शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील 50 जागांवर भाजपाच्या पराभवाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 10:01 IST

गेल्या निवडणुकीत 80 जागांपैकी 73 जागांवर भाजपाने विजय मिळवला होता.

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालानंतर येथील राजकीय समीकरणे कमालीची बदलली आहेत. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टीने अनेक वर्षांचे शत्रुत्त्व विसरून भाजपाविरोधात युती केली होती. त्यामुळे भाजपाला गोरखपूर आणि फुलपूर या प्रतिष्ठित मतदारसंघांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. ही परिस्थिती कायम राहिल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला लोकसभेच्या 50 जागा गमवाव्या लागतील, अशी शक्यता आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित रालोआ आघाडीने उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 जागांपैकी 73 जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी सपा आणि बसपा स्वतंत्र लढले होते. परंतु, आताच्या पोटनिवडणुकांप्रमाणे सपा आणि बसपाने पुढील लोकसभा निवडणुकांमध्येही युती केल्यास 80 पैकी 57 जागांवर त्यांना फायदा होईल. यावेळच्या पोटनिवडणुकीत बसपाची मते मोठ्याप्रमाणावर सपाकडे वळाली होती. हा ट्रेंड आगामी निवडणुकीत कायम राहू शकतो. त्यामुळे सपा-बसपा युतीला 50 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळू शकतो. याउलट भाजपाला केवळ 23 जागांवरच समाधान मानावे लागेल. पोटनिवडणुकीतील विजयानंतर अखिलेश यादव यांनी बसपाच्या प्रमुख मायावती यांचे आभार मानले. पण तेवढ्याने दोन्ही पक्षांतील आनंद थांबला नाही. मायावती यांनी आपली काळ्या रंगाची मर्सिडीज अखिलेश यांच्याकडे पाठवली. त्यात बसून अखिलेशही लगेच मायावती यांना भेटायला गेले होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाढते सख्य भाजपासाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. पोटनिवडणुकीच्या निकालानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनीदेखील सपाला एवढे यश मिळेल, याची कल्पना आम्ही केली नव्हती, अशी कबुली दिली होती. मात्र, भविष्यात विरोधक एकत्र येतील हे ग्राह्य धरून रणनीती आखणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. 

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशLoksabhaलोकसभाElectionनिवडणूक