शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

२०२० मध्ये शेतकऱ्यांपेक्षा व्यावसायिकांनी केल्या अधिक आत्महत्या, NCRBच्या अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 14:22 IST

More Suicides Among Businessmen Than Farmers, NCRB Reports: कोरोनाच्या महामारीमुळे सर्व व्यवहार जवळपास बंद झाल्याने आर्थिक संकटही गंभीर बनले. त्यामुळे कोट्यवधी लोकांचे जीवन संकटात सापडले. त्यामुळे भारतात व्यावसायिक, व्यापाऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणामध्ये वाढ दिसून आली.

नवी दिल्ली - २०२० मध्ये कोरोनाच्या फैलावामुळे जगाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. कोरोनाच्या महामारीमुळे सर्व व्यवहार जवळपास बंद झाल्याने आर्थिक संकटही गंभीर बनले. त्यामुळे कोट्यवधी लोकांचे जीवन संकटात सापडले. त्यामुळे भारतात व्यावसायिक, व्यापाऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणामध्ये वाढ दिसून आली. २०१९ शी तुलना केली असता २०२० मध्ये शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड्स ब्युरोच्या ताजा आकडेवारीनुसार सन २०२० मध्ये ११ हजार ६७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर यादरम्यान १० हजार ६७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती.  या ११ हजारांहून अधिक आत्महत्यांमध्ये ४ हजार ३५६ व्यापाऱ्यांनी तर ४ हजार २२६ दुकानदारांनी आत्महत्या केली. तर अन्य आत्महत्या ह्या व्यवसायाशी संबंधित आहेत.

एनसीआरबीने या तीन कॅटॅगरीना बिझनेस समुदायाशी जोडून एकूण आकडेवारी नोंदवली आहे. २०१९ शी तुलना केली असता बिझनेस समुदायामध्ये २०२० मध्ये आत्महत्येच्या प्रकरणामध्ये २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. व्यापारी लोकांमध्ये आत्महत्येच्या प्रकरणामध्ये २०१९ मधील २९०६ आत्महत्यांच्या तुलनेत २०२० मध्ये ४३५६मध्ये ४९.९ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. तर संपूर्ण देशामध्ये आत्महत्येच्या प्रमाणामध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच ही संख्या वाढून १ लाख ५३ हजार ०५२ एवढी झाली आहे.

पारंपरिकपणे व्यावसायिकांमध्ये शेतकऱ्यांच्या तुलनेत आत्महत्यांचे प्रमाण कमी दिसून येते. मात्र कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे छोटे व्यापारी आणि व्यावसायितांना खूप नुकसानीचा सामना करावा लागला. मोठ्या संख्येने व्यावसायिकांना आपली दुकाने बंद ठेवावी लागली. तसेच कर्जफेक करू न शकल्याने त्यांवा दिवाळखोर व्हावे लागले.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना फेडरेशन ऑफ इंडियन मायक्रो स्मॉल आणि मीडियम इंटरप्रायझेसचे सेक्रेटरी जनरल अनिल भारद्वाज यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात छोट्या व्यापाऱ्यांना खूप नुकसान सहन करावे लागले. आतापर्यंत शेतीचे नुकसान आणि कर्जामुळे शेतकरीच सर्वाधिक आत्महत्या करतात. मात्र एनसीआरबीच्या आकड्यांमधून समजते की, व्यावसायिकसुद्धा खूप दबावामध्ये आणि तणावामध्ये आहे. तसेच कोरोनाच्या साथीने त्यांची परिस्थिती अधिकच बिकट केली आहे.  

टॅग्स :businessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत