शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील 50 जागांवर भाजपाच्या पराभवाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 10:01 IST

गेल्या निवडणुकीत 80 जागांपैकी 73 जागांवर भाजपाने विजय मिळवला होता.

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालानंतर येथील राजकीय समीकरणे कमालीची बदलली आहेत. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टीने अनेक वर्षांचे शत्रुत्त्व विसरून भाजपाविरोधात युती केली होती. त्यामुळे भाजपाला गोरखपूर आणि फुलपूर या प्रतिष्ठित मतदारसंघांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. ही परिस्थिती कायम राहिल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला लोकसभेच्या 50 जागा गमवाव्या लागतील, अशी शक्यता आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित रालोआ आघाडीने उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 जागांपैकी 73 जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी सपा आणि बसपा स्वतंत्र लढले होते. परंतु, आताच्या पोटनिवडणुकांप्रमाणे सपा आणि बसपाने पुढील लोकसभा निवडणुकांमध्येही युती केल्यास 80 पैकी 57 जागांवर त्यांना फायदा होईल. यावेळच्या पोटनिवडणुकीत बसपाची मते मोठ्याप्रमाणावर सपाकडे वळाली होती. हा ट्रेंड आगामी निवडणुकीत कायम राहू शकतो. त्यामुळे सपा-बसपा युतीला 50 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळू शकतो. याउलट भाजपाला केवळ 23 जागांवरच समाधान मानावे लागेल. पोटनिवडणुकीतील विजयानंतर अखिलेश यादव यांनी बसपाच्या प्रमुख मायावती यांचे आभार मानले. पण तेवढ्याने दोन्ही पक्षांतील आनंद थांबला नाही. मायावती यांनी आपली काळ्या रंगाची मर्सिडीज अखिलेश यांच्याकडे पाठवली. त्यात बसून अखिलेशही लगेच मायावती यांना भेटायला गेले होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाढते सख्य भाजपासाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. पोटनिवडणुकीच्या निकालानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनीदेखील सपाला एवढे यश मिळेल, याची कल्पना आम्ही केली नव्हती, अशी कबुली दिली होती. मात्र, भविष्यात विरोधक एकत्र येतील हे ग्राह्य धरून रणनीती आखणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. 

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशLoksabhaलोकसभाElectionनिवडणूक