवाळखोर व्हावे लागले.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना फेडरेशन ऑफ इंडियन मायक्रो स्मॉल आणि मीडियम इंटरप्रायझेसचे सेक्रेटरी जनरल अनिल भारद्वाज यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात छोट्या व्यापाऱ्यांना खूप नुकसान सहन करावे लागले. आतापर्यंत शेतीचे नुकसान आणि कर्जामुळे शेतकरीच सर्वाधिक आत्महत्या करतात. मात्र एनसीआरबीच्या आकड्यांमधून समजते की, व्यावसायिकसुद्धा खूप दबावामध्ये आणि तणावामध्ये आहे. तसेच कोरोनाच्या साथीने त्यांची परिस्थिती अधिकच बिकट केली आहे.  

टॅग्स :businessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत